शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

पोलिस दलातील ७00 कर्मचार्‍यांच्या बदल्या

By admin | Updated: May 22, 2014 20:10 IST

पोलिस अधीक्षक कार्यालयात हजेरीस प्रारंभ

अकोला : निवडणुकीची धामधूम संपताच पोलिस दलामध्ये बदल्यांचे वारे सुरू झाले आहे. पोलिस ठाण्यांमध्ये दोन वर्ष पूर्ण केलेल्या जवळपास ७00 पोलिस कर्मचार्‍यांच्या बदल्या होणार आहेत. बदल्यासंदर्भात बुधवारपासून पोलिस अधीक्षक कार्यालयातील पोलिस कर्मचार्‍यांनी पोलिस अधीक्षक वीरेंद्र मिश्र यांच्यासमक्ष हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. बुधवारी दुपारी १५0 पोलिस कर्मचार्‍यांनी पोलिस अधीक्षक वीरेंद्र मिश्र यांच्यासमोर हजेरी लावली. जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांमध्ये कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचार्‍यांना दोन वर्ष पूर्ण झाले आहेत. अशा कर्मचार्‍यांकडून पोलिस अधीक्षक कार्यालयाने बदलीसाठी अर्ज मागितले होते. त्यासाठी ३१ मार्च ही शेवटची तारीख ठेवली. त्यानंतर पुन्हा तारीख वाढविण्यात आली. जिल्ह्यामध्ये जवळपास २१00 संख्याबळ आहे. शासन नियमाप्रमाणे मंजूर संख्या बळाच्या ३0 टक्के कर्मचार्‍याच्या बदल्या करता येतात. अनेक पोलिसांनी बदलीसाठी विनंती अर्जासह प्रशासकीय बदलीच्या दृष्टिकोनातून अर्ज केले आहे. विनंती अर्जामध्ये पती-पत्नी एकत्रीकरणाचा समावेश असल्याने, अनेकांनी अर्ज केले आहेत. बुधवारी जिल्ह्यातील बदलीसाठी अर्ज केलेल्या १५0 पोलिस कर्मचार्‍यांनी पोलिस अधीक्षक वीरेंद्र मिश्र यांची भेट घेतली. भेटीदरम्यान पोलिस अधीक्षक मिश्र यांनी पोलिस कर्मचार्‍यांचा अडीअडचणी जाणून घेत, त्यांना विनंतीवरून का बदली हवी आहे. याबाबत चौकशीसुद्धा केली. चौकशीदरम्यान पोलिस अधीक्षकांना बदलीसाठी विनंती अर्ज केलेल्या पोलिस कर्मचार्‍यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर त्यांची समस्या फार मोठी नसल्याने त्यांच्या सोयीनुसार बदली देता येणार नसल्याचे स्पष्ट केले आणि प्रशासकीय सोयीनुसारच बदली होईल, असे स्पष्ट केले. बदल्यांसाठी पोलिस अधीक्षक वीरेंद्र मिश्र यांच्या भेटीचा कार्यक्रम आणखी चार ते पाच दिवस चालणार आहे. २७ किंवा २८ मे रोजी पोलिस कर्मचार्‍यांच्या बदल्यांसंदर्भातील यादी तयार होईल आणि त्यानुसार पोलिस कर्मचार्‍यांच्या बदल्या करण्यात येणार आहेत. जवळपासचे पोलिस ठाणे मिळावे किंवा शहरातीलच पोलिस ठाणे देण्यात यावे, यासाठी अनेक पोलिस कर्मचारी आपआपल्या दृष्टीने प्रयत्न करीत असल्याचे समजते.