शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात १७५ बिबट्यांचा अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:15 IST

राजेश शेगाेकार, अकाेला एकीकडे व्याघ्र संवर्धनासाठी अनेक प्रयत्न केले जात असून, वाघांच्या संवर्धनासाठी सन १९७३ मध्ये व्याघ्र प्रकल्प ही ...

राजेश शेगाेकार, अकाेला

एकीकडे व्याघ्र संवर्धनासाठी अनेक प्रयत्न केले जात असून, वाघांच्या संवर्धनासाठी सन १९७३ मध्ये व्याघ्र प्रकल्प ही योजना अंमलात आली. सद्य:स्थितीत देशात एकूण ५० व्याघ्र प्रकल्प आहेत, मात्र तेच बिबट्याच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी कुठलेच प्रयत्न करण्यात आलेले नाहीत. त्यासाठी कुठलीच विशेष यंत्रणादेखील नाही. त्यामुळे गेल्या दहा वर्षांत बिबट्यांचे अपघाती मृत्यू वाढले आहेत. अकाेल्यातील पातूरमध्ये गुरुवारी दाेन बिबट विजेच्या धक्याने मृत्यू पावले या घटनेच्या निमित्ताने बिबट्यांचा अपघाती मृत्यूचा आढावा घेतला असता गेल्या दहा वर्षांत तब्बल ८६० बिबट्यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. यामध्ये गेल्या १२ महिन्यांत तब्बल १७५ बिबट्यांचा समावेश आहे महाराष्ट्र राज्य वन्य जीव मंडळाच्या ४ डिसेंबर राेजी झालेल्या बैठकीत बिबट्यांच्या मृत्यूची माहिती देण्यात आली. या माहितीनुसार सन २०१८ मध्ये भारतात एकूण ४६० बिबटे मृत पावले आहेत. यात एकूण ९० शिकारीची प्रकरणे उघडकीस आली होती, तर २२ बिबट्यांना चक्क गावकऱ्यांनी यमसदनी पाठविल्याच्या घटना घडल्या आहेत. उर्वरित मृत्यूबाबत मात्र अजूनही कुणालाही थांगपत्ता लागलेला नाही. सन २०१९ मध्ये महाराष्ट्रातील तब्बल ११० बिबट्यांना आपले प्राण गमवावे लागले आहे. सन २०२० मध्ये १७५ बिबटे मृत झाले असून, त्यात विजेच्या धक्क्याने तब्बल ९ मृत्यू आहेत.

धक्कादायक म्हणजे यामध्ये बिबटे व इतर प्राण्यांच्या संवर्धनासाठी एकही रुपया खर्च केल्या गेला नसल्याचे एका अहवालातून निष्पन्न झाले आहे. वाढती शिकार, संवर्धनात असलेले दुय्यम स्थान पाहता बिबट्यांची संख्या झपाट्याने कमी झाली आहे. वाघ आणि बिबट्यांच्या मृत्यूच्या आकडेवारीची तुलना केल्यास वाघांच्या मृत्यूच्या तुलनेत हे प्रमाण दोनशे पटींहून अधिक आहे.

काेट

बिबट्यांच्या संवर्धनासाठी स्वतंत्र धोरण आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाच्या १६व्या बैठकीत यावर चर्चा झाली. भारतातील बिबट्यांचे रस्ते अपघात, शिकार व विजेच्या धक्का लागून मृत्यू होणे हे थांबविणे एक मोठे आवाहन आहे. विजेच्या धक्क्याने होणारे मृत्यू चिंतेचा विषय असून, लोकांना विश्वासात घेऊन जनजागृती करणे आवश्यक आहे.

- यादव तरटे पाटील

सदस्य, महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळ