शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
2
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
3
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
4
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
5
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
6
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
7
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
8
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
9
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
10
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
11
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे कंपनीची चांदी! शेअरमध्ये १०% वाढ, ३ महिन्यात ६२ टक्के परतावा
13
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
14
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
15
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
16
गोकुळाष्टमी स्पेशल: गोकुळाष्टमीला करा सात्त्विक चवीचा पंचामृत केक; घरचे बालगोपाळ होतील खुश
17
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
18
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
19
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
20
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...

राज्यातील ७५ हजारांवर ग्रामीण शाळांचे अस्तित्व धोक्यात

By admin | Updated: May 22, 2015 01:55 IST

पटसंख्येत घट होत असल्यामुळे आता शिक्षकांना विद्यार्थ्यांसाठी भटकंती करण्याची पाळी आली आहे.

हर्षनंदन वाघ/बुलडाणा : सध्या शहरी भागातील शाळांच्या शिक्षकांनी ग्रामीण भागात विद्यार्थी शोधमोहीम सुरू केली आहे. त्यातच ग्रामीण भागातील पालकांचाही कल आता आपल्या पाल्यांना शहरात शिकविण्याकडे वाढत असल्याने व शहरी भागात कॉन्व्हेंट संस्कृती वाढल्याने ग्रामीण भागातील शाळांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. घटती पटसंख्या, पाच दिवसांचा आठवडा याचाही परिणाम या शाळांवर होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात असलेल्या राज्यातील जवळपास ७५ हजार ५६ शाळा अडचणीत आल्या आहेत. राज्यातील विविध शहरांसह ग्रामीण भागातील एकही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून शासनाने शाळांची मोठय़ा प्रमाणात खैरात वाटली होती. त्यामुळे राज्यातील शाळांची संख्या १ लाख ७ हजारांवर पोहोचली. त्यात ग्रामीण भागातील ७५ हजार ५६ शाळांचा समावेश आहे. छोट्या-छोट्या गावांतही माध्यमिक शाळा सुरू झाल्या. दुसरीकडे शाळा वाढल्या असल्या तरी ग्रामीण भागातील लोकसंख्या स्थिर आहे. त्यातच ग्रामीण भागातील नागरिकांचा कल आता शहराकडे वाढल्याने लोक गाव सोडून शहरात स्थिरावले आहेत. जे गावाकडे आहेत, त्यांची मुले बहुतांश शहरातील शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या दिवसेंदिवस घटत आहे. अनेक शाळांना तर विद्यार्थीच मिळत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातच विद्यार्थी मिळवण्यासाठी शिक्षकांना घरोघरी फिरावे लागत असताना शहरी भागातील शिक्षकही विद्यार्थ्यांच्या शोधात ग्रामीण भागात फिरत आहेत. अशा स्थितीत गावातील शाळा भकास पडण्याची चिन्हे आहेत. विद्यार्थी शाळेत दाखल व्हावा, यासाठी शाळांमार्फत गणवेशासह विद्यार्थ्यांना लागणारे इतर सर्व साहित्य देण्याचे आश्‍वासन दिले जाते. यामध्ये गावातून विद्यार्थ्याला शाळेत ये-जा करण्याची व्यवस्थाही शाळाच करीत आहेत. * पालकांचा कल इंग्रजी शाळांकडेग्रामीण भागातील विद्यार्थी व पालकांचा कल इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे असल्याने मराठी शाळांमध्ये शुकशुकाट दिसून येतो. शहरात गल्लोगल्ली कॉन्व्हेंटला उधाण आले असताना ग्रामीण भागातही हे फॅड वाढीस लागले आहे. शहरात आता विद्यार्थी मिळत नाही, हे शहरी शाळा व्यवस्थापनाच्या लक्षात आल्याने व वाढत्या स्पर्धेला तोंड देत शाळा सुरू ठेवण्यासाठी शाळा व्यवस्थापनाने शिक्षकांना विद्यार्थी शोधमोहिमेवर लावले आहे. बुलडाणा जिल्ह्यात २ हजार ३६४ शाळाबुलडाणा जिल्ह्यात शासनाने २ हजार ३६४ शाळा सुरू केल्या आहेत. त्यापैकी ग्रामीण भागातील १ हजार ७९४ शाळा आहेत. या शाळांपैकी काही आदिवासी, दुर्गम भागात आहेत. शासनाने खासगी संस्थांना दिलेल्या आश्रमशाळा, शहरी भागात वसतिगृहाची सोय तसेच नागरिकांचा राहणीमानाचा वाढलेल्या दर्जा आदी कारणांमुळे ग्रामीण भागातील शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या कमी होत आहे.