शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

४२ शाळांमधील दुष्काळग्रस्त विद्यार्थी धनादेशापासून वंचित!

By admin | Updated: April 26, 2017 01:32 IST

विद्यार्थ्यांचे नुकसान: शिक्षण विभागाने सूचना देऊनही शाळांनी नेले नाहीत धनादेश

अकोला : दुष्काळग्रस्त भागातील दहावी, बारावीतील विद्यार्थ्यांचे मार्च, एप्रिल २०१६ मध्ये परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्यानुसार शिक्षण विभागाने दुष्काळग्रस्त भागातील २,३८८ विद्यार्थ्यांची यादी तयार करून त्यांचे धनादेशसुद्धा तयार केले; परंतु जिल्ह्यातील ४२ शाळांनी शिक्षण विभागाकडून अद्यापपर्यंत शिक्षण विभागाकडून धनादेश नेलेच नसल्याची माहिती आहे. त्यामुळे या शाळांमधील शेकडो विद्यार्थी धनादेशापासून वंचित आहेत. २०१६ मध्ये जिल्ह्यात अनेक ठिकाणी दुष्काळी वातावरण होते. शेतातील पिके बुडाली. शेतकरी व त्यांच्या कुटुंबांसमोर आर्थिक संकट उभे झाले होते. यातून मार्ग काढण्यासाठी शासनाने जिल्ह्यात काही भाग दुष्काळग्रस्त जाहीर केले आणि दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे दहावी व बारावीचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला; परंतु तोपर्यंत विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्काचा भरणा केला होता. त्यामुळे हे परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांना परत करण्याचा आदेश शिक्षण विभागाला देण्यात आला. शिक्षण विभागाने शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील मुख्याध्यापक, प्राचार्यांना पत्र पाठवून शाळा, महाविद्यालयात शिकणाऱ्या दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची संख्या आणि त्यांच्या बँक खात्यांची माहिती मागविली होती; परंतु अनेक शाळा, महाविद्यालयांकडे विद्यार्थ्यांच्या बँक खात्याची माहिती नसल्यामुळे अडचणी येत होत्या; परंतु शिक्षण विभागाने सातत्याने विद्यार्थ्यांची माहिती मागविल्यामुळे शाळा, महाविद्यालयांनी दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थी, विद्यार्थिनींच्या बँक खात्याचे क्रमांक मिळविले आणि शिक्षण विभागाकडे सादर केले. शिक्षण विभागाकडे आलेल्या माहितीनुसार, २३०६ विद्यार्थ्यांची यादी तयार करून त्यांचे धनादेश तयार केले आणि जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे धनादेश शिक्षण विभागाकडून प्राप्त करून घेण्यास सांगितले. धनादेशाची तारीखही गेली!जिल्ह्यातील अनेक शाळा, महाविद्यालयांनी वारंवार सूचना दिल्यानंतर शाळांनी धनादेश घेतले; परंतु अद्यापही जिल्ह्यातील ४२ शाळांनी विद्यार्थ्यांचे धनादेश प्राप्त करून घेतले नाही, त्यामुळे या शाळांमधील विद्यार्थ्यांना धनादेशापासून वंचित राहावे लागत आहे. शाळांच्या दुर्लक्षामुळे धनादेशाची तारीखसुद्धा निघून गेली आहे.