शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

बेशिस्त वाहनांवर कारवाईचा धडाका

By admin | Updated: September 17, 2014 02:39 IST

अकोला येथे टोइंग पथकाकडून १९ वाहनांवर कारवाई.

अकोला : शहरातील बेताल वाहतुकीने कळस गाठला असून, ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी मंगळवारी वाहतूक शाखेच्या टोइंग पथकाकडून महत्त्वाच्या मार्गावरील अस्ताव्यस्त असलेल्या १९ वाहनांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून २ हजार २00 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. शहरातील बेताल वाहतुकीचे सचित्र वृत्त लोकमतने प्रकाशित केल्यानंतर वाहतूक शाखेकडून ही कारवाई करण्यास प्रारंभ करण्यात आला. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी, यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षकांनी वाहतूक शा खेच्या माध्यमातून टोइंग पथक सुरू केले आहे. शहरातील अत्यंत रहदारीच्या असलेल्या मार्गावर वाहतुकीला मोठय़ा प्रमाणात अडथळा निर्माण होत असून, याला ही वाहने जबाबदार असल्याचे दिसून आले. त्यामुळे अशा प्रकारच्या वाहनांवर मंगळवारी या पथकाकडून कारवाई करण्यात आली. सिव्हिल लाईन्स मार्गावर रस्त्यापासून बर्‍याच अंतरावरील वाहने या पोलिसांनी जप्त केल्याने वादाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे नियमावली ठरविण्यात यावी आणि त्यानंतरच रस्त्यावरील वाहनांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली.मंगळवारी या पथकाने बेशिस्त असलेल्या १९ वाहनांवर कारवाई केली आहे. यामध्ये १६ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, ३ वाहनांवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे दोन ते तीन मार्गावरील वाहतूक सुरळीत असल्याचे दिसून आले.