शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

हरभरा घोटाळ्यात आता शासन आदेशानुसार कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 01:50 IST

अकोला: हरभरा बियाणे घोटाळ्यात महाबीजकडून झालेल्या  घोळाचा पडताळणी अहवाल राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान  संचालकांकडे सादर करण्यात आला आहे. त्यामध्ये महाबीजने  ८५ टक्के शेतकर्‍यांपर्यंत बियाणे पोहोचल्याचा दावा केला  असून, त्यापोटी अनुदान मिळण्याची मागणीही केल्याचे  महाबीजने पत्रकात म्हटले आहे, तर जिल्हा परिषदेच्या कृषी  अधिकार्‍यांकडून कृषी विभागाच्या अहवालानुसार वितरक,  कृषी केंद्र संचालकांच्या सुनावण्या सुरू असून, त्यावर शासन  निर्देशानुसार पुढील कारवाई केली जाईल, असे जिल्हा  अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम यांनी सांगितले. 

ठळक मुद्देकृषी विभाग, महाबीजचा पडताळणी अहवाल शासनाकडेलोकप्रतिनिधींची चुप्पी 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: हरभरा बियाणे घोटाळ्यात महाबीजकडून झालेल्या  घोळाचा पडताळणी अहवाल राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान  संचालकांकडे सादर करण्यात आला आहे. त्यामध्ये महाबीजने  ८५ टक्के शेतकर्‍यांपर्यंत बियाणे पोहोचल्याचा दावा केला  असून, त्यापोटी अनुदान मिळण्याची मागणीही केल्याचे  महाबीजने पत्रकात म्हटले आहे, तर जिल्हा परिषदेच्या कृषी  अधिकार्‍यांकडून कृषी विभागाच्या अहवालानुसार वितरक,  कृषी केंद्र संचालकांच्या सुनावण्या सुरू असून, त्यावर शासन  निर्देशानुसार पुढील कारवाई केली जाईल, असे जिल्हा  अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम यांनी सांगितले. हरभरा बियाणे घोटाळ्याचा अहवाल शासनाकडे सादर करण्या त आला. त्यावर कृषी आयुक्तालयाने महाबीजला स्पष्टीकरण  मागविले. महाबीजने स्पष्टीकरण सादर करताना विक्रेत्यांना  विशेष अभियान राबवून लाभार्थी यादीत असलेल्या त्रुटी दूर  करण्याची संधी दिली. त्यासाठी विक्रेत्यांनी शेतकर्‍यांशी संपर्क  साधून त्यांचे प्रतिज्ञापत्र प्राप्त करून घेतले आहे. त्यावरून  जिल्हय़ातील ४६२८ पैकी ३८५८ पात्र शेतकर्‍यांना बियाण्याचे  वाटप झाल्याचा अहवाल महाबीजने तयार केला आहे. ८५ ट क्के पात्र लाभार्थींना बियाण्याचे वाटप झाले. त्यामुळे त्या  बियाण्याचे अनुदानही मिळावे, असा प्रस्ताव महाबीजने अन्न  सुरक्षा अभियान संचालकांकडे १८ सप्टेंबर रोजी सादर केला  आहे. कृषी विभागाच्या पथकांचा आधीचा अहवाल, त्यानंतर  आता महाबीजचा अहवाल शासनाकडे सादर झाला आहे.  त्याचवेळी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागात बियाणे वाटपात  केलेल्या घोळप्रकरणी कारवाईसाठी १४४ कृषी केंद्र  संचालकांच्या सुनावण्या सुरू आहेत. या प्रकरणात कारवाईचे  आदेश शासन स्तरावरून दिले जाणार आहेत. त्यामुळे आता  कोट्यवधी रुपयांचा हरभरा घोटाळा दाबला जाण्याची शक्यता  निर्माण झाली आहे. 

लोकप्रतिनिधींची चुप्पी विशेष म्हणजे, कोणत्याही छोट्या-मोठय़ा प्रकरणात  अधिकार्‍यांना जाब विचारण्याची तयारी ठेवणारे जिल्हय़ातील  लोकप्रतिनिधी हरभरा घोटाळ्यात सुरुवातीपासूनच मूग गिळून  बसल्याचे चित्र आहे. त्यामुळेच आता शासन स्तरावरूनच हा  घोळ निस्तरला जाण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. पारदर्शक  शासनाच्या कार्यकाळात या घोटाळ्याचे काय होईल, हे आता  दिसून येणार आहे.