शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

काटेपूर्णा धरणात ५५ टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 14:43 IST

अकोला : काटेपूर्णा धरणातील जलसाठा ५५ टक्क्यांवर पोहोचला असून, पाण्याचे नियोजन केल्यास दोन वर्षांची सोय झाली आहे. यावर्षी सिंचनासाठी पाणी देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ठळक मुद्देजलग्रहण क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने आजमितीस या धरणाचा जलसाठा (४६.५९ दशलक्ष घनमीटर) ५५ टक्क्यांवर पोहोचला आहे. दोन वर्ष पिण्याच्या पाण्याची सोय झाल्याचे समाधान अकोलेकरांच्या चेहऱ्यावर असून, एकदाचे पाणी संकट टळल्याने सुटकेचा नि:श्वास टाक ला आहे.

अकोला : काटेपूर्णा धरणातील जलसाठा ५५ टक्क्यांवर पोहोचला असून, पाण्याचे नियोजन केल्यास दोन वर्षांची सोय झाली आहे. यावर्षी सिंचनासाठी पाणी देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.मागच्या वर्षी पाऊस कमी झाल्याने काटेपूर्णा धरणात अल्प जलसाठा असल्याने यावर्षीच्या उन्हाळ््यात अकोलकरांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागला. अकोला शहर वगळता या धरणातून पाणी पुरवठा बंद केल्याने या धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेली गावे, औद्योगिक वसाहतीला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागला. यावर्षीही सुरुवातीला पाऊस लांबल्याने अकोलेकरांची चिंता वाढली होती. पण, जुलै आणि आॅगस्टमध्ये या धरणाच्या जलग्रहण क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने आजमितीस या धरणाचा जलसाठा (४६.५९ दशलक्ष घनमीटर) ५५ टक्क्यांवर पोहोचला आहे. मागच्यावर्षी २१ टक्के असलेला जलसाठा दुपटीने वाढल्याने आता दोन वर्ष पिण्याच्या पाण्याची सोय झाल्याचे समाधान अकोलेकरांच्या चेहऱ्यावर असून, एकदाचे पाणी संकट टळल्याने सुटकेचा नि:श्वास टाक ला आहे. पातूर तालुक्यातील मोर्णा धरणात १४.०४ दलघमी म्हणजेच ५७.३८ टक्के, तर निर्गुणा धरणात १८.८० दलघमी म्हणजेच ६५.१६ टक्के जलसाठा संचयित झाला आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील उमा धरण यावर्षीच्या उन्हाळ््यात शून्य टक्क्यावर आले होते.या धरणात आजमितीस ९.२४ दलघमी म्हणजेच ७९.११ टक्के साठा उपलब्ध झाला आहे. घुगंशी बॅरेज मात्र शून्य टक्क्यावर आहे. अकोला, बुलडाणा व अमरावती जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या ५६.१५ दलघमी म्हणजेच ६८.५२ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे.सिंचनाची होणार सोय!गत तीन-चार वर्षांपासून सिंचनासाठी शेतकºयांना पाणी मिळणे कठीण झाले होते. मागच्या वर्षीच्या रब्बी व यावर्षीच्या उन्हाळी पिकांना शेतकºयांना पाणी मिळाले नाही, पण यावर्षी धरणात ५० टक्केच्यावर पाणी पोहोचल्याने सिंचनासाठीच्या पाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.अकोलेकरांना मिळणार दरडोई १४० लीटर पाणीसतत पाणीटंचाईचा सामना करणाºया अकोलकरांना यावर्षी दरडोई १४० लीटर पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पावसाळ््याचे आणखी पावणे दोन महिने शिल्लक आहेत. त्यामुळे यावर्षी धरणाचा जलसाठा शंभर टक्केपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. सध्या दरडोई १०० लीटर पाणी पुरवठा केला जातो. आता १४० लीटर दरडोई पाणी मिळणार असल्याचे वृत्त आहे.

 

 

टॅग्स :AkolaअकोलाKatepurna Damकाटेपूर्णा धरण