शहरं
Join us  
Trending Stories
1
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
2
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
3
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
4
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
5
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
6
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
7
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
8
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
9
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
10
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
11
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
12
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
13
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
14
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
15
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
16
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
17
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
18
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
19
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
20
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता

पाटबंधारे विभागातही ६४ कर्मचारी जातवैधतेविना

By admin | Updated: July 11, 2017 01:15 IST

शासनाच्या आदेशानंतरही प्रमाणपत्रच सादर केले नाही!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शासन सेवेत राखीव जागांवर नियुक्ती मिळवणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ३० सप्टेंबर २०१३ अखेरपर्यंत जात वैधता प्रमाणपत्राचे प्रस्ताव सादर केल्यानंतर ते प्राप्त करून कार्यालयात सादर करण्याची मुदत दिली असताना अकोला पाटबंधारे विभागातील ६४ कर्मचाऱ्यांनी ती दिलीच नसल्याची माहिती आहे. त्यांना सूट दिली जात असल्याचाही प्रकार घडत आहे.महाराष्ट्र अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासप्रवर्ग, विशेष मागासप्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याची पडताळणीचे विनियमन) अधिनियम २००० हा कायदा १८ आॅक्टोबर २००१ पासून अस्तित्वात आला. तसेच २९ जानेवारी २००४ पासून अंमलात आला. त्यातील तरतुदीनुसार प्रत्येक मागासवर्गीय कर्मचाऱ्याने जात प्रमाणपत्राची वैधता जात पडताळणी समितीकडून करून घेणे आवश्यक आहे. मागासप्रवर्गामध्ये मोडत नसलेल्या कोणत्याही व्यक्तीने जातीचे खोटे प्रमाणपत्र देऊन राखीव जागेवर नियुक्ती मिळवली असेल, तर ती व्यक्ती सेवेतून तत्काळ कार्यमुक्त करण्यास पात्र असल्याची तरतूद आहे. तसेच व्यक्तीने घेतलेले सर्व लाभ काढून घेण्यासही ती पात्र ठरते. राखीव पदांवर असताना जात प्रमाणपत्राची वैधता तपासून न घेता एखादा कर्मचारी अनेक वर्ष शासन सेवेत रहात असेल, तर तो कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन करत असल्याचेही स्पष्ट होते. हा प्रकार अकोला पाटबंधारे विभागातही घडत आहे. पाटबंधारे विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, वर्ग ३ मध्ये राखीव जागांवर एकूण ९४ कर्मचारी आहेत, त्यापैकी ४४ कर्मचाऱ्यांनी जात वैधता सादर केली, तर ५० कर्मचाऱ्यांनी ती अद्यापही दिलेली नाही. वर्ग ४ मध्ये असलेल्या ५३ पैकी ३५ कर्मचाऱ्यांनी जात वैधता सादर केली. १४ कर्मचाऱ्यांनी अद्यापही दिली नाही. चार कर्मचाऱ्यांची जात वैधता आवश्यक नसल्याचे विभागाचे म्हणणे आहे. आता सर्वोच्च न्यायालयानेच जात वैधता नसलेल्यांच्या सेवा समाप्त करण्याचा आदेश दिल्याने राखीव जागांवर नोकरी मिळवलेल्या कर्मचाऱ्यांची धांदल उडणार आहे.