शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
3
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
4
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
5
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
6
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
7
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
8
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
9
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
11
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
12
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
13
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
14
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
15
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
16
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
17
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
18
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
19
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
20
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी

जिल्ह्यात ५३० ग्रा.पं. कोरोनामुक्त; कोरोना संसर्ग नियंत्रणात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:25 IST

अकोला : कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने घटली असून, दुसरी लाट ओसरल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात आता केवळ ३० ॲक्टिव्ह रुग्णांवर ...

अकोला : कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने घटली असून, दुसरी लाट ओसरल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात आता केवळ ३० ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यातील तब्बल ५३० ग्रामपंचायती कोरोनामुक्त झाल्या असून, तूर्तास तरी एकही हॉटस्पॉट नसल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागात कोरोना नियंत्रणात असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत जिल्ह्यात जुलै व सप्टेंबर या दोन महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढली होती. त्यानंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला. कोरोनाला रोखण्यासाठी राज्य शासनाने कोविड-१९चे लसीकरण सुरू केले. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना, दुसरीकडे लसीकरणावरही भर देण्यात आला. मे महिन्याच्या अखेरपासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होऊन जुलै महिन्यापासून कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे.

कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी केली. तसेच नागरिकांनीदेखील नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य केले. सध्या जिल्ह्यात आठवड्यातून सरासरी दोन-तीन रुग्ण पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. जिल्ह्यात जवळपास ५३४ ग्रामपंचायती असून, त्यातील ५३० ग्रा.पं.ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. शहरासह केवळ ५ गावांमध्ये कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. जिल्ह्यात सध्या एकही हॉटस्पॉट ठिकाण नसून, कोरोना विषाणू संसर्ग नियंत्रणात असल्याचे दिसून येते. तिसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे. तिसरी लाट रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी प्रशासनाकडून केली जात आहे. नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेणे आवश्यक ठरत आहे.

-------------------

जिल्ह्यातील कोरोनाबाधित ग्रा.पं.

तालुका ग्रा.पं.

अकोला- ३

बाळापूर- १

पातूर- ०

बार्शीटाकळी- ०

तेल्हारा- ०

अकोट- ०

----------

जिल्ह्यातील कोरोनामुक्त ग्रा.पं.

तालुका ग्रा.पं.

अकोला- ३५

बाळापूर- ६५

पातूर- ८४

बार्शीटाकळी- ८३

तेल्हारा- ९९

अकोट- ७८

----------------------------

दररोज सरासरी ९००-१००० कोरोना चाचण्या

जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली, तरी खबरदारीचा प्रयत्न म्हणून दैनंदिन सरासरी ९०० कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. या चाचण्यांपैकी दैनंदिन सरासरी दोन ते तीन जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह येत आहे. गत १० दिवसांत १५ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.