शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

४३.८४ लाख बीटी कॉटन पॅकेट आले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 10:25 IST

पाऊस पडल्यानंतरच बियाणे बाजार फुलणार, असे कृषी निविष्ठा विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : यावर्षी सोयाबीन बियाणे कमी पडणार असल्याच्या पृष्ठभूमीवर पश्चिम विदर्भात ४३.८४ बीटी कापसाचे पॅकेट पोहोचले आहेत. कापूस बियाण्याची विक्री मात्र संथ गतीने आहे. पाऊस पडल्यानंतरच बियाणे बाजार फुलणार, असे कृषी निविष्ठा विक्रेत्यांचे म्हणणे आहे.विदर्भात यावर्षी ३२ लाख हेक्टरवर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. यानुषंगाने कृषी विभागाने बियाण्याची मागणी नोंदविली आहे. यानुषंगाने कापसाचे बियाणे पोहोचले असून, सोयाबीन बियाण्याचाही पुरवठा झाला आहे. पश्चिम विदर्भातल्या अकोला, बुलडाणा, वाशिम, अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यांसाठी २ लाख ४३ हजार ४५२ क्विंटल सोयाबीन बियाणे बाजारात उपलब्ध झाले आहे. सोयाबीनची उचलही अल्प आहे. याशिवाय तूर २०,३४० क्विंटल, मूग १३,३६७ क्विंटल, उडीद २,१०९ तर ज्वारीचे बियाणे ३,९०३ क्विंटल उपलब्ध झाले आहे.कोरोना विषाणूच्या पृष्ठभूमीवर यावर्षी बियाणे बाजारात पोहोचण्यास विलंब झाला. विशेषकरून काही खासगी कंपन्यांकडून कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी बोलावलेले बियाणे, खते घेऊन येण्यास ट्रक चालकांकडून विलंब होत आहे. असे असले तरी बहुतांशी बियाणे पोहोचले असल्याचा दावा कृषी विभागाकडून केला जात आहे.अकोला जिल्ह्यात केवळ ४,८३१ क्विंटल बियाणे विक्री!अकोला जिल्ह्याची स्थिती बघितल्यास आतापर्यंत ४७,६८३ क्विंटल बियाणे बाजारात आले आहे; परंतु प्रत्यक्षात ४,८३१ क्विंटल बियाणेच विविध माध्यमातून शेतकऱ्यांनी खरेदी केले आहे. त्यामुळे ४२,८५२ क्विंटल बियाणे बाजारात विक्रीविना आहे.

बचत गटाच्या माध्यमातून विक्री!कोरोना विषाणूच्या पृष्ठभूमीवर कृषी विभागाने ‘फिजिकल डिस्टन्स’ पाळता यावे म्हणून शेतकरी बचत गटाच्या माध्यमातून खते, बियाणे, कीटकनाशके शेतकऱ्यांच्या बांधावर करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. याच माध्यमातून आतापर्यंत एक ते दोन टक्के बियाणे पुरवठा करण्यात आला आहे. यामध्ये गती वाढविण्यात येत आहे. अकोला जिल्ह्यात या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. तरीही आतापर्यंत आठ ते नऊ टक्के बियाणे, खते विक्री करण्यात आली.

 

टॅग्स :AkolaअकोलाAgriculture Sectorशेती क्षेत्र