शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
2
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
3
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!
4
आठ महिन्यांत चौघांची हत्या; २० वर्षांच्या गँगस्टरचा एन्काऊंटरमध्ये खात्मा, VIDEO आला समोर
5
"कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले? कुठायत मराठी क्रिकेटपटू?"; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सवाल
6
खासदार प्रिया सरोज आणि क्रिकेटर रिंकू सिंह यांच्या लग्नाची तारीख टळली; समोर आलं मोठं कारण...
7
धारावीतील २४९ पैकी १६१ बांधकामे पात्र, पहिली यादी जाहीर; अपात्र लोकांना ५ जुलैपर्यंत संधी
8
इराणने कमी क्षमतेच्या मिसाईल डागल्या अन् अमेरिकेने त्या पडू दिल्या...; कतारवरील हल्ल्यामागचे गुपित कुणाला कळले...
9
सोहेलसोबत पळून जाऊन केलेलं लग्न, मग २४ वर्षांनी का झाला घटस्फोट? सीमा सजदेहने सांगितलं खरं कारण
10
कसली भारी दिसत्येय 'सैराट'मधील परश्याचा मित्र 'लंगड्या'ची गर्लफ्रेंड, सौंदर्यात नायिकांनाही देते टक्कर!
11
ठाणे: आणखी २ इमारतींवर हातोडा, मुंब्रा-शीळच्या बेकायदा इमारतींमधील रहिवासी रस्त्यावर
12
मध्य पूर्वेतील तणाव, हिंडगनबर्गचे आरोप अन् धारावी प्रकल्प; गौतम अदानी स्पष्टच बोलले
13
युद्धविरामाबाबतचा संभ्रम संपला, अखेर इस्राइल-इराणमधील संघर्ष आटोपला, पण अखेरचा हल्ला करत इराण म्हणाला...  
14
इराण-इस्रायल युद्धबंदीमुळे बाजार 'रॉकेट'; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
15
कोण आहे अलीफा अहमद?; पती डॉक्टर तर स्वत: TCS मध्ये करत होती नोकरी; आता बनल्या आमदार
16
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?
17
UPI युजर्ससाठी मोठी बातमी! ट्रान्झॅक्शन फेल झालं तर लगेच मिळणार रिफंड; 'या' तारखेपासून लागू होणार नियम
18
पंतचा पराक्रम, एकाच कसोटीत दोन शतकं ठोकताना केले १० विक्रम, अशी आहे संपूर्ण यादी
19
पावसाने पाठ फिरवल्याने विदर्भासह मराठवाड्यात अत्यंत भीषण अवस्था !
20
भंगाराखाली दडलंय काय?; ट्रक रोखला, तपासणी केली तेव्हा आढळला १ कोटींचा 'गुलाबी खजिना'

पोलिस दलातील ७00 कर्मचार्‍यांच्या बदल्या

By admin | Updated: May 22, 2014 20:10 IST

पोलिस अधीक्षक कार्यालयात हजेरीस प्रारंभ

अकोला : निवडणुकीची धामधूम संपताच पोलिस दलामध्ये बदल्यांचे वारे सुरू झाले आहे. पोलिस ठाण्यांमध्ये दोन वर्ष पूर्ण केलेल्या जवळपास ७00 पोलिस कर्मचार्‍यांच्या बदल्या होणार आहेत. बदल्यासंदर्भात बुधवारपासून पोलिस अधीक्षक कार्यालयातील पोलिस कर्मचार्‍यांनी पोलिस अधीक्षक वीरेंद्र मिश्र यांच्यासमक्ष हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. बुधवारी दुपारी १५0 पोलिस कर्मचार्‍यांनी पोलिस अधीक्षक वीरेंद्र मिश्र यांच्यासमोर हजेरी लावली. जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांमध्ये कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचार्‍यांना दोन वर्ष पूर्ण झाले आहेत. अशा कर्मचार्‍यांकडून पोलिस अधीक्षक कार्यालयाने बदलीसाठी अर्ज मागितले होते. त्यासाठी ३१ मार्च ही शेवटची तारीख ठेवली. त्यानंतर पुन्हा तारीख वाढविण्यात आली. जिल्ह्यामध्ये जवळपास २१00 संख्याबळ आहे. शासन नियमाप्रमाणे मंजूर संख्या बळाच्या ३0 टक्के कर्मचार्‍याच्या बदल्या करता येतात. अनेक पोलिसांनी बदलीसाठी विनंती अर्जासह प्रशासकीय बदलीच्या दृष्टिकोनातून अर्ज केले आहे. विनंती अर्जामध्ये पती-पत्नी एकत्रीकरणाचा समावेश असल्याने, अनेकांनी अर्ज केले आहेत. बुधवारी जिल्ह्यातील बदलीसाठी अर्ज केलेल्या १५0 पोलिस कर्मचार्‍यांनी पोलिस अधीक्षक वीरेंद्र मिश्र यांची भेट घेतली. भेटीदरम्यान पोलिस अधीक्षक मिश्र यांनी पोलिस कर्मचार्‍यांचा अडीअडचणी जाणून घेत, त्यांना विनंतीवरून का बदली हवी आहे. याबाबत चौकशीसुद्धा केली. चौकशीदरम्यान पोलिस अधीक्षकांना बदलीसाठी विनंती अर्ज केलेल्या पोलिस कर्मचार्‍यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर त्यांची समस्या फार मोठी नसल्याने त्यांच्या सोयीनुसार बदली देता येणार नसल्याचे स्पष्ट केले आणि प्रशासकीय सोयीनुसारच बदली होईल, असे स्पष्ट केले. बदल्यांसाठी पोलिस अधीक्षक वीरेंद्र मिश्र यांच्या भेटीचा कार्यक्रम आणखी चार ते पाच दिवस चालणार आहे. २७ किंवा २८ मे रोजी पोलिस कर्मचार्‍यांच्या बदल्यांसंदर्भातील यादी तयार होईल आणि त्यानुसार पोलिस कर्मचार्‍यांच्या बदल्या करण्यात येणार आहेत. जवळपासचे पोलिस ठाणे मिळावे किंवा शहरातीलच पोलिस ठाणे देण्यात यावे, यासाठी अनेक पोलिस कर्मचारी आपआपल्या दृष्टीने प्रयत्न करीत असल्याचे समजते.