शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

बाजार समितीत गव्हाची ६८० क्विंटल आवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:19 IST

यावर्षीच्या खरीप हंगामात प्रतिकूल वातावरण, अतिवृष्टी, कीड व राेगांचा प्रादुर्भाव यामुळे दाेन्ही साेयाबीनचे पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. शिवाय, गुलाबी ...

यावर्षीच्या खरीप हंगामात प्रतिकूल वातावरण, अतिवृष्टी, कीड व राेगांचा प्रादुर्भाव यामुळे दाेन्ही साेयाबीनचे पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. शिवाय, गुलाबी बाेंडअळी आणि बाेंडसडमुळे कापसाच्या उत्पादनात प्रचंड घट आली. तुरीला किडीचा फटका बसल्याने उत्पादनात घट झाली. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी गहू व हरभरा या रब्बीच्या पिकांवर लक्ष केंद्रित केले हाेते.

सुरुवातीच्या काळात या दाेन्ही पिकांची अवस्था चांगली हाेती. अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या असल्या तरी या पावसामुळे दाेन्ही पिकांचे फारसे नुकसान झाले नाही. त्यामुळे दाेन्ही शेतमालाला चांगला भाव मिळण्याची आशा शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाली हाेती. शेतकऱ्यांनी दाेन्ही शेतमाल मळणी करून बाजारात विकायला आणला असता, गव्हाला प्रति क्विंटल १६०० ते १८७५ रुपये आणि हरभऱ्याला प्रति क्विंटल ४२०० रुपये ते ४७५० रुपये भाव मिळत आहे. शेतकऱ्यांकडे मुबलक प्रमाणात गहू उपलब्ध नव्हता. परिणामी बाजारातील गव्हाच्या किमती वाढल्या होत्या. आता नवीन गहू बाजारात दाखल झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

--बॉक्स--

हमीभावाने खरेदी केव्हा?

शासनाच्यावतीने जिल्ह्यात केवळ हरभऱ्याची खरेदी केली जात असून, गव्हाची खरेदी केली जात नाही. मागील चार-पाच वर्षाआधी मार्केटींग फेडरेशनच्या माध्यमातून गहू खरेदी केली गेली; मात्र आता शासनाकडून जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला खरेदीचे कुठलेही आदेश देण्यात आले नाही. त्यामुळे शासनाने गहू खरेदी केंद्र सुरू न केल्याने बाजारातील स्पर्धा कमी झाल्याचा आराेपही काही शेतकऱ्यांनी केला आहे.