शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

रब्बी हंगामासाठी लागणार ७७ हजार क्विंटल बियाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2019 12:36 IST

एकूण बियाण्यांपैकी सार्वजनिक क्षेत्रातील उत्पादकांकडून ४३७४५ क्विंटल तर खासगी उत्पादक कंपन्यांकडून ३३७९४ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा होणार आहे.

अकोला : खरिप हंगामात सतत पाऊस आल्याने पीकपेऱ्यात बदल होण्याची शक्यता गृहित धरत कृषी विभागाने रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी सुधारित नियोजन केले आहे. त्यानुसार पेरणीच्या क्षेत्रात वाढ होणार असून, १ लाख ४५ हजार ८०० हेक्टरवर पेरणीसाठी ७७ हजार ५३१ क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली. त्यामध्ये प्रामुख्याने हरभरा, गव्हाचा समावेश आहे.गेल्या तीन वर्षात रब्बी हंगामातील पेरणी क्षेत्राचा विचार केल्यास सरासरी १ लाख १५ हजार ४६६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी केली जाते. चालू वर्षात पावसातील सातत्याने खरिपात मोठे नुकसान झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे खरिपाची पिके वाया गेलेल्या क्षेत्रातही रब्बीची पेरणी होऊ शकते. त्यासाठी कृषी विभागाने रब्बी पेरणीचे सुधारित नियोजन केले. त्यानुसार जिल्ह्यात रब्बी ज्वारीचे क्षेत्र २०० हेक्टर राहणार आहे, तर गहू ३० हजार हेक्टर, हरभरा- १ लाख १५ हजार हेक्टर, करडई-२०० हेक्टर, मका- ३०० हेक्टर, सूर्यफूल- १०० हेक्टरवर पेरणी होणार आहे. त्यासाठी बियाण्यांची मागणी करण्यात आली. त्यामध्ये गहू-३०००० क्विंटल, हरभरा-४७४३८ क्विंटल लागणार आहे. एकूण बियाण्यांपैकी सार्वजनिक क्षेत्रातील उत्पादकांकडून ४३७४५ क्विंटल तर खासगी उत्पादक कंपन्यांकडून ३३७९४ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा होणार आहे. महाबीजकडून ४००४५ क्विंटल बियाणे मिळण्याची मागणी कृषी विभागाकडून करण्यात आली आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती