शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

५० गावांना बसला ‘अवकाळी’चा फटका, ३४७६ हेक्टरवरील पिके बाधीत; ३७२१ शेतकऱ्यांचे नुकसान

By रवी दामोदर | Updated: March 20, 2023 17:33 IST

जिल्ह्यात तीन दिवसांपासून अवकाळी पाऊस, गारपिटीने रब्बी पिकांसह भाजीपालावर्गीय व संत्राचे मोठे नुकसान झाले आहे.

अकोला: जिल्ह्यात तीन दिवसांपासून अवकाळी पाऊस, गारपिटीने रब्बी पिकांसह भाजीपालावर्गीय व संत्राचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाचा जिल्ह्यातील ५० गावांना फटका बसला असून, ३ हजार ४७६ हेक्टरवरील पिके बाधित झाले आहे.

गत तीन दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. पातूर, बार्शीटाकळी व तेल्हारा तालुक्यात अवकाळी पावसासह गारांचा वर्षाव झाला असून, रब्बी पिकांना फटका बसला आहे. प्रादेशिक हवामान विभागाने जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविला होता.

त्यानुसार, जिल्ह्यात अवकाळी पावसाने पातूर, बार्शीटाकळी तालुक्यासह ग्रामीण भागात सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यात ३ हजार ७२१ शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून, १ हजार २३७ शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण झाल्याची माहिती आहे. नुकसानग्रस्त भागात सर्व्हे करून मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

पीक विमा कंपनीकडे पूर्वसूचना नोंदवा

पीक विमा योजनेत सहभागी बाधित शेतकऱ्यांनी पीक नुकसानीचे ७२ तासांच्या आत कंपनीकडे पूर्वसूचना करणे महत्त्वाचे आहे. त्यानंतर कंपनीद्वारा वैयक्तिक स्तरावर पंचनामे करण्यात येणार आहेत. नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना आधार मिळावा, यासाठी पीक विमा योजना आहे. या योजनेत रब्बी पिकांसाठी जिल्ह्यातील १२ हजार ३७१ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे. याद्वारे १५ हजार १२४ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित केले आहे. त्यामुळे मुदतीत कंपनीकडे माहिती देणे, रब्बीची ई पीक पाहणी करणे महत्त्वाचे असल्याचे कृषी विभागाने सांगितले.

अवकाळीमुळे असे झाले नुकसान

तालुका             नुकसानग्रस्त गावांची संख्या             नुकसानग्रस्त शेतकरी             क्षेत्र

बार्शीटाकळी             १०                                    २१७                         १५५

पातूर                         २३                                     २३९३                         २०९३तेल्हारा                         १७                                    ११११                         १२२८एकूण                         ५०                                    ३७२१                         ३४७६