शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
3
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
4
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
5
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
6
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
7
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
8
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
9
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
10
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
11
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
12
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
13
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
14
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
15
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
16
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
17
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
18
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
19
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
20
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना

वर्षभरात १७५ बिबट्यांचा अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:15 IST

राजेश शेगाेकार, अकाेला एकीकडे व्याघ्र संवर्धनासाठी अनेक प्रयत्न केले जात असून, वाघांच्या संवर्धनासाठी सन १९७३ मध्ये व्याघ्र प्रकल्प ही ...

राजेश शेगाेकार, अकाेला

एकीकडे व्याघ्र संवर्धनासाठी अनेक प्रयत्न केले जात असून, वाघांच्या संवर्धनासाठी सन १९७३ मध्ये व्याघ्र प्रकल्प ही योजना अंमलात आली. सद्य:स्थितीत देशात एकूण ५० व्याघ्र प्रकल्प आहेत, मात्र तेच बिबट्याच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी कुठलेच प्रयत्न करण्यात आलेले नाहीत. त्यासाठी कुठलीच विशेष यंत्रणादेखील नाही. त्यामुळे गेल्या दहा वर्षांत बिबट्यांचे अपघाती मृत्यू वाढले आहेत. अकाेल्यातील पातूरमध्ये गुरुवारी दाेन बिबट विजेच्या धक्याने मृत्यू पावले या घटनेच्या निमित्ताने बिबट्यांचा अपघाती मृत्यूचा आढावा घेतला असता गेल्या दहा वर्षांत तब्बल ८६० बिबट्यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. यामध्ये गेल्या १२ महिन्यांत तब्बल १७५ बिबट्यांचा समावेश आहे महाराष्ट्र राज्य वन्य जीव मंडळाच्या ४ डिसेंबर राेजी झालेल्या बैठकीत बिबट्यांच्या मृत्यूची माहिती देण्यात आली. या माहितीनुसार सन २०१८ मध्ये भारतात एकूण ४६० बिबटे मृत पावले आहेत. यात एकूण ९० शिकारीची प्रकरणे उघडकीस आली होती, तर २२ बिबट्यांना चक्क गावकऱ्यांनी यमसदनी पाठविल्याच्या घटना घडल्या आहेत. उर्वरित मृत्यूबाबत मात्र अजूनही कुणालाही थांगपत्ता लागलेला नाही. सन २०१९ मध्ये महाराष्ट्रातील तब्बल ११० बिबट्यांना आपले प्राण गमवावे लागले आहे. सन २०२० मध्ये १७५ बिबटे मृत झाले असून, त्यात विजेच्या धक्क्याने तब्बल ९ मृत्यू आहेत.

धक्कादायक म्हणजे यामध्ये बिबटे व इतर प्राण्यांच्या संवर्धनासाठी एकही रुपया खर्च केल्या गेला नसल्याचे एका अहवालातून निष्पन्न झाले आहे. वाढती शिकार, संवर्धनात असलेले दुय्यम स्थान पाहता बिबट्यांची संख्या झपाट्याने कमी झाली आहे. वाघ आणि बिबट्यांच्या मृत्यूच्या आकडेवारीची तुलना केल्यास वाघांच्या मृत्यूच्या तुलनेत हे प्रमाण दोनशे पटींहून अधिक आहे.

काेट

बिबट्यांच्या संवर्धनासाठी स्वतंत्र धोरण आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाच्या १६व्या बैठकीत यावर चर्चा झाली. भारतातील बिबट्यांचे रस्ते अपघात, शिकार व विजेच्या धक्का लागून मृत्यू होणे हे थांबविणे एक मोठे आवाहन आहे. विजेच्या धक्क्याने होणारे मृत्यू चिंतेचा विषय असून, लोकांना विश्वासात घेऊन जनजागृती करणे आवश्यक आहे.

- यादव तरटे पाटील

सदस्य, महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळ