शहरं
Join us  
Trending Stories
1
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
2
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
3
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
4
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
5
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
6
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
7
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
8
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
9
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
10
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
11
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
12
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
13
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
14
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
15
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
16
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
17
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
18
लेख: तोटा सोसून बँकेच्या बचत खात्यात लोकांनी पैसे का ठेवावे?
19
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
20
India vs England: जिथे कमी तिथे केएल राहुल!

४९२ उमेदवारांवर होणार कारवाई!

By admin | Updated: February 22, 2016 02:21 IST

अकोला जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा खर्च सादर केला नाही; निवडणूक लढण्यास ठरणार अपात्र

संतोष येलकर / अकोलासहा महिन्यांपूर्वी घेण्यात आलेल्या जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये निवडणूक लढविलेल्या उमेदवारांपैकी ४९२ उमेदवारांनी अद्यापही निवडणूक खर्च सादर केला नाही. निवडणूक खर्चाचे विवरणपत्र सादर न करणार्‍या या उमेदवारांवर पाच वर्षांंसाठी निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविण्याची कारवाई करण्यात येणार असून, यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत निवडणूक विभागामार्फत तयारी सुरू करण्यात आली आहे.गत ऑगस्ट २0१५ मध्ये जिल्ह्यात २२0 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये १३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या. निवडणूक लढविलेल्या उमेदवारांनी निवडणूक निकालानंतर, दोन महिन्यांच्या आत (६0 दिवस) निवडणूक खर्चाचे विवरणपत्र संबंधित तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे सादर करणे बंधनकारक आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालानंतर, उमेदवारांनी सादर केलेल्या निवडणूक खर्चाचा अहवाल सादर करण्याचा आदेश, उपजिल्हाधिकारी (ग्रामपंचायत निवडणूक) मार्फत जिल्ह्यातील सातही तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकार्‍यांना देण्यात आला होता. या पृष्ठभूमीवर यासंदर्भात जिल्हय़ातील अकोला, आकोट, बाळापूर, बाश्रीटाकळी, पातूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या सात तहसील कार्यालयामार्फ त जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत निवडणूक विभागाला प्राप्त झालेल्या अहवालानुसार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये निवडणूक लढविलेल्या एकूण उमेदवारांपैकी ४९२ उमेदवारांनी अद्यापही निवडणूक खर्चाचे विवरणपत्र सादर केले नाही. निवडणुकीचा खर्च सादर न करणार्‍या या उमेदवारांवर पाच वर्षांसाठी निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविण्याची कारवाई करण्यात येणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत विभागामार्फत तयारी सुरू करण्यात आली आहे.