शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

२३ ग्रामपंचायतींमधील २२१ सदस्यांसाठी पातुर तालुक्यात ७३९ नामांकने दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:19 IST

तालुक्यातील शिर्ला मलकापूर, तांदळी बुद्रूक, पिंपळखुटा, राहेर, उमरा, विवरा, चतारी, चांगेफळ, चांन्नी सायवनी, मळसुर, भंडारज बुद्रूक, दिग्रस बुद्रूक, आलेगाव ...

तालुक्यातील शिर्ला मलकापूर, तांदळी बुद्रूक, पिंपळखुटा, राहेर, उमरा, विवरा, चतारी, चांगेफळ, चांन्नी सायवनी, मळसुर, भंडारज बुद्रूक, दिग्रस बुद्रूक, आलेगाव चरणगाव, पास्टूल, खानापूर बेलुरा बुद्रूक, बेलुरा खुर्द, दिग्रस खुर्द, सस्ती, देऊळगाव येथील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होत आहे.

पातुर तालुक्यातील २३ ग्रामपंचायतींच्या ८१ वॉर्डांतील २२१ जागांसाठी अखेरच्या दिवसापर्यंत ७३९ नामांकने दाखल झाली आहेत.

प्रामुख्याने तालुक्यातील सर्वांत मोठ्या लक्षवेधी ग्रामपंचायतीमध्ये शिर्ला सहा वॉर्डांतील १७ जागांसाठी ९५ अर्ज, आलेगाव सहा वॉर्डांतील १७ जागांसाठी ८९ अर्ज, पिंपळखुटा चार वॉर्डांतील ११ जागांसाठी ४० अर्ज, विवरा येथील चार वॉर्डांतील ११ जागांसाठी ४६ अर्ज, मलकापूर तीन वॉर्डांतील सात जागांसाठी १९ अर्ज, राहेर येथील तीन वॉर्डांतील नऊ जागांसाठी २१ अर्ज, उमरा येथील चार वॉर्डांतील ११ जागांसाठी २७ अर्ज, चतारी येथील तीन वॉर्डांतील नऊ जागांसाठी ३४ अर्ज, चांगेफळ येथील तीन वॉर्डांतील नऊ जागांसाठी ३७ अर्ज, चांन्नीच्या तीन वॉर्डांतील नऊ जागांसाठी ३४ अर्ज, सायवनीच्या तीन वॉर्डांतील सात जागांसाठी १४ अर्ज, मळसुर चार वॉर्डांतील ११ जागांसाठी ३३ अर्ज, भंडाराज बुद्रूकच्या तीन वॉर्डांतील सात जागांसाठी १८ अर्ज, दिग्रस बुद्रूकच्या तीन वॉर्डांतील नऊ जागांसाठी २८ अर्ज, चरणगावच्या तीन वॉर्डांतील नऊ जागांसाठी ३६ अर्ज, पास्टुलच्या तीन वॉर्डांतील सात जागांसाठी १३ अर्ज, खानापूरच्या तीन वॉर्डांतील नऊ जागांसाठी १३ अर्ज, बेलुरा बुद्रूकच्या तीन वॉर्डांतील सात जागांसाठी १७ अर्ज, बेलुरा खुर्दच्या तीन वॉर्डांतील सात जागांसाठी १३ अर्ज, दिग्रस खुर्दच्या तीन वॉर्डांतील सात जागांसाठी २२ अर्ज, सस्तीच्या पाच वॉर्डांतील १३ जागांसाठी ३२ अर्ज, देऊळगावच्या तीन वॉर्डांतील नऊ जागांसाठी ३० अर्ज या अनुषंगाने नामांकने दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी गर्दी, गोंधळ आणि प्रचंड उत्साहात लोकांनी सादर केली.

प्रामुख्याने पातुर तालुक्यातील लक्षवेधी ग्रामपंचायत शिरला येथील एका पॅनलच्या १७ उमेदवारांनी वाजतगाजत तहसील कार्यालय गाठले आणि एकाच वेळेस १७ नामांकने दाखल केली.

नामांकनं दाखल करणाऱ्या २३ ग्रामपंचायतींतील ७३९ उमेदवारांपैकी बहुतांशी उमेदवार २० ते ४०च्या वयोगटातील असल्यामुळे या ग्रामपंचायतींची सत्ता तरुणांच्या हातात जाईल असं काहीसं चित्र नामांकन दाखल करण्याच्या कालावधीमध्ये बघायला मिळालं.