शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू, वाहून गेलेल्यांचा शोध सुरू; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
3
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
4
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
5
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
6
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
7
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
8
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
9
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
10
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
11
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
12
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
13
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
14
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
15
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
16
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
17
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
18
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
19
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!

४४ गावांतून टँकर हटवण्याची तयारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 01:43 IST

अकोला : खारपाणपट्टय़ातील ५५ गावांमध्ये टँकरने सुरू असलेला पुरवठा बंद करून त्याऐवजी ८४ खेडी योजनेतून त्यापैकी ४४ गावांना पुरवठा करण्याच्या उपाययोजनेचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने तयार केला आहे. प्रशासकीय मान्यतेनंतर जलव्यवस्थापन समितीच्या मंजुरीसाठी हा प्रस्ताव ठेवला जाणार आहे.

ठळक मुद्दे८४ खेडी योजनेतून पाणी पुरवठय़ाची उपाययोजना

सदानंद सिरसाट। लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : खारपाणपट्टय़ातील ५५ गावांमध्ये टँकरने सुरू असलेला पुरवठा बंद करून त्याऐवजी ८४ खेडी योजनेतून त्यापैकी ४४ गावांना पुरवठा करण्याच्या उपाययोजनेचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने तयार केला आहे. प्रशासकीय मान्यतेनंतर जलव्यवस्थापन समितीच्या मंजुरीसाठी हा प्रस्ताव ठेवला जाणार आहे.खारपाणपट्टय़ातील गावांसाठी जीवनवाहिनी असलेली ६४ खेडी पाणी पुरवठा योजना पावसाळ्य़ातच म्हणजे ऑगस्टमध्ये बंद पडली. त्यामुळे मोठय़ा संख्येने असलेल्या या गावांना पाणी पुरवठा कोठून करावा, ही समस्या उभी ठाकली. त्यावर उपाययोजना म्हणून २६ टँकर्सद्वारे पाणी पुरवठा सुरू करण्यात आला. गेल्या वर्षी योजनेतील ५५ गावांना वान प्रकल्पाच्या देवरी फाटा आणि चोहोट्टा येथील व्हॉल्व्हवरून टँकरमध्ये पाणी घेण्यात आले. यावर्षी वानचे पाणी मिळते की नाही, ही समस्या पावसाळ्य़ातही होती. सद्यस्थितीत प्रकल्पातील साठा पाहता या गावांना पाणी मिळू शकते, हे निश्‍चित झाल्यानंतरच टँकर बंद करण्याची तयारी सुरू झाली. त्यातच प्रकल्पावर अकोट शहर अधिक ८४ खेडी योजना, तेल्हारा शहर, शेगाव शहर अधिक संस्थान, जळगाव जामोद शहर, संग्रामपूर अधिक १४४ खेडी योजनेतील गावे अवलंबून आहेत. 

योजनेतील ही आहेत टँकरग्रस्त गावे टँकरने पुरवठा सुरू असलेल्या ५५ गावांमध्ये अकोला तालुक्यातील सांगवी खुर्द, गोपालखेड, वल्लभनगर, गांधीग्राम, सांगवी बुद्रूक, हिंगणा तामसवाडी, फरार्मदाबाद, निंभोरा, नवथळ, खेकडी, परितवाडा, पाळोदी, निराट, वैराट, गोत्रा, धामणा, राजापूर, बादलापूर, कंचनपूर, आगर, कासली बुद्रूक, कासली खुर्द, म्हातोडी, घुसर, अलिमाबाद, अनकवाडी, दापुरा, मारोडी, एकलारा, खोबरखेड, आपातापा, आखतवाडा, शामाबाद, सुल्तान आजमपूर, आपोती बुद्रूक, आपोती खुर्द, अंबिकापूर, मजलापूर, जलालाबाद, गोणापूर, रामगाव, गोंदापूर, दहिगाव, पळसो खुर्द, धोतर्डी, सांगळूद खुर्द, वरोडी, वाकी, नावखेड, सांगळूद बुद्रूक, कौलखेड गोमासे, कौलखेड, लाखोंडा बुद्रूक, लाखोंडा खुर्द या गावांचा समावेश आहे. 

टँकरचा वारेमाप खर्च वाचणार.आता त्या धरणातून खांबोरा योजनेतील ५५ पैकी ४४ गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने प्रस्ताव तयार केला आहे. ४ कोटी १६ लाख ८३ हजार रुपये खर्चाचे अंदाजपत्रक आहे. ऑगस्टपासून आतापर्यंत टँकरद्वारे पाणी पुरवठय़ावर प्रचंड खर्च झाला आहे. त्यापुढे हा खर्च वाचवून पर्यायी उपाययोजना नव्या प्रस्तावातून तयार होणार आहे. 

४४ गावांना असा होईल पाणी पुरवठा २00४ मध्ये अकोला शहरापर्यंत आणलेल्या जलवाहिनीतून चोहोट्टा येथे पाणी आणले जाईल. त्या जलवाहिनीचा वापर करत ते ६४ खेडी योजनेच्या जलवाहिनीला जोडून घुसर येथे पुरवठा केला जाईल. तेथून विविध गावांना जोडणार्‍या जलवाहिन्यांतून ते गावांमध्ये पोहोचवले जाणार आहे. त्यासाठी जलवाहिन्यांची डागडुजी व काही प्रमाणात नवीन कामे केली जाणार आहेत.

टॅग्स :water transportजलवाहतूक