शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

६४ गावे तहानलेलीच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 01:13 IST

जिल्ह्यातल्या खांबोराजवळील उन्नई बंधार्‍यातील पाणी  संपल्याने खारपाणपट्टय़ातील  खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा  योजनेंतर्गत ६४ गावांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला असून,   पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना  पायपीट करावी लागत आहे. गत  २५ दिवसांपासून पाणी मिळाले नसल्याने ६४ खेडी तहानलेलीच  असताना, पाणीपुरवठय़ाची कोणतीही उपाययोजना अद्याप   करण्यात आली नाही. त्यामुळे यासंदर्भात जिल्हा प्रशासन उदासीन  असल्याचे वास्तव समोर येत असून, पाणीटंचाईग्रस्त गावांना  पाणीपुरवठा करण्यासाठी उपाययोजना केव्हा होणार, असा प्रश्न  उपस्थित केला जात आहे.

ठळक मुद्दे२५ दिवसांपासून मिळाले नाही पाणी उपाययोजना केव्हा होणार?दूषित पाण्याचा वापर; आरोग्य धोक्यात!

संतोष येलकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यातल्या खांबोराजवळील उन्नई बंधार्‍यातील पाणी  संपल्याने खारपाणपट्टय़ातील  खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा  योजनेंतर्गत ६४ गावांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला असून,   पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना  पायपीट करावी लागत आहे. गत  २५ दिवसांपासून पाणी मिळाले नसल्याने ६४ खेडी तहानलेलीच  असताना, पाणीपुरवठय़ाची कोणतीही उपाययोजना अद्याप   करण्यात आली नाही. त्यामुळे यासंदर्भात जिल्हा प्रशासन उदासीन  असल्याचे वास्तव समोर येत असून, पाणीटंचाईग्रस्त गावांना  पाणीपुरवठा करण्यासाठी उपाययोजना केव्हा होणार, असा प्रश्न  उपस्थित केला जात आहे.यावर्षीचा पावसाळा सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटून  गेला; मात्र दमदार पाऊस झाला नसल्याने, जिल्हय़ातील  धरणांमधील जलसाठय़ात अद्यापही वाढ झाली नाही. त्यामध्ये  अकोला शहरासह खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४  गावांना पाणीपुरवठा करणार्‍या महान येथील काटेपूर्णा धरणात अ त्यल्प जलसाठा उपलब्ध असल्याने, या धरणातील जलसाठा  अकोला शहर पाणीपुरवठा योजनेसाठी आरक्षित असून, खांबोरा  प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी धरणातून पाणीपुरवठा बंद  करण्यात आला आहे. त्यामुळे  खांबोराजवळील उन्नई बंधार्‍यातून  खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना आठ  दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत होता; परंतु उन्नई बंधार्‍या तील पाणी संपल्याने खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत  गावांचा पाणीपुरवठा गत ७ ऑगस्टपासून बंद करण्यात आला  आहे. त्यामुळे योजनेंतर्गत ६४ गावांमध्ये पावसाळ्याच्या दिवसांत  जलसंकटाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी  ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. गत २५ दिवसांपासून  पाणीपुरवठा बंद असल्याने, तहानलेल्या गावांसाठी तातडीने पाणी पुरवठा करण्याची कोणतीही उपाययोजना जिल्हा परिषद आणि  जिल्हा प्रशासनामार्फत अद्याप करण्यात आली नाही. त्यामुळे  गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी उपाययोजना केव्हा होणार आणि  पिण्याचे पाणी केव्हा मिळणार, असा प्रश्न ६४ गावांमधील ग्रामस् थांकडून उपस्थित केला जात आहे.

दूषित पाण्याचा वापर; आरोग्य धोक्यात!खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा पाणीपुरवठा बंद  असल्याने आणि खारपाणपट्टा असल्याने, पिण्यायोग्य पाण्याचे  स्रोत नसल्याने, ६४ गावांमधील ग्रामस्थांना नदी-नाल्याच्या पात्रा तील ‘झिर्‍या’तील दूषित पाण्यावर तहान भागवावी लागत आहे.  दूषित पाण्याचा वापर करावा लागत असल्याने, ग्रामस्थांचे आरोग्य  धोक्यात आले आहे.

खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत गावांना पाणीपुरवठा  करण्यासाठी टंचाई आराखड्यांतर्गत उपाययोजना प्रस्तावित  करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेला दिले आहेत. प्रस्ताव प्राप्त  झाल्यानंतर तातडीने उपाययोजना करण्यात येणार आहेत.-आस्तिककुमार पाण्डेय,  जिल्हाधिकारी