शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
3
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
4
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
5
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
6
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
7
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
8
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
9
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
10
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
11
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
12
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
13
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
14
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
15
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
16
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
17
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
18
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
19
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
20
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

‘आधार’ नोंदणीची प्रक्रिया होणार गतिशील!

By admin | Updated: November 9, 2014 23:25 IST

केंद्र शासनाचा निर्णय: नोंदणीच्या उपकरणांमध्ये वाढ.

अनिल गवई/खामगावसामान्य माणसांचा अधिकार हे घोषवाक्य असलेल्या आधारची गती वाढविण्याचा ऐतिहासिक निर्णय केंद्र शासनाने घेतला असून, आधार कार्डाच्या नोंदणीसाठी कार्यरत उपकरणांमध्ये तब्बल दीडपटीने वाढ करून, आधार नोंदणीची प्रक्रिया गतिशील करण्यात आली आहे.राष्ट्रीयकृत ओळखीसह केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांसाठी उपयुक् त असलेल्या आधारला केंद्र शासनाने मुदतवाढ दिली आहे. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी (यूआयडीएआय) आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) विभाग आधार नोंदणीचा कार्यक्रम देशभर राबवित आहे. प्राप्त माहितीनुसार, देशातील ७१ कोटी जनतेला आतापर्यंंत आधार कार्ड देण्यात आले आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून या मोहिमेला मिळत असलेल्या अ त्यल्प प्रतिसादामुळे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आधार नोंदणी प्रक्रिया २३ एप्रिल २0१४ पासून गुंडाळण्यात आली होती; मात्र केंद्र शासनाने नुकताच आधार ला गती देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. इतकेच नव्हे तर, आधार कार्ड क्रमांकाचे काम येत्या मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे राज्यासह देशातील इतरही राज्यांमध्ये पुन्हा आधार नोंदणी सुरू होणार आहे. काँग्रेसप्रणित आघाडी शासनाच्या काळात सुरू झालेली ही योजना मोदी सरकार राबविणार की नाही, अशी भीती व्यक्त होत असतानाच, केंद्र शासनाने आधारला मुदतवाढ देण्याचा निर्णय जाहीर केला आहे.*आधार नोंदणी उपकरणांमध्ये दीडपटीने वाढ!आधार नोंदणीसाठी देशात सुमारे २६ हजारापेक्षा जास्त उपकरणे कार्यरत आहेत. या उपकरणांद्वारे संपूर्ण देशभर दररोज सरासरी नऊ ते दहा लाख लोकांची नोंदणी केली जात होती; मात्र आता आधार नोंदणीच्या या उपकरणांमध्ये तब्बल १३ हजार उपकरणांची भर घालण्यात येणार आहे. दररोज सरासरी १५ ते १६ लाख नोंदणीचा केंद्र शासनाचा प्रयत्न असल्याची माहिती आहे.*राज्यात आधार नोंदणीचे प्रमाण ७0 टक्क्यांपेक्षा कमीआधार नोंदणीमध्ये आंध प्रदेश, केरळ, हिमाचल प्रदेश, तसेच दिल्ली ही राज्ये अव्वल स्थानी आहेत. या राज्यांमधील ९२ ते ९३ टक्के लोकांना आधार क्रमांक मिळाले आहेत. इतर राज्यांमधील आधार नोंदणीची स्थिती मात्र सुमार असल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, हरियाणा, छत्तीसगढ, मध्य प्रदेश, उत्तराखंड, बिहार या राज्यांमधील आधार नोंदणीचे प्रमाण ७0 टक्यांपेक्षा कमी आहे.