शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
2
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
3
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
4
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
5
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
6
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
7
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
8
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
9
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
10
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
11
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
13
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
14
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
15
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
16
गृहकर्ज घेताय? जाणून घ्या ५० लाखांच्या कर्जावर कोणत्या बँकेत सर्वात कमी ईएमआय
17
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
18
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
19
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
20
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...

काटेपूर्णा धरणात ५५ टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 14:43 IST

अकोला : काटेपूर्णा धरणातील जलसाठा ५५ टक्क्यांवर पोहोचला असून, पाण्याचे नियोजन केल्यास दोन वर्षांची सोय झाली आहे. यावर्षी सिंचनासाठी पाणी देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ठळक मुद्देजलग्रहण क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने आजमितीस या धरणाचा जलसाठा (४६.५९ दशलक्ष घनमीटर) ५५ टक्क्यांवर पोहोचला आहे. दोन वर्ष पिण्याच्या पाण्याची सोय झाल्याचे समाधान अकोलेकरांच्या चेहऱ्यावर असून, एकदाचे पाणी संकट टळल्याने सुटकेचा नि:श्वास टाक ला आहे.

अकोला : काटेपूर्णा धरणातील जलसाठा ५५ टक्क्यांवर पोहोचला असून, पाण्याचे नियोजन केल्यास दोन वर्षांची सोय झाली आहे. यावर्षी सिंचनासाठी पाणी देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.मागच्या वर्षी पाऊस कमी झाल्याने काटेपूर्णा धरणात अल्प जलसाठा असल्याने यावर्षीच्या उन्हाळ््यात अकोलकरांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागला. अकोला शहर वगळता या धरणातून पाणी पुरवठा बंद केल्याने या धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेली गावे, औद्योगिक वसाहतीला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागला. यावर्षीही सुरुवातीला पाऊस लांबल्याने अकोलेकरांची चिंता वाढली होती. पण, जुलै आणि आॅगस्टमध्ये या धरणाच्या जलग्रहण क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने आजमितीस या धरणाचा जलसाठा (४६.५९ दशलक्ष घनमीटर) ५५ टक्क्यांवर पोहोचला आहे. मागच्यावर्षी २१ टक्के असलेला जलसाठा दुपटीने वाढल्याने आता दोन वर्ष पिण्याच्या पाण्याची सोय झाल्याचे समाधान अकोलेकरांच्या चेहऱ्यावर असून, एकदाचे पाणी संकट टळल्याने सुटकेचा नि:श्वास टाक ला आहे. पातूर तालुक्यातील मोर्णा धरणात १४.०४ दलघमी म्हणजेच ५७.३८ टक्के, तर निर्गुणा धरणात १८.८० दलघमी म्हणजेच ६५.१६ टक्के जलसाठा संचयित झाला आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील उमा धरण यावर्षीच्या उन्हाळ््यात शून्य टक्क्यावर आले होते.या धरणात आजमितीस ९.२४ दलघमी म्हणजेच ७९.११ टक्के साठा उपलब्ध झाला आहे. घुगंशी बॅरेज मात्र शून्य टक्क्यावर आहे. अकोला, बुलडाणा व अमरावती जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या ५६.१५ दलघमी म्हणजेच ६८.५२ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे.सिंचनाची होणार सोय!गत तीन-चार वर्षांपासून सिंचनासाठी शेतकºयांना पाणी मिळणे कठीण झाले होते. मागच्या वर्षीच्या रब्बी व यावर्षीच्या उन्हाळी पिकांना शेतकºयांना पाणी मिळाले नाही, पण यावर्षी धरणात ५० टक्केच्यावर पाणी पोहोचल्याने सिंचनासाठीच्या पाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.अकोलेकरांना मिळणार दरडोई १४० लीटर पाणीसतत पाणीटंचाईचा सामना करणाºया अकोलकरांना यावर्षी दरडोई १४० लीटर पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पावसाळ््याचे आणखी पावणे दोन महिने शिल्लक आहेत. त्यामुळे यावर्षी धरणाचा जलसाठा शंभर टक्केपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. सध्या दरडोई १०० लीटर पाणी पुरवठा केला जातो. आता १४० लीटर दरडोई पाणी मिळणार असल्याचे वृत्त आहे.

 

 

टॅग्स :AkolaअकोलाKatepurna Damकाटेपूर्णा धरण