शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

७९५ शेतकऱ्यांना सौर कृषी पंपाचा आधार

By admin | Updated: April 24, 2017 01:54 IST

अकोला परिमंडळ : महावितरणचे सहकार्य

अकोला: शेतकऱ्यांना अपारंपरिक ऊर्जा स्रोताद्वारे सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र व राज्य शासनाच्या वतीने महावितरणच्या साहाय्याने सुरू करण्यात आलेल्या अटल सौर ऊर्जा कृषी पंप योजनेंतर्गत अकोला परिमंडळातील तीन जिल्ह्यांमध्ये मार्च, २०१७ अखेरपर्यंत ७९५ सौर ऊर्जा पंप कार्यान्वित झाले आहेत. अकोला, बुलडाणा व वाशिम या तीन जिल्ह्यांसाठी सौर पंपांचे एकूण उद्दिष्ट ३,९६० असून, यापैकी केवळ ७९५ पंप कार्यान्वित झाल्याने या योजनेच्या गतीला काहीशी खीळ बसल्याचे चित्र आहे.पारंपरिक वीजनिर्मितीकरिता असलेल्या मर्यादा आणि वाढती मागणी, यामुळे वीज भारनियमन केले जाते. शेतकऱ्यांच्या कृषी पंपाला पुरेशी वीज उपलब्ध होत नाही. विहिरींना पाणी असूनही केवळ विजेअभावी सिंचनात अडथळे येतात. यावर तोडगा म्हणून शेतकऱ्यांना अनुदानावर सौर कृषी पंप वितरित करण्याची योजना सुरू करण्यात आली आहे. यामध्ये लाभार्थी शेतकऱ्यांना ७.५ अश्वशक्तीपासून ते तीन अश्वशक्ती क्षमतेचा सौर ऊर्जेवर चालणारा कृषी पंप देण्यात येतो. दहा एकरांपर्यंत शेती असलेले शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत. यासाठी लाभार्थी हिस्सा म्हणून शेतकऱ्याला केवळ पाच टक्के रक्कम भरावी लागते. केंद्र सरकार ३० टक्के, तर राज्य सरकार पाच टक्के अनुदान देते. उर्वरित ६० टक्के रक्कम कर्ज स्वरूपात उपलब्ध करून देणार असून, हे कर्ज महावितरण टप्प्याटप्प्याने फेडणार आहे. म्हणजे शेतकऱ्याला केवळ पाच टक्के रक्कम भरून सौर कृषी पंप मिळविता येतो. ३१ मार्च २०१७ पर्यंत अकोला, वाशिम व बुलडाणा जिल्ह्यातील ३,८७३ शेतकऱ्यांनी या योजनेसाठी अर्ज भरले. यापैकी ३,१४० शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर झाले असून, त्यापैकी २,९७३ शेतकऱ्यांनी कोटेशन भरले आहे. यापैकी १,३३९ शेतकऱ्यांनी लाभार्थी हिस्सा भरला आहे. या योजनेंतर्गत अकोला जिल्ह्यात २४८, बुलडाणा जिल्ह्यात ३२१, तर वाशिम जिल्ह्यात २२६ शेतकऱ्यांच्या शेतात सौर कृषी पंप कार्यान्वित झाले आहेत.