शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
2
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
3
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्त्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
4
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
7
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
8
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
9
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
10
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
11
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
12
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
13
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
14
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
15
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
16
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
17
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
18
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
19
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
20
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली

वर्षभरात १७५ बिबट्यांचा अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:15 IST

राजेश शेगाेकार, अकाेला एकीकडे व्याघ्र संवर्धनासाठी अनेक प्रयत्न केले जात असून, वाघांच्या संवर्धनासाठी सन १९७३ मध्ये व्याघ्र प्रकल्प ही ...

राजेश शेगाेकार, अकाेला

एकीकडे व्याघ्र संवर्धनासाठी अनेक प्रयत्न केले जात असून, वाघांच्या संवर्धनासाठी सन १९७३ मध्ये व्याघ्र प्रकल्प ही योजना अंमलात आली. सद्य:स्थितीत देशात एकूण ५० व्याघ्र प्रकल्प आहेत, मात्र तेच बिबट्याच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी कुठलेच प्रयत्न करण्यात आलेले नाहीत. त्यासाठी कुठलीच विशेष यंत्रणादेखील नाही. त्यामुळे गेल्या दहा वर्षांत बिबट्यांचे अपघाती मृत्यू वाढले आहेत. अकाेल्यातील पातूरमध्ये गुरुवारी दाेन बिबट विजेच्या धक्याने मृत्यू पावले या घटनेच्या निमित्ताने बिबट्यांचा अपघाती मृत्यूचा आढावा घेतला असता गेल्या दहा वर्षांत तब्बल ८६० बिबट्यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. यामध्ये गेल्या १२ महिन्यांत तब्बल १७५ बिबट्यांचा समावेश आहे महाराष्ट्र राज्य वन्य जीव मंडळाच्या ४ डिसेंबर राेजी झालेल्या बैठकीत बिबट्यांच्या मृत्यूची माहिती देण्यात आली. या माहितीनुसार सन २०१८ मध्ये भारतात एकूण ४६० बिबटे मृत पावले आहेत. यात एकूण ९० शिकारीची प्रकरणे उघडकीस आली होती, तर २२ बिबट्यांना चक्क गावकऱ्यांनी यमसदनी पाठविल्याच्या घटना घडल्या आहेत. उर्वरित मृत्यूबाबत मात्र अजूनही कुणालाही थांगपत्ता लागलेला नाही. सन २०१९ मध्ये महाराष्ट्रातील तब्बल ११० बिबट्यांना आपले प्राण गमवावे लागले आहे. सन २०२० मध्ये १७५ बिबटे मृत झाले असून, त्यात विजेच्या धक्क्याने तब्बल ९ मृत्यू आहेत.

धक्कादायक म्हणजे यामध्ये बिबटे व इतर प्राण्यांच्या संवर्धनासाठी एकही रुपया खर्च केल्या गेला नसल्याचे एका अहवालातून निष्पन्न झाले आहे. वाढती शिकार, संवर्धनात असलेले दुय्यम स्थान पाहता बिबट्यांची संख्या झपाट्याने कमी झाली आहे. वाघ आणि बिबट्यांच्या मृत्यूच्या आकडेवारीची तुलना केल्यास वाघांच्या मृत्यूच्या तुलनेत हे प्रमाण दोनशे पटींहून अधिक आहे.

काेट

बिबट्यांच्या संवर्धनासाठी स्वतंत्र धोरण आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाच्या १६व्या बैठकीत यावर चर्चा झाली. भारतातील बिबट्यांचे रस्ते अपघात, शिकार व विजेच्या धक्का लागून मृत्यू होणे हे थांबविणे एक मोठे आवाहन आहे. विजेच्या धक्क्याने होणारे मृत्यू चिंतेचा विषय असून, लोकांना विश्वासात घेऊन जनजागृती करणे आवश्यक आहे.

- यादव तरटे पाटील

सदस्य, महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळ