शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
"मला ही भूमिका साकारायची...", आमिर खानने दिली 'महाभारत' प्रोजेक्टची हिंट, सुरु करणार काम
4
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
5
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
9
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
10
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
11
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
13
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
14
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
15
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! भारताचा सुस्पष्ट संदेश; आता पाकिस्तानने चूक केल्यास...
16
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
17
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
18
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
19
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  

एसटीला पाच महिन्यात ६० कोटींचा फटका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:41 IST

अकोला : एप्रिल व मे या महिन्यात कोरोनाचा उद्रेक झाल्याने एसटीची प्रवासी वाहतूक सेवा बंद ठेवण्यात आली होती. जून ...

अकोला : एप्रिल व मे या महिन्यात कोरोनाचा उद्रेक झाल्याने एसटीची प्रवासी वाहतूक सेवा बंद ठेवण्यात आली होती. जून पासून ही सेवा हळूहळू पूर्ववत होत आहे; परंतु सुरुवातीच्या काळात बहुतांश फेऱ्यांमधून डिझेल खर्चही निघणे कठिण झाले होते. त्यामुळे एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांच्या कालावधीत अकोला विभागाला ६० कोटींचा आर्थिक फटका सहन करावा लागल्याची माहिती एसटी महामंडळाकडून मिळाली. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे एसटी महामंडळासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. जवळपास दीड वर्षांपासून एसटीची प्रवासी सेवा कधी बंद तर, कधी सुरू राहत आहे. याचा एसटी महामंडळाच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जास्त प्रमाणात उद्रेक झाल्याने पुन्हा लॉकडाऊन लावण्यात आले होते. यामध्ये मार्च ते मे महिन्यापर्यंत ही सेवा बंद होती. काही दिवस अत्यावश्यक प्रवाशांसाठी फेऱ्या सोडण्यात आल्या ; मात्र त्याही तोट्यात राहिल्या. एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यात अकोला विभागाला १८ कोटी ९१ लाख ९८ हजार रुपये उत्पन्न मिळाले. तर, २०१९ मध्ये या पाच महिन्यात ७९ कोटी ४ लाख ३६ हजार रुपये उत्पन्न मिळाले होते.

किलोमीटरही घटले !

२०१९ ला एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत अकोला विभागाच्या बसेसने २ कोटी ५७ लाख १५ हजार किमी अंतर गाठले होते. तर, यावर्षी ७२ लाख ८५ हजार किमी अंतर पार केले. यामध्ये १ कोटी ८४ लाख ३० हजार किमी अंतर घटले आहे.

एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान उत्पन्न

२०१९

७९,०४,३६,०००

२०२१

१८,९१,९८,०००

अद्यापही ३० टक्के बसेस आगारातच!

राज्यातील बहुतांश जिल्ह्यात रात्री १० पर्यंत सूट देण्यात आली आहे. त्यामुळे प्रवासी संख्या वाढत असून बसेसच्या फेऱ्याही वाढविण्यात आल्या आहे ; परंतु पावसाच्या व्यत्ययामुळे अनेकवेळा प्रवासी मिळत नसल्याने जवळपास ३० टक्के बसेस आगारातच उभ्या आहे.

नाशिक, पुणे गाडीला प्रतिसाद!

दोन महिन्यांपासून ठणठण जाणाऱ्या नाशिक, पुणे, मुंबई गाडीला आता प्रतिसाद मिळू लागला आहे. तसेच अमरावती व औरंगाबाद मार्गावर प्रवासी संख्या वाढली आहे. यामुळे आगार क्रमांक २ च्या उत्पन्नात थोड्या प्रमाणात भर पडत आहे.