शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

लॉकडाऊनच्या एका महिन्यात १५ हजार वाहनांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:16 IST

अकोला : कोरोनाचा प्रादुर्भाव मार्च महिन्यापासून प्रचंड वाढत असतानाच यावर काही उपाय नसल्याने राज्य शासनाने १५ एप्रिल ते १५ ...

अकोला : कोरोनाचा प्रादुर्भाव मार्च महिन्यापासून प्रचंड वाढत असतानाच यावर काही उपाय नसल्याने राज्य शासनाने १५ एप्रिल ते १५ मे या दरम्यान संचारबंदी लागू केली आहे. या संचारबंदीच्या कालावधीत तब्बल १४ हजार ७५३ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे, तर विनाकारण फिरणाऱ्या ६०० दुचाकी जप्त करण्यात आलेल्या आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात संचारबंदी लागू केली. त्यानंतर लगेच १५ एप्रिलपासून पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक मोनिका राऊत व शहर पोलीस उपअधीक्षक सचिन कदम यांनी रस्त्यावर उतरून विनाकारण फिरणाऱ्या दुचाकींवर कारवाई सुरू केली. यासाठी वाहतूक शाखेचे गजानन शेळके यांनी दुचाकीवर दंडात्मक कारवाई सुरू केली. १५ एप्रिल ते १५ मे या एका महिन्याच्या कालावधीत जिल्ह्यातील तब्बल १४,७५३ हजार दुचाकींवर दंडात्मक कारवाई करून ८ लाख १५ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे, तर संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या ५८६ दुचाकी जप्त करण्यात आल्या असून, त्यांच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. घराबाहेर पडणारे मेडिकल, किराणा, तसेच विविध कारणे सांगत असल्याचे यावेळी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. मात्र, पोलिसांनी त्याची उलट तपासणी केली असता अनेकजण खोटे बोलत असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे पोलिसांनी अशा दुचाकींवर कारवाई केली.

१४,७५३ दुचाकींवर कारवाई

५८६ दुचाकी जप्त

आठ लाखांचा दंड वसूल

कारणे खोटी; ६०० जणांवर गुन्हा

घराबाहेर पडणारे दुचाकीचालक मेडिकल, औषधी, दूध, तसेच किराणा आणत असल्याची कारणे सांगत आहे. मात्र, पोलिसांनी त्यांच्यासोबत जाऊन पडताळणी केली असता यामधील बहुतांश दुचाकीचालक यांची कारणे खोटी असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे अशा ६०० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.