शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
3
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
4
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
5
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
6
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
7
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
8
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
9
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
10
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
11
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
12
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
13
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
14
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
15
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
16
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
17
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
18
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
19
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात

अपघात रोखण्यासाठी अकोलेकरांनी स्वीकारावी जबाबदारी - जी. श्रीकांत

By admin | Updated: January 12, 2016 01:48 IST

रस्ता सुरक्षा सप्ताह; जिल्हाधिका-यांनी केले अकोलेकरांना अवाहन.

अकोला : अपघात थांबविण्याची जबाबदारी केवळ संबंधित विभागाच्या अधिकारी, कर्मचार्‍यांनीच नाही, तर सामान्य नागरिकांनीही स्वीकारावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी अकोलेकरांना केले. 'रस्ता सुरक्षा काळाची गरज' हा विषयाला केंद्रस्थानी ठेवून १0 ते १६ जानेवारी या कालावधीत २७ वा रस्ता सुरक्षा सप्ताह व राज्य रस्ता सुरक्षा अभियान २0१६ राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने सोमवारी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी जी. श्रीकांत बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवेंदर सिंह, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वढोकार यांची प्रमुख उपस्थिती होती. सामान्य नागरिक म्हणून वाहतूक नियमांचे पालन करत असताना, दुर्दैवाने नियमाचे पालन न करणार्‍या वाहतूक शाखेच्या एका कर्मचार्‍यास स्वत: मेमो दिल्याचे यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले. पोलीस अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर, वकील यासारख्या प्रतिष्ठित नागरिकांनी स्वत: वाहतूक नियमांचे पालन करायला हवे, कारण यांच्या प्रेरणेनेच सामान्य नागरिकदेखील वाहतूक नियमांचे पालन करणार असल्याचा आशावाद यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी व्यक्त केला. अपघातामध्ये महाराष्ट्राचे प्रथम स्थान असून, राज्यात विदर्भात सर्वाधिक अपघात होतात. यामध्ये नागपूरनंतर अकोल्याचा क्रमांक लागतो. तर, राज्यात साक्षरतेच्या बाबतीत अकोला चौथ्यास्थानी आहे. अकोल्यात साक्षरतेचे प्रमाण जास्त असूनही अपघातांचे प्रमाण अधिक असल्याची माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वढोकार यांनी केले. देशात ६९ हजार ८९0 अपघात झाले असून, हे अपघात केवळ सुरक्षा नियमांचे पालन न केल्यामुळे झाल्याचे त्यांनी सांगितले. त्या अनुषंगाने शासनामार्फत रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येते. अभियानांतर्गत शालेय विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे प्रशिक्षण देणे, वाहन चालविताना मोबाइल फोनचा उपयोग केल्यास तीन महिने वाहन परवाने रद्द करणे, जनजागृती करणार्‍या पत्रकांचे वाटप करण्यात येणार असल्याचे वढोकार यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सरिता पवार यांनी मानले.