शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
5
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
6
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
7
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
8
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
9
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
10
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
11
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
12
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
13
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
14
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
15
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
16
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
17
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
18
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
19
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
20
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."

स्वातंत्र्यदिनी ५७ ग्रामपंचायती घेणार दुष्काळमुक्तीचा ठराव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 01:36 IST

शिर्ला : पाण्याचे स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी पातूर तालुक्यातील ५७ ग्रामपंचायती दुष्काळावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी जलसंधारण विकास आराखडा मंजूर करणारा ठराव स्वातंत्र्य दिनाच्या विशेष ग्रामसभेत मांडणार असल्याची माहिती पातूर पंचायत समीतीचे गटविकास अधिकारी शेखर शेलार यांनी ‘लोकमत’ला दिली.    

ठळक मुद्देजलसंधारण विकास आराखडा मंजूर करणारा ठराव स्वातंत्र्य दिनाच्या विशेष ग्रामसभेत मांडणार

लोकमत न्यूज नेटवर्कशिर्ला : पाण्याचे स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी पातूर तालुक्यातील ५७ ग्रामपंचायती दुष्काळावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी जलसंधारण विकास आराखडा मंजूर करणारा ठराव स्वातंत्र्य दिनाच्या विशेष ग्रामसभेत मांडणार असल्याची माहिती पातूर पंचायत समीतीचे गटविकास अधिकारी शेखर शेलार यांनी ‘लोकमत’ला दिली.        पातूर तालुक्यात १00 हून गावे तथा ५७ ग्रामपंचायती आहेत. आज शिर्ला, पांगरताटी, चारमोळी ही जलसंधारणाची कामे केलेली गावे वगळता इतर तालुक्यातील सर्वच गावांमध्ये पाणीटंचाईची भीषणता आणि दुष्काळाची तीव्रता अधिक गडद होत चालली आहे. त्यावर गतवर्षी महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा पाणी फाउंडेशनचे सर्वेसर्वा सिनेअभिनेते अमिर खान यांच्या संकल्पनेतून पातूर तालुक्यातील ६५ हून गावांनी थोड्या अधिक प्रमाणात जलसंधारणाच्या कामाला सुरुवात केली होती. मात्र दुष्काळाची तीव्रता कमी करण्यात तालुक्यातील शिर्ला, पांगरताटी, चारमोळी यशस्वी ठरले आहेत.  यावर्षी गतवर्षीच्या तुलनेत निम्माही पाऊस तालुक्यात पडला नाही. त्यामुळे दुष्काळाची तीव्रता अधिक वाढत जाणार आहे. त्यावर पाणी फाउंडेशनने उभी केलेली जलचळवळ, वाढता लोकांचा सहभाग, त्यातून होणारी जलसंधारणाचे काम कायमस्वरूपी दुष्काळाला हरवू शकतात. या वर्षी १५ऑगस्टच्या विशेष ग्रामसभेतून प्रत्येक गावातून पाच कार्यकर्ते त्यात दोन महिलांचा अंतर्भाव करून निवड करावी, त्याबरोबरच गावात करावयाच्या जलसंधारण कामांचा आराखडा मांडून ठराव घ्यावा, अशी विनंती पाणी फाउंडेशनचे पातूर तालुका समन्वयक सुभाष नानोटे, प्रफुल्ल कोल्हे यांनी गटविकास अधिकारी शेखर शेलार यांना केली होती. त्यावर  त्यांनी  लगेचच सूचना दिल्या आहेत.  स्वातंत्र्य चळवळनंतर प्रथमच जलचळवळ दुष्काळ मुक्तीसाठी उभी राहत आहे. दुष्काळाच्या चोरट्या पावलांचा अंदाज घेऊन पूर्वनियोजन करणारी कदाचित जिल्ह्यातील पहिली पंचायत समिती ठरेल, असे वाटते.