शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ४.७१ लाख हेक्टर खरीप पेरणीचे नियोजन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:19 IST

अकोला: खरीप हंगाम २०२१ करिता जिल्ह्यात ४ लाख ७१ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले असून, त्यामध्ये ...

अकोला: खरीप हंगाम २०२१ करिता जिल्ह्यात ४ लाख ७१ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले असून, त्यामध्ये सर्वाधिक २ लाख ९१ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन आणि १ लाख ४७ हजार हेक्टर क्षेत्रावर कापूस पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा खरीप हंगामपूर्व नियोजन बैठकीत शुक्रवारी देण्यात आली. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वेळेवर व वाजवी दरात तसेच थेट बांधावर बियाणे, खते, कीटकनाशके इत्यादी कृषी निविष्ठांची उपलब्धता करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश पालकमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी यंत्रणांना यावेळी दिले. ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आलेल्या या बैठकीत आ. अमोल मिटकरी, आ. गोवर्धन शर्मा, आ. हरीश पिंपळे, आ. रणधीर सावरकर, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, विभागीय कृषी सहसंचालक शंकर तोटावर, कृषी उपसंचालक अरुण वाघमारे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. के. बी. खोत, महाबीजचे विभागीय व्यवस्थापक जगदीशसिंग खोकड, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक आलोक तारेणिया आदी अधिकारी सहभागी झाले होते.

शेतकऱ्यांना वेळेवर बी-बियाणे, खते, कीटकनाशकांचा पुरवठा व्हावा, त्यादृष्टीने नियोजन करण्याची अपेक्षा आ. गोवर्धन शर्मा यांनी व्यक्त केली.

आ. हरीश पिंपळे यांनी सोयाबीन बियाण्याच्या उपलब्धतेबाबत खातरजमा करून घेण्याची सूचना मांडली.

आ. रणधीर सावरकर यांनी पीक कर्ज वाटप व पीक विमा यासंदर्भात शेतकऱ्यांना तत्काळ सुविधा पुरविल्या जाव्या. त्यासाठी शेतकऱ्यांना विनाकारण हेलपाटे सहन करण्याची वेळ येऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त करीत, गहू खरेदी केंद्रांचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी त्यांनी केली.

आ. अमोल मिटकरी यांनी सोयाबीनच्या बियाण्याचा पुरवठा, कपाशीवरील बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना, खतांची साठेबाजी रोखण्यासाठी तसेच थेट बांधावर खते पोहोचविण्याबाबत नियोजन करण्यासंदर्भात मुद्दे मांडले.

सोयाबीनची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांच्या घरचे बियाणे वापरण्याचे प्रमाण अधिक आहे. तरीही शेतकऱ्यांनी सोयाबीनची उगवण क्षमता तपासणी करून पेरणी करावी, तसेच सोयाबीन पेरणीबाबत तांत्रिक तपशील अधिक सोप्या भाषेत त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याच्या सूचना पालकमंत्री बच्चू कडू यांनी कृषी विभागाला दिल्या. सोयाबीनसोबत आंतरपिकेही घ्यावी, असे सांगत शासनाने सोयाबीन लागवडीबाबत जारी केलेला चतुःसूत्री कार्यक्रम अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपासाठी नियोजन करण्याचे निर्देशही पालकमंत्री बच्चू कडू यांनी दिले.

बियाणे, खतांच्या दरांवर नियंत्रण ठेवा!

प्रत्येक गावात कृषिसेवक हजर असले पाहिजे, यासाठी कृषी सेवकांचे कार्यक्रम जाहीर करण्याचे सांगत, बियाणे व खतांच्या उपलब्धतेसह प्रशासनाने नियोजन करून दरांवर नियंत्रण ठेवण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. मुंडे अपघात विमा योजनेचा शेतकऱ्यांमध्ये प्रचार व प्रसार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

खरीप पेरणीचे असे आहे नियोजन!

जिल्ह्यात सोयाबीन- २ लाख ९,१०० हेक्टर, कापूस १ लाख ४७ हजार हेक्टर, तूर ५१ हजार २०० हेक्टर, मूग-३५ हजार १५० हेक्टर, उडीद- १६ हजार १२५ हेक्टर, ज्वारी-८,७०० हेक्टर, मका २८५ हेक्टर, असे एकूण ४ लाख ७१ हजार १०० हेक्टर क्षेत्रावर खरिपाचे नियोजन आहे.

बियाण्यांची मागणी व उपलब्धता!

सोयाबीन पिकासाठी १ लाख ५६ हजार ८२५ क्विंटल बियाण्यांची आवश्यकता आहे. त्यासाठी ३२ हजार २९९ क्विंटल बियाण्यांची मागणी आहे. त्यापैकी २८ हजार क्विंटल महाबीज व कृभकोमार्फत तर खासगी उत्पादकांकडून ५,९९९ क्विंटल बियाणे उपलब्ध होणार आहे. तर शेतकऱ्यांकडे एक लाख ६७ हजार १५६ क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. कापूस पिकासाठी ३,६७५ क्विंटल (७ लाख ३५ हजार पाकिटे) बियाणे लागणार असून, हा पुरवठाही खासगी उत्पादकांकडून ३,६६६ क्विंटल तर महाबीजकडून नऊ क्विंटल बियाणे उपलब्धता होणार आहे. तूर पिकासाठी २,६८८ क्विंटल बियाण्याची मागणी असून, महाबीजमार्फत २,१०० क्विंटल महाबीज तर खासगी उत्पादकांकडून ५८८ क्विंटल बियाणे पुरविण्यात येणार आहेत.

खतांची मागणी व उपलब्धता

जिल्ह्यात ९५ हजार ७०० मेट्रिक टन खतांची मागणी असून, जिल्ह्याला ७७ हजार ९९० मेट्रिक टन आवंटन मंजूर आहे. गतवर्षीचे १८ हजार ६९६ मेट्रिक टन खत शिल्लक असून, खतांचे आवंटन उपलब्ध होत आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.