शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

आॅफलाइनमुळे ५८ लाख क्विंटल धान्याचा काळाबाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 13:21 IST

आॅफलाइन वाटपातून धान्याचा काळाबाजार होत असल्याने शासनाने सातत्याने केवळ पडताळणीचा आदेश दिला.

ठळक मुद्दे जानेवारीत काही जिल्ह्यांनतर मे २०१८ पासून सर्वच जिल्ह्यांत आॅनलाइन धान्य वाटप सुरू झाले. सरासरी १० ते २५ टक्के धान्य घेण्यासाठी लाभार्थी येतच नाहीत. त्यांच्या लाभाचे धान्य दुकानदारांकडे शिल्लक राहते. आॅफलाइन धान्याची उचल करून ते काळाबाजारात जात असल्याच्या अनेक घटनाही या काळातच उघड झाल्या.

- सदानंद सिरसाटअकोला: शिधापत्रिकाधारकांसाठी धान्य वाटपाची ‘एई-पीडीएस’ ही आॅनलाइन प्रणाली असताना राज्यात एप्रिल ते डिसेंबर २०१८ या काळात ५८ लाख क्विंटल धान्याचे आॅफलाइन वाटप करण्यात आले आहे. आॅफलाइन वाटपातून धान्याचा काळाबाजार होत असल्याने शासनाने सातत्याने केवळ पडताळणीचा आदेश दिला. संपूर्ण राज्यासह आठ जिल्ह्यांत सतत हा प्रकार घडत असल्याने ५ मार्च २०१९ च्या अहवालानुसार केंद्रीय ग्राहक संरक्षण, अन्न व नागरी पुरवठा विभागाचे संचालक डी. के. गुप्ता यांनी महाराष्ट्राच्या अन्न व नागरी पुरवठा प्रधान सचिवांना पडताळणी करून कारणे स्पष्ट करण्याचे १४ मार्च रोजीच्या पत्रातून बजावले आहे.धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी आधार लिंक असलेल्या शिधापत्रिकेतील लाभार्थींची ओळख आॅनलाइन पटवून धान्य वाटपाची आॅनलाइन ‘एई-पीडीएस’प्रणाली शासनाने तयार केली. जानेवारीत काही जिल्ह्यांनतर मे २०१८ पासून सर्वच जिल्ह्यांत आॅनलाइन धान्य वाटप सुरू झाले. आधार लिंक कार्डधारकांना पॉस मशीनद्वारे आॅनलाइन धान्य वाटपाचे प्रमाण सातत्याने ७० ते ८० टक्केच होते. त्यामुळे लाभार्थींचे आधार लिंक होऊनही पॉस मशीनद्वारे पडताळणी अशक्य असलेल्यांना पुरवठा विभागाने नेमून दिलेल्या सक्षम अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत धान्य वाटपाची सूट देण्यात आली. या संधीचा फायदा धान्याचा काळाबाजार करण्यासाठीच अधिक झाला. सरासरी १० ते २५ टक्के धान्य घेण्यासाठी लाभार्थी येतच नाहीत. त्यांच्या लाभाचे धान्य दुकानदारांकडे शिल्लक राहते; मात्र संबंधित लाभार्थींच्या ‘नॉमिनी’ला आॅफलाइन धान्य वाटप केल्याची नोंद करण्यात आली. प्रत्यक्ष लाभार्थी गायब असतानाही ‘नॉमिनी’च्या नावे आॅफलाइन धान्याची उचल करून ते काळाबाजारात जात असल्याच्या अनेक घटनाही या काळातच उघड झाल्या. त्यामुळे लाभार्थींचे ‘नॉमिनी’ खरेच आहेत की नाही, याचा शोध घेण्यासाठी शासनाने २६ जुलै २०१८ पासून सातत्याने पडताळणीचा आदेश दिला. धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी राज्यभरात एकाच वेळी १८, १९ सप्टेंबर २०१८ या दोन दिवसांत ‘नॉमिनी’ची ‘ओळखपरेड’ करण्याचा कार्यक्रम पुरवठा विभागाच्या यंत्रणेनेच गुंडाळण्याचा प्रकारही घडला. आता केंद्र शासनानेच विचारणा केल्याने या धान्याचे वाटप कोणाला झाले, त्याची कारणे काय, हे स्पष्ट करताना राज्य शासनाच्या अडचणी वाढणार आहेत.

पुरवठा मंत्र्यांचा पुणे जिल्हा आघाडीवरआॅफलाइन धान्य वाटपाचा घोळ आता थेट केंद्रीय मंत्रालयाच्या नजरेत आला आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये कमी-अधिक प्रमाणात हा प्रकार सुरू आहे. त्यामध्ये राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांचा पुणे जिल्हाही आघाडीवर आहे. या जिल्ह्यात २ लाख ३४ हजार ७१० क्विंटल धान्याचे वाटप आॅफलाइन झाले आहे.

इतर जिल्ह्यांतील आॅफलाइन वाटपजिल्हा                              वाटप (क्विंटल)औरंगाबाद                             ३,६२,६२०अमरावती                             ४,७४,७१०बीड                                       २,४९,०७०भंडारा                                   २,९०,४१०बुलडाणा                               २,०४,७३०हिंगोली                                 ५,७५,७३०पालघर                                  ४,२०,६१०ठाणे                                      २,५१,०४०नागपूर                                  १,५८,१००

 

टॅग्स :Akolaअकोला