शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
3
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
4
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
5
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
8
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
9
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
10
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
11
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
12
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
13
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
14
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
15
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
16
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
17
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
18
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
19
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
20
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के

७९५ शेतकऱ्यांना सौर कृषी पंपाचा आधार

By admin | Updated: April 24, 2017 01:54 IST

अकोला परिमंडळ : महावितरणचे सहकार्य

अकोला: शेतकऱ्यांना अपारंपरिक ऊर्जा स्रोताद्वारे सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र व राज्य शासनाच्या वतीने महावितरणच्या साहाय्याने सुरू करण्यात आलेल्या अटल सौर ऊर्जा कृषी पंप योजनेंतर्गत अकोला परिमंडळातील तीन जिल्ह्यांमध्ये मार्च, २०१७ अखेरपर्यंत ७९५ सौर ऊर्जा पंप कार्यान्वित झाले आहेत. अकोला, बुलडाणा व वाशिम या तीन जिल्ह्यांसाठी सौर पंपांचे एकूण उद्दिष्ट ३,९६० असून, यापैकी केवळ ७९५ पंप कार्यान्वित झाल्याने या योजनेच्या गतीला काहीशी खीळ बसल्याचे चित्र आहे.पारंपरिक वीजनिर्मितीकरिता असलेल्या मर्यादा आणि वाढती मागणी, यामुळे वीज भारनियमन केले जाते. शेतकऱ्यांच्या कृषी पंपाला पुरेशी वीज उपलब्ध होत नाही. विहिरींना पाणी असूनही केवळ विजेअभावी सिंचनात अडथळे येतात. यावर तोडगा म्हणून शेतकऱ्यांना अनुदानावर सौर कृषी पंप वितरित करण्याची योजना सुरू करण्यात आली आहे. यामध्ये लाभार्थी शेतकऱ्यांना ७.५ अश्वशक्तीपासून ते तीन अश्वशक्ती क्षमतेचा सौर ऊर्जेवर चालणारा कृषी पंप देण्यात येतो. दहा एकरांपर्यंत शेती असलेले शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत. यासाठी लाभार्थी हिस्सा म्हणून शेतकऱ्याला केवळ पाच टक्के रक्कम भरावी लागते. केंद्र सरकार ३० टक्के, तर राज्य सरकार पाच टक्के अनुदान देते. उर्वरित ६० टक्के रक्कम कर्ज स्वरूपात उपलब्ध करून देणार असून, हे कर्ज महावितरण टप्प्याटप्प्याने फेडणार आहे. म्हणजे शेतकऱ्याला केवळ पाच टक्के रक्कम भरून सौर कृषी पंप मिळविता येतो. ३१ मार्च २०१७ पर्यंत अकोला, वाशिम व बुलडाणा जिल्ह्यातील ३,८७३ शेतकऱ्यांनी या योजनेसाठी अर्ज भरले. यापैकी ३,१४० शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर झाले असून, त्यापैकी २,९७३ शेतकऱ्यांनी कोटेशन भरले आहे. यापैकी १,३३९ शेतकऱ्यांनी लाभार्थी हिस्सा भरला आहे. या योजनेंतर्गत अकोला जिल्ह्यात २४८, बुलडाणा जिल्ह्यात ३२१, तर वाशिम जिल्ह्यात २२६ शेतकऱ्यांच्या शेतात सौर कृषी पंप कार्यान्वित झाले आहेत.