शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

अपघात रोखण्यासाठी अकोलेकरांनी स्वीकारावी जबाबदारी - जी. श्रीकांत

By admin | Updated: January 12, 2016 01:48 IST

रस्ता सुरक्षा सप्ताह; जिल्हाधिका-यांनी केले अकोलेकरांना अवाहन.

अकोला : अपघात थांबविण्याची जबाबदारी केवळ संबंधित विभागाच्या अधिकारी, कर्मचार्‍यांनीच नाही, तर सामान्य नागरिकांनीही स्वीकारावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी अकोलेकरांना केले. 'रस्ता सुरक्षा काळाची गरज' हा विषयाला केंद्रस्थानी ठेवून १0 ते १६ जानेवारी या कालावधीत २७ वा रस्ता सुरक्षा सप्ताह व राज्य रस्ता सुरक्षा अभियान २0१६ राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने सोमवारी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी जी. श्रीकांत बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवेंदर सिंह, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वढोकार यांची प्रमुख उपस्थिती होती. सामान्य नागरिक म्हणून वाहतूक नियमांचे पालन करत असताना, दुर्दैवाने नियमाचे पालन न करणार्‍या वाहतूक शाखेच्या एका कर्मचार्‍यास स्वत: मेमो दिल्याचे यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले. पोलीस अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर, वकील यासारख्या प्रतिष्ठित नागरिकांनी स्वत: वाहतूक नियमांचे पालन करायला हवे, कारण यांच्या प्रेरणेनेच सामान्य नागरिकदेखील वाहतूक नियमांचे पालन करणार असल्याचा आशावाद यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी व्यक्त केला. अपघातामध्ये महाराष्ट्राचे प्रथम स्थान असून, राज्यात विदर्भात सर्वाधिक अपघात होतात. यामध्ये नागपूरनंतर अकोल्याचा क्रमांक लागतो. तर, राज्यात साक्षरतेच्या बाबतीत अकोला चौथ्यास्थानी आहे. अकोल्यात साक्षरतेचे प्रमाण जास्त असूनही अपघातांचे प्रमाण अधिक असल्याची माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वढोकार यांनी केले. देशात ६९ हजार ८९0 अपघात झाले असून, हे अपघात केवळ सुरक्षा नियमांचे पालन न केल्यामुळे झाल्याचे त्यांनी सांगितले. त्या अनुषंगाने शासनामार्फत रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येते. अभियानांतर्गत शालेय विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे प्रशिक्षण देणे, वाहन चालविताना मोबाइल फोनचा उपयोग केल्यास तीन महिने वाहन परवाने रद्द करणे, जनजागृती करणार्‍या पत्रकांचे वाटप करण्यात येणार असल्याचे वढोकार यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सरिता पवार यांनी मानले.