शहरं
Join us  
Trending Stories
1
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
2
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
3
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
4
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
5
बिहारमध्ये खेळ कोणी पालटला...? ७१.६ टक्के महिलांनी मतदान केलेले, पुरुष बरेच मागे राहिले...
6
ना कंपनी बनवली, ना माल विकला; तरीही रिफंडच्या नावावर सरकारकडून वसूल केले ६४५ कोटी, कसा लावला चुना?
7
बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११८ वर; एवढ्या जागा महागात पडणार...
8
"बिहारमध्ये जो 'गेम' झालाय, तो..."; विधानसभा निवडणुकीच्या निकालावर अखिलेश यादव यांचा टोला
9
Mumbai: बीकॉम विद्यार्थ्याची जबरदस्तीने लिंग बदल शस्त्रक्रिया; ट्रान्सजेंडर टोळीकडून ब्लॅकमेलिंग आणि खंडणी!
10
बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी
11
राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब त्यांच्यावरच फुटला, काँग्रेस-राजदच्या पराभवाची 5 कारणे...
12
आता माणसांचं आयुष्य वाढणार, १५० वर्षांपर्यंत जगणार? चीनचे शास्त्रज्ञ बनवताहेत अँटी एजिंग गोळी
13
ऐकावे ते नवलच! चीनमध्ये माशांना मिरच्या का खायला दिल्या जातायेत?; कारण ऐकून व्हाल हैराण
14
उत्पत्ती एकादशी २०२५: वाळलेले तुळशीचे पानही देईल लाभ, उत्पत्ती एकादशीला करा 'हा' उपाय!
15
घसरत्या बाजारात 'हा' डिफेन्स शेअर चमकला! खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? ब्रोकरेज फर्मने दिलं उत्तर
16
IND vs SA: पंतची विकेटमागून 'बोलंदाजी'! बावुमा कुलदीपच्या जाळ्यात अडकला! (VIDEO)
17
"निवडणूक आयोग आणि SIR जबाबदार...!"; बिहार निवडणूक निकालावरून काँग्रेस भडकली
18
Bihar Election Result: "...यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते"; संजय राऊतांचं निकालावर खळबळजनक विधान
19
बिहारमध्ये विजयी घौडदौड, मात्र पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा फटका; ८ पैकी ६ जागांवर पराभव?
20
बिहारमध्ये एनडीएला बंपर विजय कसा मिळाला? ही आहेत ५ प्रमुख कारणं
Daily Top 2Weekly Top 5

८१ वाहनांचा वापर खासगी कामांसाठी की अकोलेकरांसाठी?

By admin | Updated: April 30, 2016 01:42 IST

कचरा उचलण्यासाठी ८१ नवीन वाहनांची खरेदी.

आशीष गावंडे / अकोलाशहरातील साफसफाईची समस्या निकाली काढण्यासाठी मनपाने कचरा उचलण्यासाठी ८१ नवीन वाहनांची खरेदी केली. घरोघरी जाऊन कचरा जमा करण्यासाठी स्वयंरोजगार तत्त्वावर कर्मचारी नियुक्त केले. नागरिकही मनपाच्या उपक्रमाला साथ देत आहेत. रात्री दहानंतरही मनपाचे ह्यस्वच्छता दूतह्ण कचर्‍याची वाहतूक करताना आढळून येत असताना कचर्‍याची समस्या कायम कशी? अर्थात, या वाहनांचा वापर नेमक्या कोणत्या कामांसाठी सुरू आहे, असा प्रश्न उपस्थित होतो. नागरिकांनी घरातील, दुकानांमधील कचरा सर्व्हिस लाइनमध्ये किंवा रस्त्यावर न फेकता मनपाच्या वाहनात जमा केल्यास सार्वजनिक ठिकाणी साचणार्‍या कचर्‍याची समस्या राहणार नाही, या उद्देशातून महापालिका प्रशासनाने ८१ नवीन वाहनांची खरेदी केली. मनपा आस्थापनेवरील ७४0 सफाई कर्मचार्‍यांमधून या वाहनांसाठी चालकांची नियुक्ती केल्यास प्रशासकीय प्रभागात साफसफाईची समस्या प्रभावित होईल, हा विचार करून मनपा आयुक्त अजय लहाने यांनी स्वयंरोजगार तत्त्वावर चालकांची नियुक्ती केली. मोटारवाहन विभागाकडून वाहनांसाठी दररोज ६ ते १0 लीटर डिझेल दिले जाते. ७३ प्रभागांमध्ये प्रत्येकी दोन वाहने देण्यात आले असून त्यांना ह्यस्वच्छता दूतह्णम्हणून ओळखल्या जाते. घरोघरी जाऊन कचरा जमा करण्याच्या बदल्यात ३0 रुपये आणि दुकानदार, हॉटेल व्यावसायिकांना ५0 रुपये महिन्याची शुल्क आकारणी करण्यात आली. सकाळी ९ वाजता प्रभागातून कचरा जमा करण्याला सुरुवात झाल्यानंतर २00 ते ३00 घरातील कचरा जमा करण्यासाठी ह्यस्वच्छता दूतह्णला किमान ३ तासांचा अवधी लागतो. मोटारवाहन विभागाच्या दाव्यानुसार काही स्वच्छता दूत दिवसातून तीन ते चार वेळ तर कधी सात-आठ वेळ डम्पिंग ग्राऊंडवर कचरा नेऊन टाकतात. या विभागाचा दावा लक्षात घेता, सायंकाळी ६ पर्यंत कचर्‍याची वाहतूक होणे अपेक्षित असताना दुपारी अडीचपर्यंत बहुतांश वाहने मोटारवाहन विभागाच्या आवारात जमा असतात. काही वाहने अपवाद असून चक्क रात्री १0 पर्यंत कचर्‍याची वाहतूक करताना आढळून येत असल्याने ही प्रशासनाच्या डोळ्य़ात धूळ फेक असल्याचे दिसून येते.