शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यात ५८ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:22 IST

अकोला : जिल्ह्यातील २२४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत एक हजार ७४१ जागांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान घेण्यात आले. जिल्ह्यातील ...

अकोला : जिल्ह्यातील २२४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत एक हजार ७४१ जागांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान घेण्यात आले. जिल्ह्यातील सातही तालुक्यांतील ग्रामपंचायतींमध्ये सरासरी ६० टक्के मतदान झाले असून, कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. काही ठिकाणी ईव्हीएम बंद पडण्याचा प्रकार घडला; मात्र प्रशासनाने तत्परतने दुसऱ्या मतदानयंत्राची सज्जता ठेवली असल्याने कुठेही मतदानाला उशीर झाला नाही.

काेराेनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या निवडणुकीत काेराेना नियमांची काटेकाेर अंमलबजावणी हाेईल ही अपेक्षा फाेल ठरली मतदानासाठी लागलेल्या रांगामध्ये मास्क घातलेल्या मतदारांची संख्या बाेटावर माेजता येईल एवढीच हाेती. दुसरीकडे ग्रामीण भागात मतदानासाठी उत्साह दिसून आला. सकाळी मतदानाला प्रतिसाद कमी हाेता. सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत केवळ सात टक्के मतदान झाले हाेते; मात्र दुपारी मतदानाने वेग घेतला. दुपारी दीड वाजेपर्यंत ४० टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. हीच टक्केवारी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ५८ टक्के झाली हाेती. रात्री उशिरापर्यंत प्रशासनाची आकडेमाेड सुरू हाेती. मतदानाची सरासरी ६० टक्क्यांवर पाेहोचेल असा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला.

दरम्यान निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतींच्या ३२० जागांसाठी प्रत्येकी एकाच उमेदवाराचा अर्ज राहिल्याने संबंधित ३२० उमेदवारांची ग्रामपंचायत सदस्य म्हणून बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. तसेच नऊ जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले नसल्याने ग्रामपंचायत सदस्यांची नऊ पदे रिक्त राहणार आहेत. यंदा निवडणूक रिंगणातील उमेदवारांमध्ये दोन हजार ३९५ महिला उमेदवार असून, दोन हजार १६ पुरुष उमेदवारांचा समावेश आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींच्या कारभारात महिलांचा टक्का वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

जिल्ह्यात ८५१ मतदान केंद्रांपैकी २२० मतदान केंद्रे संवेदनशील हाेती. त्यामध्ये बार्शी टाकळी तालुक्यात सर्वाधिक ६० संवेदनशील मतदान केंद्रे असून, बाळापूर ३६, पातूर ३४, अकोट २६, तेल्हारा २४, अकोला २१, मूर्तिजापूर १९ अशा केंद्रांचा समावेश हाेता. येथे तगडा पाेलीस बंदाेबस्त लावण्यात आला हाेता. कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.

सोमवारी निकाल

ग्रामपंचायत निवडणूक मतदानानंतर मतमोजणीची तयारी प्रशासनाने केली आहे. सोमवारी (दि. १८) मतमोजणी होणार आहे.