शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
4
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
5
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
6
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
7
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
8
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
9
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
10
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
11
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
12
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
13
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
14
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
15
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
16
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
17
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
18
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
19
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
20
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7 लाख कोटींची कमाई

राष्ट्रीयीकृत बँकांचे ५७ हजार शेतकरी ठरणार कर्जमाफीसाठी पात्र!

By admin | Updated: July 16, 2017 02:36 IST

अखेर थकबाकीदार शेतकर्‍यांची माहिती जिल्हाधिका-यांकडे सादर.

संतोष येलकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: थकबाकीदार शेतकर्‍यांसाठी शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेच्या अंमलबजाणीत जिल्हय़ातील १८ राष्ट्रीयीकृत बँकांकडून अखेर शनिवारी थकबाकीदार शेतकर्‍यांची माहिती जिल्हाधिकार्‍यांकडे सादर करण्यात आली. त्यानुसार जिल्हय़ात राष्ट्रीयीकृत बँकांचे दीड लाख रुपयांपर्यंत थकबाकीदार असणारे ५७ हजार १0७ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरणार आहेत.राज्यातील थकबाकीदार शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्यासंदर्भात २८ जून रोजी शासन निर्णय काढण्यात आला. त्यानुसार १ एप्रिल २0१२ ते ३0 जून २0१६ पर्यंत थकबाकीदार असलेले शेतकरी दीड लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीसाठी पात्र ठरणार आहेत. दरम्यान, कर्जमाफी योजनेची व्याप्ती वाढवून, सन २00९ ते ३0 जून २0१६ पर्यंत थकबाकीदार शेतकर्‍यांना दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीसाठी पात्र ठरविण्याचा निर्णय शासनामार्फत गत ५ जुलै रोजी घेण्यात आला. त्यानुसार कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीत कर्जमाफीसाठी पात्र ठरणार्‍या जिल्हय़ातील थकबाकीदार शेतकर्‍यांची माहिती सादर करण्याचे निर्देश जिल्हा उपनिबंधकांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह जिल्हय़ातील राष्ट्रीयीकृत बँकांना गत ३0 जून रोजी दिले होते. त्यानुसार २२ पैकी १८ राष्ट्रीयीकृत बँकांकडून प्राप्त झालेली थकबाकीदार शेतकर्‍यांची माहिती जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक तुकाराम गायकवाड यांनी १५ जुलै रोजी जिल्हाधिकार्‍यांकडे सादर केली. त्यानुसार५७ हजार १0७ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरणार आहेत.जिल्हा बँकेचे १९ हजारावर थकबाकीदार शेतकरी पात्र!कर्जमाफी योजनेत सन २00९ ते ३0 जून २0१६ पर्यंत जिल्हय़ातील थकबाकीदार शेतकर्‍यांची माहिती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत गत ५ जुलै रोजी जिल्हा उपनिबंधकांकडे सादर करण्यात आली. त्यानुसार बँकेचे जिल्हय़ात थकबाकीदार असलेले १९ हजार ८५३ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरणार आहेत. या थकबाकीदार शेतकर्‍यांकडे १८ कोटी ८९ लाख रुपयांचे कर्ज थकीत आहे.थकबाकीदार शेतकरी! दीड लाख रुपयांपर्यंत : ५७,१0७दीड लाखांपेक्षा जास्त : ४,११६जिल्हय़ातील राष्ट्रीयीकृत १८ बँकांकडून प्राप्त माहितीनुसार, बँकांचे जिल्हय़ात दीड लाख रुपयांपर्यंत ५७ हजार १0७ थकबाकीदार शेतकरी असून, ते कर्जमाफी योजनेंतर्गत पात्र ठरतील. चार राष्ट्रीयीकृत बँकांकडून थकबाकीदार शेतकर्‍यांची माहिती प्राप्त नाही. प्राप्त माहितीची पडताळणी केल्यानंतर शासनाकडे सादर करण्यात येणार आहे.- आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हाधिकारी