शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ९९७ गावे टंचाईसदृश

By admin | Updated: May 23, 2014 00:10 IST

जिल्हाधिकार्‍यांचा आदेश: विविध सवलती मिळणार

अकोला : गेल्या खरीप हंगामात पिकांची अंतिम पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी असलेल्या जिल्ह्यातील ९९७ गावांमध्ये टंचाईसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी सोमवारी काढला आहे. त्यानुसार टंचाईसदृश गावांना विविध सवलती मिळणार आहेत.गेल्या पावसाळ्यात जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले. परिणामी जिल्ह्यातील पिकांच्या उत्पादनातही कमालीची घट झाली. या पृष्ठभूमीवर सन २०१३-२०१४ या वर्षात जिल्ह्यातील ९९७ गावांची खरीप पिकांची अंतिम पैसेवारी ५० पैसे किंवा त्यापेक्षा कमी असल्याचे जिल्हाधिकार्‍यांमार्फत गेल्या मार्चअखेर जाहीर करण्यात आले होते. याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे सादर करण्यात आला होता. शासनाच्या गत ३० एप्रिल रोजीच्या निर्णयानुसार अंतिम पैसेवारी ५० पैसे किंवा त्यापेक्षा कमी असलेल्या गावांमध्ये टंचाईसदृश परिस्थिती जाहीर करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार अकोला जिल्ह्यात खरीप हंगामातील अंतिम पैसेवारी ५० पैसे किंवा त्यापेक्षा कमी असलेल्या ९९७ गावांमध्ये टंचाईसदृश परिस्थिती जाहीर करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी सोमवार, १९ मे रोजी काढला. टंचाईसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आलेल्या जिल्ह्यातील या गावांमध्ये शासन निर्णयानुसार विविध सवलती देण्यात येणार आहेत. त्यानुषंगाने आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देशही जिल्हाधिकार्‍यांनी जिल्ह्यातील तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, जिल्हा नियोजन अधिकारी यांच्यासह सर्वच संबंधित विभाग आणि यंत्रणांच्या अधिकार्‍यांना आदेशात दिले आहेत.

** टंचाईसदृश गावांना अशा मिळणार सवलती!-जमीन महसुलात सूट-सहकारी कर्जांचे रुपांतरण-शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती-वीज बिलात ३३.५ टक्के सूट-परीक्षा शुल्कात माफी-रोहयो अंतर्गत कामांच्या निकषात शिथिलता-पाणीपुरवठ्यासाठी आवश्यक तेथे टँकर्सचा वापर-शेतकर्‍यांच्या कृषिपंपांची वीज जोडणी खंडित न करणे

** ५० पैसेपेक्षा कमी पैसेवारी असलेली तालुकानिहाय गावे!तालुका गावेअकोला १९१बार्शीटाकळी १५६आकोट १८३तेल्हारा १०६बाळापूर १०३पातूर ९४मूर्तिजापूर १६४एकूण ९९७