शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील ७५ हजारांवर ग्रामीण शाळांचे अस्तित्व धोक्यात

By admin | Updated: May 22, 2015 01:55 IST

पटसंख्येत घट होत असल्यामुळे आता शिक्षकांना विद्यार्थ्यांसाठी भटकंती करण्याची पाळी आली आहे.

हर्षनंदन वाघ/बुलडाणा : सध्या शहरी भागातील शाळांच्या शिक्षकांनी ग्रामीण भागात विद्यार्थी शोधमोहीम सुरू केली आहे. त्यातच ग्रामीण भागातील पालकांचाही कल आता आपल्या पाल्यांना शहरात शिकविण्याकडे वाढत असल्याने व शहरी भागात कॉन्व्हेंट संस्कृती वाढल्याने ग्रामीण भागातील शाळांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. घटती पटसंख्या, पाच दिवसांचा आठवडा याचाही परिणाम या शाळांवर होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात असलेल्या राज्यातील जवळपास ७५ हजार ५६ शाळा अडचणीत आल्या आहेत. राज्यातील विविध शहरांसह ग्रामीण भागातील एकही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून शासनाने शाळांची मोठय़ा प्रमाणात खैरात वाटली होती. त्यामुळे राज्यातील शाळांची संख्या १ लाख ७ हजारांवर पोहोचली. त्यात ग्रामीण भागातील ७५ हजार ५६ शाळांचा समावेश आहे. छोट्या-छोट्या गावांतही माध्यमिक शाळा सुरू झाल्या. दुसरीकडे शाळा वाढल्या असल्या तरी ग्रामीण भागातील लोकसंख्या स्थिर आहे. त्यातच ग्रामीण भागातील नागरिकांचा कल आता शहराकडे वाढल्याने लोक गाव सोडून शहरात स्थिरावले आहेत. जे गावाकडे आहेत, त्यांची मुले बहुतांश शहरातील शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या दिवसेंदिवस घटत आहे. अनेक शाळांना तर विद्यार्थीच मिळत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातच विद्यार्थी मिळवण्यासाठी शिक्षकांना घरोघरी फिरावे लागत असताना शहरी भागातील शिक्षकही विद्यार्थ्यांच्या शोधात ग्रामीण भागात फिरत आहेत. अशा स्थितीत गावातील शाळा भकास पडण्याची चिन्हे आहेत. विद्यार्थी शाळेत दाखल व्हावा, यासाठी शाळांमार्फत गणवेशासह विद्यार्थ्यांना लागणारे इतर सर्व साहित्य देण्याचे आश्‍वासन दिले जाते. यामध्ये गावातून विद्यार्थ्याला शाळेत ये-जा करण्याची व्यवस्थाही शाळाच करीत आहेत. * पालकांचा कल इंग्रजी शाळांकडेग्रामीण भागातील विद्यार्थी व पालकांचा कल इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे असल्याने मराठी शाळांमध्ये शुकशुकाट दिसून येतो. शहरात गल्लोगल्ली कॉन्व्हेंटला उधाण आले असताना ग्रामीण भागातही हे फॅड वाढीस लागले आहे. शहरात आता विद्यार्थी मिळत नाही, हे शहरी शाळा व्यवस्थापनाच्या लक्षात आल्याने व वाढत्या स्पर्धेला तोंड देत शाळा सुरू ठेवण्यासाठी शाळा व्यवस्थापनाने शिक्षकांना विद्यार्थी शोधमोहिमेवर लावले आहे. बुलडाणा जिल्ह्यात २ हजार ३६४ शाळाबुलडाणा जिल्ह्यात शासनाने २ हजार ३६४ शाळा सुरू केल्या आहेत. त्यापैकी ग्रामीण भागातील १ हजार ७९४ शाळा आहेत. या शाळांपैकी काही आदिवासी, दुर्गम भागात आहेत. शासनाने खासगी संस्थांना दिलेल्या आश्रमशाळा, शहरी भागात वसतिगृहाची सोय तसेच नागरिकांचा राहणीमानाचा वाढलेल्या दर्जा आदी कारणांमुळे ग्रामीण भागातील शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या कमी होत आहे.