शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

मास्क न लावणाऱ्या १५० जणांवर कारवाई; दुकाने सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:23 IST

शहरात काेराेना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. काेराेनाबाधितांच्या संख्येत वाढ झाल्याची बाब लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाने १५ फेबुवारीपासून शहरासह ...

शहरात काेराेना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. काेराेनाबाधितांच्या संख्येत वाढ झाल्याची बाब लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाने १५ फेबुवारीपासून शहरासह जिल्ह्यात जमावबंदी लागू केली. शहरात काेराेनाच्या नियमांचे नागरिकांकडून सर्रास उल्लंघन केले जात असल्याचे पाहून महापालिका आयुक्त निमा अराेरा यांनी मास्क न लावणाऱ्या व साेशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांविराेधात कारवाईचा धडाका सुरू केला आहे. यासाठी मनपा, पाेलीस व महसूल प्रशासनाच्या संयुक्त पाच पथकांतर्फे कारवाई केली जात आहे.

५८ हजार रुपये दंड वसूल मनपाचे प्रभारी आयुक्त डाॅ.पंकज जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली गठीत केलेल्या पथकाने बुधवारी ताेंडाला मास्क न लावणाऱ्या १५० जणांना दंड आकारला. यामध्ये प्रत्‍येकी २०० रुपये दंड वसूल करण्यात आला असून, सोशल डिस्‍टन्सिंगचे उल्‍लंघन करणाऱ्या सहा व्‍यावसायिकांना दंड आकारण्यात आला. यावेळी अकाेलेकरांजवळून एकूण ५८ हजार ४०० रुपये दंड वसूल करण्यात आला.

दुकानांना सील; हाॅटेल व्यावसायिक रडारवर

महापालिका, महसूल व पाेलिसांनी गठीत केलेल्या पथकांद्वारे बुधवारी टिळक रोडवरील अलंकार माकेट येथील हरिओम स्‍टील व कैलाश मेटल्‍स या दुकानांना सील लावण्‍याची कारवाई करण्‍यात आली, तसेच टिळक राेडवरील एका भाेजनालयात नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्याने दंड वसूल केला. यापुढे शहरातील सर्व हाॅटेल, रेस्टाॅरन्ट, खानावळी रडारवर राहणार असल्याचे मनपाने स्पष्ट केले आहे.