शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

जिल्ह्यात ९९७ गावे टंचाईसदृश

By admin | Updated: May 23, 2014 00:10 IST

जिल्हाधिकार्‍यांचा आदेश: विविध सवलती मिळणार

अकोला : गेल्या खरीप हंगामात पिकांची अंतिम पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी असलेल्या जिल्ह्यातील ९९७ गावांमध्ये टंचाईसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी सोमवारी काढला आहे. त्यानुसार टंचाईसदृश गावांना विविध सवलती मिळणार आहेत.गेल्या पावसाळ्यात जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले. परिणामी जिल्ह्यातील पिकांच्या उत्पादनातही कमालीची घट झाली. या पृष्ठभूमीवर सन २०१३-२०१४ या वर्षात जिल्ह्यातील ९९७ गावांची खरीप पिकांची अंतिम पैसेवारी ५० पैसे किंवा त्यापेक्षा कमी असल्याचे जिल्हाधिकार्‍यांमार्फत गेल्या मार्चअखेर जाहीर करण्यात आले होते. याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे सादर करण्यात आला होता. शासनाच्या गत ३० एप्रिल रोजीच्या निर्णयानुसार अंतिम पैसेवारी ५० पैसे किंवा त्यापेक्षा कमी असलेल्या गावांमध्ये टंचाईसदृश परिस्थिती जाहीर करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार अकोला जिल्ह्यात खरीप हंगामातील अंतिम पैसेवारी ५० पैसे किंवा त्यापेक्षा कमी असलेल्या ९९७ गावांमध्ये टंचाईसदृश परिस्थिती जाहीर करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी सोमवार, १९ मे रोजी काढला. टंचाईसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आलेल्या जिल्ह्यातील या गावांमध्ये शासन निर्णयानुसार विविध सवलती देण्यात येणार आहेत. त्यानुषंगाने आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देशही जिल्हाधिकार्‍यांनी जिल्ह्यातील तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, जिल्हा नियोजन अधिकारी यांच्यासह सर्वच संबंधित विभाग आणि यंत्रणांच्या अधिकार्‍यांना आदेशात दिले आहेत.

** टंचाईसदृश गावांना अशा मिळणार सवलती!-जमीन महसुलात सूट-सहकारी कर्जांचे रुपांतरण-शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती-वीज बिलात ३३.५ टक्के सूट-परीक्षा शुल्कात माफी-रोहयो अंतर्गत कामांच्या निकषात शिथिलता-पाणीपुरवठ्यासाठी आवश्यक तेथे टँकर्सचा वापर-शेतकर्‍यांच्या कृषिपंपांची वीज जोडणी खंडित न करणे

** ५० पैसेपेक्षा कमी पैसेवारी असलेली तालुकानिहाय गावे!तालुका गावेअकोला १९१बार्शीटाकळी १५६आकोट १८३तेल्हारा १०६बाळापूर १०३पातूर ९४मूर्तिजापूर १६४एकूण ९९७