शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

लोकअदालतमध्ये ४८९ प्रकरणे निकाली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 14:17 IST

जिल्ह्यातील सर्व दिवाणी व फौजदारी न्यायालयांसह इतरही न्यायालयांमधील एकूण ५ हजार ९९३९ प्रलंबित प्रकरणांपैकी ४८९ प्रकरणे निकाली काढण्यात आली.

अकोला: राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार, १३ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व दिवाणी व फौजदारी न्यायालयांसह इतरही न्यायालयांमधील एकूण ५ हजार ९९३९ प्रलंबित प्रकरणांपैकी ४८९ प्रकरणे निकाली काढण्यात आली.शनिवारी दिवाणी, फौजदारी, कामगार, सहकार, कौटुंबिक आणि औद्योगिक न्यायालयांमधील प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याच्या दृष्टिकोनातून लोकअदालतमध्ये ठेवण्यात आली होती. लोकअदालतमध्ये भारत संचार निगमसह विविध बँकांची एकूण दाखलपूर्व २ हजार ५८६ प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. त्यापैकी ९२ प्रकरणांमध्ये ४१ लाख ४३ हजार ४३ रुपयांवर तडजोड करण्यात आली. यासोबतच तालुका न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या ३ हजार ३५३ प्रकरणे सुनावणीसाठी लोकअदालतमध्ये ठेवण्यात आली होती. त्यापैकी ३९७ प्रकरणांमध्ये ४ कोटी २७ लाख ७२ हजार ९७0 रुपयांवर तडजोड करण्यात आली. लोकअदालत यशस्वी करण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष व प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वाय. जी. खोब्रागडे, सचिव स्वरूप बोस यांच्या मार्गदर्शनात न्यायालय प्रबंधक ए. एस. लव्हाळे, विधी सेवा प्राधिकरणाचे अधीक्षक राजेंद्र निकुंभ, श्रीहरी टाकळीकर, व्ही. आर. पोहरे, कुणाल पांडे व शाहबाज खान यांनी प्रयत्न केले. (प्रतिनिधी)

 

टॅग्स :AkolaअकोलाCourtन्यायालय