शहरं
Join us  
Trending Stories
1
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
2
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
3
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
4
नोकरी खाजगी, पैसा सरकारी! पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजनेचं पोर्टल सुरू, किती मिळणार पैसे?
5
आईने दोन पेग घेतले, त्यानंतर..., निळ्या ड्रमातील मृतदेह प्रकरणात मुलाने दिली धक्कादायक माहिती  
6
Asia Cup 2025 : त्याची काही चूक नाही, पण... आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? पुन्हा तोच रिप्लाय
7
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?
8
Mumbai Rain Updates Live: पावसात अडकलेल्यांसाठी मुंबई महापालिका सरसावली; पाणी, खाद्यपदार्थांचे वाटप
9
मालिकेसाठी कायपण! शूटिंगसाठी मंदार आणि गिरिजा प्रभूचा कमरेभर पाण्यातून जीवघेणा प्रवास, व्हिडीओ समोर
10
नाथपंथीय दीक्षा, माऊलींची परंपरा, स्वामीकृपा; ‘सोऽहम’मंत्र देणारे पावसचे स्वामी स्वरुपानंद
11
वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले...
12
बॉयफ्रेंडसोबत राहण्याचा हट्ट, आईने १२ वर्षांच्या मुलीचं स्वतःच्या प्रियकराशी लग्न; नंतर पतीचा काटा काढला अन्.. 
13
आता रेल्वे प्रवासात कितीही सामान नेता येणार नाही, लवकरच निश्चित होतोय नियम; जाणून घ्या, कोणत्या क्लाससाठी किती मर्यादा?
14
'आम्हाला मतदान करा, राहुल गांधींना देशाचे पंतप्रधान करू', तेजस्वी यादवांची घोषणा
15
Thane: पावसाचा कहर, त्यात रस्त्यावरील पाण्यात साप; ठाणे शहरातील हा व्हिडीओ बघा
16
Mumbai Rains: मुंबईकरांसमोर आणखी एक संकट, मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली, सतर्क राहण्याचा इशारा!
17
डॉक्टर सांगतात, सणासुदीला तळणीसाठी 'या' तेलाची निवड करा; ना वजन वाढणार, ना तब्येत बिघडणार 
18
गाझामध्ये 'हा' धोकादायक आजार का पसरतोय वेगाने? उपचारही झालेत अशक्य; डॉक्टरांची डोकेदुखी वाढली!
19
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
20
"बहुत तेज बारिश है!" टीम इंडियाच्या सिलेक्शनसाठी IPL छत्रीतून सूर्या दादाची कडक एन्ट्री; व्हिडिओ व्हायरल

६४ गावे तहानलेलीच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 01:13 IST

जिल्ह्यातल्या खांबोराजवळील उन्नई बंधार्‍यातील पाणी  संपल्याने खारपाणपट्टय़ातील  खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा  योजनेंतर्गत ६४ गावांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला असून,   पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना  पायपीट करावी लागत आहे. गत  २५ दिवसांपासून पाणी मिळाले नसल्याने ६४ खेडी तहानलेलीच  असताना, पाणीपुरवठय़ाची कोणतीही उपाययोजना अद्याप   करण्यात आली नाही. त्यामुळे यासंदर्भात जिल्हा प्रशासन उदासीन  असल्याचे वास्तव समोर येत असून, पाणीटंचाईग्रस्त गावांना  पाणीपुरवठा करण्यासाठी उपाययोजना केव्हा होणार, असा प्रश्न  उपस्थित केला जात आहे.

ठळक मुद्दे२५ दिवसांपासून मिळाले नाही पाणी उपाययोजना केव्हा होणार?दूषित पाण्याचा वापर; आरोग्य धोक्यात!

संतोष येलकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यातल्या खांबोराजवळील उन्नई बंधार्‍यातील पाणी  संपल्याने खारपाणपट्टय़ातील  खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा  योजनेंतर्गत ६४ गावांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला असून,   पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना  पायपीट करावी लागत आहे. गत  २५ दिवसांपासून पाणी मिळाले नसल्याने ६४ खेडी तहानलेलीच  असताना, पाणीपुरवठय़ाची कोणतीही उपाययोजना अद्याप   करण्यात आली नाही. त्यामुळे यासंदर्भात जिल्हा प्रशासन उदासीन  असल्याचे वास्तव समोर येत असून, पाणीटंचाईग्रस्त गावांना  पाणीपुरवठा करण्यासाठी उपाययोजना केव्हा होणार, असा प्रश्न  उपस्थित केला जात आहे.यावर्षीचा पावसाळा सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटून  गेला; मात्र दमदार पाऊस झाला नसल्याने, जिल्हय़ातील  धरणांमधील जलसाठय़ात अद्यापही वाढ झाली नाही. त्यामध्ये  अकोला शहरासह खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४  गावांना पाणीपुरवठा करणार्‍या महान येथील काटेपूर्णा धरणात अ त्यल्प जलसाठा उपलब्ध असल्याने, या धरणातील जलसाठा  अकोला शहर पाणीपुरवठा योजनेसाठी आरक्षित असून, खांबोरा  प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी धरणातून पाणीपुरवठा बंद  करण्यात आला आहे. त्यामुळे  खांबोराजवळील उन्नई बंधार्‍यातून  खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना आठ  दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत होता; परंतु उन्नई बंधार्‍या तील पाणी संपल्याने खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत  गावांचा पाणीपुरवठा गत ७ ऑगस्टपासून बंद करण्यात आला  आहे. त्यामुळे योजनेंतर्गत ६४ गावांमध्ये पावसाळ्याच्या दिवसांत  जलसंकटाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी  ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. गत २५ दिवसांपासून  पाणीपुरवठा बंद असल्याने, तहानलेल्या गावांसाठी तातडीने पाणी पुरवठा करण्याची कोणतीही उपाययोजना जिल्हा परिषद आणि  जिल्हा प्रशासनामार्फत अद्याप करण्यात आली नाही. त्यामुळे  गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी उपाययोजना केव्हा होणार आणि  पिण्याचे पाणी केव्हा मिळणार, असा प्रश्न ६४ गावांमधील ग्रामस् थांकडून उपस्थित केला जात आहे.

दूषित पाण्याचा वापर; आरोग्य धोक्यात!खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा पाणीपुरवठा बंद  असल्याने आणि खारपाणपट्टा असल्याने, पिण्यायोग्य पाण्याचे  स्रोत नसल्याने, ६४ गावांमधील ग्रामस्थांना नदी-नाल्याच्या पात्रा तील ‘झिर्‍या’तील दूषित पाण्यावर तहान भागवावी लागत आहे.  दूषित पाण्याचा वापर करावा लागत असल्याने, ग्रामस्थांचे आरोग्य  धोक्यात आले आहे.

खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत गावांना पाणीपुरवठा  करण्यासाठी टंचाई आराखड्यांतर्गत उपाययोजना प्रस्तावित  करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेला दिले आहेत. प्रस्ताव प्राप्त  झाल्यानंतर तातडीने उपाययोजना करण्यात येणार आहेत.-आस्तिककुमार पाण्डेय,  जिल्हाधिकारी