शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
2
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! आतापर्यंत ३७ जणांना अटक
3
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
4
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
5
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
6
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
7
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
8
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
9
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
10
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
11
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
12
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
13
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
14
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
15
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
16
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
17
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
18
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
19
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
20
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”

पाटबंधारे विभागातही ६४ कर्मचारी जातवैधतेविना

By admin | Updated: July 11, 2017 01:15 IST

शासनाच्या आदेशानंतरही प्रमाणपत्रच सादर केले नाही!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शासन सेवेत राखीव जागांवर नियुक्ती मिळवणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ३० सप्टेंबर २०१३ अखेरपर्यंत जात वैधता प्रमाणपत्राचे प्रस्ताव सादर केल्यानंतर ते प्राप्त करून कार्यालयात सादर करण्याची मुदत दिली असताना अकोला पाटबंधारे विभागातील ६४ कर्मचाऱ्यांनी ती दिलीच नसल्याची माहिती आहे. त्यांना सूट दिली जात असल्याचाही प्रकार घडत आहे.महाराष्ट्र अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासप्रवर्ग, विशेष मागासप्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याची पडताळणीचे विनियमन) अधिनियम २००० हा कायदा १८ आॅक्टोबर २००१ पासून अस्तित्वात आला. तसेच २९ जानेवारी २००४ पासून अंमलात आला. त्यातील तरतुदीनुसार प्रत्येक मागासवर्गीय कर्मचाऱ्याने जात प्रमाणपत्राची वैधता जात पडताळणी समितीकडून करून घेणे आवश्यक आहे. मागासप्रवर्गामध्ये मोडत नसलेल्या कोणत्याही व्यक्तीने जातीचे खोटे प्रमाणपत्र देऊन राखीव जागेवर नियुक्ती मिळवली असेल, तर ती व्यक्ती सेवेतून तत्काळ कार्यमुक्त करण्यास पात्र असल्याची तरतूद आहे. तसेच व्यक्तीने घेतलेले सर्व लाभ काढून घेण्यासही ती पात्र ठरते. राखीव पदांवर असताना जात प्रमाणपत्राची वैधता तपासून न घेता एखादा कर्मचारी अनेक वर्ष शासन सेवेत रहात असेल, तर तो कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन करत असल्याचेही स्पष्ट होते. हा प्रकार अकोला पाटबंधारे विभागातही घडत आहे. पाटबंधारे विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, वर्ग ३ मध्ये राखीव जागांवर एकूण ९४ कर्मचारी आहेत, त्यापैकी ४४ कर्मचाऱ्यांनी जात वैधता सादर केली, तर ५० कर्मचाऱ्यांनी ती अद्यापही दिलेली नाही. वर्ग ४ मध्ये असलेल्या ५३ पैकी ३५ कर्मचाऱ्यांनी जात वैधता सादर केली. १४ कर्मचाऱ्यांनी अद्यापही दिली नाही. चार कर्मचाऱ्यांची जात वैधता आवश्यक नसल्याचे विभागाचे म्हणणे आहे. आता सर्वोच्च न्यायालयानेच जात वैधता नसलेल्यांच्या सेवा समाप्त करण्याचा आदेश दिल्याने राखीव जागांवर नोकरी मिळवलेल्या कर्मचाऱ्यांची धांदल उडणार आहे.