शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
3
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
4
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
5
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
6
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
7
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
8
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
9
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
10
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
11
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
12
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
13
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
14
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
15
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
17
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
18
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
19
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
20
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
Daily Top 2Weekly Top 5

६४ गावे तहानलेलीच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 01:13 IST

जिल्ह्यातल्या खांबोराजवळील उन्नई बंधार्‍यातील पाणी  संपल्याने खारपाणपट्टय़ातील  खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा  योजनेंतर्गत ६४ गावांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला असून,   पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना  पायपीट करावी लागत आहे. गत  २५ दिवसांपासून पाणी मिळाले नसल्याने ६४ खेडी तहानलेलीच  असताना, पाणीपुरवठय़ाची कोणतीही उपाययोजना अद्याप   करण्यात आली नाही. त्यामुळे यासंदर्भात जिल्हा प्रशासन उदासीन  असल्याचे वास्तव समोर येत असून, पाणीटंचाईग्रस्त गावांना  पाणीपुरवठा करण्यासाठी उपाययोजना केव्हा होणार, असा प्रश्न  उपस्थित केला जात आहे.

ठळक मुद्दे२५ दिवसांपासून मिळाले नाही पाणी उपाययोजना केव्हा होणार?दूषित पाण्याचा वापर; आरोग्य धोक्यात!

संतोष येलकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यातल्या खांबोराजवळील उन्नई बंधार्‍यातील पाणी  संपल्याने खारपाणपट्टय़ातील  खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा  योजनेंतर्गत ६४ गावांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला असून,   पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना  पायपीट करावी लागत आहे. गत  २५ दिवसांपासून पाणी मिळाले नसल्याने ६४ खेडी तहानलेलीच  असताना, पाणीपुरवठय़ाची कोणतीही उपाययोजना अद्याप   करण्यात आली नाही. त्यामुळे यासंदर्भात जिल्हा प्रशासन उदासीन  असल्याचे वास्तव समोर येत असून, पाणीटंचाईग्रस्त गावांना  पाणीपुरवठा करण्यासाठी उपाययोजना केव्हा होणार, असा प्रश्न  उपस्थित केला जात आहे.यावर्षीचा पावसाळा सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटून  गेला; मात्र दमदार पाऊस झाला नसल्याने, जिल्हय़ातील  धरणांमधील जलसाठय़ात अद्यापही वाढ झाली नाही. त्यामध्ये  अकोला शहरासह खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४  गावांना पाणीपुरवठा करणार्‍या महान येथील काटेपूर्णा धरणात अ त्यल्प जलसाठा उपलब्ध असल्याने, या धरणातील जलसाठा  अकोला शहर पाणीपुरवठा योजनेसाठी आरक्षित असून, खांबोरा  प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी धरणातून पाणीपुरवठा बंद  करण्यात आला आहे. त्यामुळे  खांबोराजवळील उन्नई बंधार्‍यातून  खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना आठ  दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत होता; परंतु उन्नई बंधार्‍या तील पाणी संपल्याने खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत  गावांचा पाणीपुरवठा गत ७ ऑगस्टपासून बंद करण्यात आला  आहे. त्यामुळे योजनेंतर्गत ६४ गावांमध्ये पावसाळ्याच्या दिवसांत  जलसंकटाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी  ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. गत २५ दिवसांपासून  पाणीपुरवठा बंद असल्याने, तहानलेल्या गावांसाठी तातडीने पाणी पुरवठा करण्याची कोणतीही उपाययोजना जिल्हा परिषद आणि  जिल्हा प्रशासनामार्फत अद्याप करण्यात आली नाही. त्यामुळे  गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी उपाययोजना केव्हा होणार आणि  पिण्याचे पाणी केव्हा मिळणार, असा प्रश्न ६४ गावांमधील ग्रामस् थांकडून उपस्थित केला जात आहे.

दूषित पाण्याचा वापर; आरोग्य धोक्यात!खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा पाणीपुरवठा बंद  असल्याने आणि खारपाणपट्टा असल्याने, पिण्यायोग्य पाण्याचे  स्रोत नसल्याने, ६४ गावांमधील ग्रामस्थांना नदी-नाल्याच्या पात्रा तील ‘झिर्‍या’तील दूषित पाण्यावर तहान भागवावी लागत आहे.  दूषित पाण्याचा वापर करावा लागत असल्याने, ग्रामस्थांचे आरोग्य  धोक्यात आले आहे.

खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत गावांना पाणीपुरवठा  करण्यासाठी टंचाई आराखड्यांतर्गत उपाययोजना प्रस्तावित  करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेला दिले आहेत. प्रस्ताव प्राप्त  झाल्यानंतर तातडीने उपाययोजना करण्यात येणार आहेत.-आस्तिककुमार पाण्डेय,  जिल्हाधिकारी