शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

रब्बी हंगामासाठी लागणार ७७ हजार क्विंटल बियाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2019 12:36 IST

एकूण बियाण्यांपैकी सार्वजनिक क्षेत्रातील उत्पादकांकडून ४३७४५ क्विंटल तर खासगी उत्पादक कंपन्यांकडून ३३७९४ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा होणार आहे.

अकोला : खरिप हंगामात सतत पाऊस आल्याने पीकपेऱ्यात बदल होण्याची शक्यता गृहित धरत कृषी विभागाने रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी सुधारित नियोजन केले आहे. त्यानुसार पेरणीच्या क्षेत्रात वाढ होणार असून, १ लाख ४५ हजार ८०० हेक्टरवर पेरणीसाठी ७७ हजार ५३१ क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली. त्यामध्ये प्रामुख्याने हरभरा, गव्हाचा समावेश आहे.गेल्या तीन वर्षात रब्बी हंगामातील पेरणी क्षेत्राचा विचार केल्यास सरासरी १ लाख १५ हजार ४६६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी केली जाते. चालू वर्षात पावसातील सातत्याने खरिपात मोठे नुकसान झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे खरिपाची पिके वाया गेलेल्या क्षेत्रातही रब्बीची पेरणी होऊ शकते. त्यासाठी कृषी विभागाने रब्बी पेरणीचे सुधारित नियोजन केले. त्यानुसार जिल्ह्यात रब्बी ज्वारीचे क्षेत्र २०० हेक्टर राहणार आहे, तर गहू ३० हजार हेक्टर, हरभरा- १ लाख १५ हजार हेक्टर, करडई-२०० हेक्टर, मका- ३०० हेक्टर, सूर्यफूल- १०० हेक्टरवर पेरणी होणार आहे. त्यासाठी बियाण्यांची मागणी करण्यात आली. त्यामध्ये गहू-३०००० क्विंटल, हरभरा-४७४३८ क्विंटल लागणार आहे. एकूण बियाण्यांपैकी सार्वजनिक क्षेत्रातील उत्पादकांकडून ४३७४५ क्विंटल तर खासगी उत्पादक कंपन्यांकडून ३३७९४ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा होणार आहे. महाबीजकडून ४००४५ क्विंटल बियाणे मिळण्याची मागणी कृषी विभागाकडून करण्यात आली आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती