शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

अपघात रोखण्यासाठी अकोलेकरांनी स्वीकारावी जबाबदारी - जी. श्रीकांत

By admin | Updated: January 12, 2016 01:48 IST

रस्ता सुरक्षा सप्ताह; जिल्हाधिका-यांनी केले अकोलेकरांना अवाहन.

अकोला : अपघात थांबविण्याची जबाबदारी केवळ संबंधित विभागाच्या अधिकारी, कर्मचार्‍यांनीच नाही, तर सामान्य नागरिकांनीही स्वीकारावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी अकोलेकरांना केले. 'रस्ता सुरक्षा काळाची गरज' हा विषयाला केंद्रस्थानी ठेवून १0 ते १६ जानेवारी या कालावधीत २७ वा रस्ता सुरक्षा सप्ताह व राज्य रस्ता सुरक्षा अभियान २0१६ राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने सोमवारी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी जी. श्रीकांत बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवेंदर सिंह, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वढोकार यांची प्रमुख उपस्थिती होती. सामान्य नागरिक म्हणून वाहतूक नियमांचे पालन करत असताना, दुर्दैवाने नियमाचे पालन न करणार्‍या वाहतूक शाखेच्या एका कर्मचार्‍यास स्वत: मेमो दिल्याचे यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले. पोलीस अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर, वकील यासारख्या प्रतिष्ठित नागरिकांनी स्वत: वाहतूक नियमांचे पालन करायला हवे, कारण यांच्या प्रेरणेनेच सामान्य नागरिकदेखील वाहतूक नियमांचे पालन करणार असल्याचा आशावाद यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी व्यक्त केला. अपघातामध्ये महाराष्ट्राचे प्रथम स्थान असून, राज्यात विदर्भात सर्वाधिक अपघात होतात. यामध्ये नागपूरनंतर अकोल्याचा क्रमांक लागतो. तर, राज्यात साक्षरतेच्या बाबतीत अकोला चौथ्यास्थानी आहे. अकोल्यात साक्षरतेचे प्रमाण जास्त असूनही अपघातांचे प्रमाण अधिक असल्याची माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वढोकार यांनी केले. देशात ६९ हजार ८९0 अपघात झाले असून, हे अपघात केवळ सुरक्षा नियमांचे पालन न केल्यामुळे झाल्याचे त्यांनी सांगितले. त्या अनुषंगाने शासनामार्फत रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येते. अभियानांतर्गत शालेय विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे प्रशिक्षण देणे, वाहन चालविताना मोबाइल फोनचा उपयोग केल्यास तीन महिने वाहन परवाने रद्द करणे, जनजागृती करणार्‍या पत्रकांचे वाटप करण्यात येणार असल्याचे वढोकार यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सरिता पवार यांनी मानले.