शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
2
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
3
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
4
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
5
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
6
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
7
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
8
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
9
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
10
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
11
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
12
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
13
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
14
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
15
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
16
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
17
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
18
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
19
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
20
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी

४0 हजारांवर शेतकर्‍यांना मिळेना अन्न सुरक्षा ‘कवच’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 02:28 IST

अकोला : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत जिल्ह्यात २ लाख ३४ हजार ६६४ केशरी शिधापत्रिकाधारक (एपीएल) शेतकर्‍यांना सवलतीच्या दरात गहू व तांदळाचे  वितरण करण्यात येत असले, तरी ४0 हजार ८८0  केशरी शिधापत्रिकाधारक शेतकर्‍यांना सवलतीच्या दरातील धान्याचा लाभ अद्याप मिळाला नाही. त्यामुळे सवलतीच्या दरातील धान्याच्या लाभापासून वंचित असलेल्या जिल्ह्यातील केशरी शिधापत्रिकाधारक शेतकर्‍यांना अन्न सुरक्षा योजनेचे ‘कवच’ केव्हा मिळणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देकेशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी  गहू, तांदळाचा लाभ केव्हा मिळणार?

संतोष येलकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत जिल्ह्यात २ लाख ३४ हजार ६६४ केशरी शिधापत्रिकाधारक (एपीएल) शेतकर्‍यांना सवलतीच्या दरात गहू व तांदळाचे  वितरण करण्यात येत असले, तरी ४0 हजार ८८0  केशरी शिधापत्रिकाधारक शेतकर्‍यांना सवलतीच्या दरातील धान्याचा लाभ अद्याप मिळाला नाही. त्यामुळे सवलतीच्या दरातील धान्याच्या लाभापासून वंचित असलेल्या जिल्ह्यातील केशरी शिधापत्रिकाधारक शेतकर्‍यांना अन्न सुरक्षा योजनेचे ‘कवच’ केव्हा मिळणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत प्राधान्य गटात समाविष्ट दारिद्रय़ रेषेखालील (बीपीएल) आणि अत्योदय योजनेतील लाभार्थी शिधापत्रिकांना दरमहा रास्तभाव दुकानांमधून धान्याचा लाभ देण्यात येतो. दरम्यान, राष्ट्रीय  अन्न सुरक्षा योजनेच्या प्राधान्य गटात समाविष्ट नसलेल्या केशरी शिधापत्रिकाधारक (एपीएल )शेतकर्‍यांना प्रती किलो तीन रुपये दराने गहू आणि प्रती किलो दोन रुपये दराने तांदूळ वितरीत करण्याचा निर्णय शासनामार्फत गत २४ जुलै रोजी २0१५ रोजी घेण्यात आला. त्यानुसार जिल्हा पुरवठा विभागामार्फत जिल्ह्यातील केशरी शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात दरमहा गहू व तांदळाचा लाभ देण्यात येत आहे. जिल्हय़ात २ लाख ७५ हजार ५४४ केशरी शिधापत्रिकाधारक लाभार्थी शेतकरी असून, त्यापैकी २ लाख ३४ हजार ६६४ केशरी शिधापत्रिकाधारक लाभार्थींना सवलतीच्या दरात गहू, तांदूळ वितरीत करण्यात येत आहे. जिल्ह्यातील उर्वरित ४0 हजार ८८0 केशरी शिधापत्रिकाधारक शेतकर्‍यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत सवलतीच्या दरातील धान्याचा लाभ मिळणे बाकी आहे. त्यामुळे धान्याच्या लाभापासून वंचित असलेल्या जिल्ह्यातील केशरी शिधापत्रिकाधारक शेतकर्‍यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचे ‘कवच’ केव्हा मिळणार आणि प्रत्यक्षात सवलतीच्या दरातील गहू व तांदळाचा लाभ केव्हा मिळणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

१ लाख ३७ हजार क्विंटल धान्य नियतनाची मागणीराष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत जिल्ह्यातील केशरी शिधापत्रिकाधारक २ लाख ७५ हजार ५४४ लाभार्थी शेतकर्‍यांना धान्य वितरित करण्यासाठी ऑगस्ट महिन्याकरिता १ लाख ३७ हजार ७७0 क्विंटल धान्याचे नियतन मंजूर करण्याची मागणी जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे करण्यात आली आहे. त्यामध्ये ८ हजार २६६ क्विंटल गहू आणि ५ हजार ५१0 क्विंटल तांदूळ नियतनाचा समावेश आहे.