शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
2
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
3
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
4
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
5
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
6
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
7
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
8
तारीख ठरली, वेळ बदलली? 'या' दिवशी सुरु होणार 'बिग बॉस मराठी ६'; पाहा प्रोमो
9
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
10
खोकला, घशात खवखव; मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; वातावरणातील बदलामुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ
11
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
12
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
13
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
14
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
15
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
16
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
17
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
18
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
19
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
20
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
Daily Top 2Weekly Top 5

भाजीबाजारात ६० ते ७० क्विंटल शेतमाल पडून!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:13 IST

जिल्हाभरातून येथील ठोक भाजीबाजारात शेतकरी शेतमाल विक्रीसाठी आणतात व विविध जिल्ह्यांतील व्यापारी हा माल घेऊन जातात. बुधवारी रात्री दहापर्यंत ...

जिल्हाभरातून येथील ठोक भाजीबाजारात शेतकरी शेतमाल विक्रीसाठी आणतात व विविध जिल्ह्यांतील व्यापारी हा माल घेऊन जातात. बुधवारी रात्री दहापर्यंत पावसाचा जोर कमी असल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी आपला शेतमाल विक्रीसाठी आणला होता; मात्र रात्रभर धो धो पाऊस झाल्याने बाजाराकडे जाणाऱ्या रस्त्यावर साडेचार फुटांपर्यंत पाणी भरले होते. त्यामुळे रात्री तीन वाजता हर्राशीच्यावेळी भाजीपाला व्यापाऱ्यांना बाजारात जाता आले नाही. परिणामी, भाजीपाल्याची हर्राशीही होऊ शकली नाही. त्यामुळे ६० ते ७० क्विंटल शेतमाल बाजारातच पडून आहे. यामुळे शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे.

भाजीपाल्याची वाहने निघाली नऊ वाजता

येथील भाजी बाजारातून अमरावती, नागपूर, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये विविध वाहनांद्वारे भाजीपाला पोहोचविला जातो. रस्त्यामध्ये पाणी भरल्याने सकाळी पाच वाजता माल घेऊन इतर जिल्ह्यात पोहोचणारी ही वाहने सकाळी नऊ वाजता बाजारातून निघाली. त्यामुळे भाजीपाला पोहोचविण्यास उशीर झाला.