शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

बारिगे हत्याकांड प्रकरणात जन्मठेपेचे आरोपी निर्दोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2017 02:46 IST

निकालाविरोधात सदर आरोपींनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते.

अकोला, दि. १0- तेल्हारा तालुक्यातील अथर्व बरिंगे हत्याकांड प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झालेल्या सात आरोपींची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निर्दोष मुक्तता केली. अकोट येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने दिलेल्या निकालाविरोधात सदर आरोपींनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते, यावरून उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सातही आरोपींना सबळ पुराव्याअभावी निर्दोष सोडले.तेल्हारा तालुक्यातील व्यापारी मधुसूदन बरिंगे यांचा मुलगा अथर्व बरिंगे याचे पाच हजार रुपयांच्या मागणीसाठी २७ डिसेंबर २0१0 रोजी अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर अथर्वची हत्यासुद्धा करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी वडगाव रोठे येथील रहिवासी रमेश हिरामण वानखडे, सिद्धार्थ भगवान वानखडे, राहुल दादाराव वानखडे, नागेश लक्ष्मण वानखडे, विक्रम सदाशिव वानखडे, परमेश्‍वर सिद्धार्थ वानखडे व महेंद्र वामन वानखडे यांना अटक करून त्यांच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. पोलीस तपासानंतर अकोट येथील सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. अकोट येथील अतिरिक्त न्यायाधीशांनी सातही आरोपींना विविध कलमान्वये जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती; परंतु आरोपींनी याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये दाद मागितली. दरम्यान, नागपूर खंडपीठाच्या न्यायाधीशांनी सातही आरोपींना सबळ पुराव्याअभावी निर्दोष सोडले आहे.