शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

४0 हजारांवर शेतकर्‍यांना मिळेना अन्न सुरक्षा ‘कवच’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 02:28 IST

अकोला : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत जिल्ह्यात २ लाख ३४ हजार ६६४ केशरी शिधापत्रिकाधारक (एपीएल) शेतकर्‍यांना सवलतीच्या दरात गहू व तांदळाचे  वितरण करण्यात येत असले, तरी ४0 हजार ८८0  केशरी शिधापत्रिकाधारक शेतकर्‍यांना सवलतीच्या दरातील धान्याचा लाभ अद्याप मिळाला नाही. त्यामुळे सवलतीच्या दरातील धान्याच्या लाभापासून वंचित असलेल्या जिल्ह्यातील केशरी शिधापत्रिकाधारक शेतकर्‍यांना अन्न सुरक्षा योजनेचे ‘कवच’ केव्हा मिळणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देकेशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी  गहू, तांदळाचा लाभ केव्हा मिळणार?

संतोष येलकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत जिल्ह्यात २ लाख ३४ हजार ६६४ केशरी शिधापत्रिकाधारक (एपीएल) शेतकर्‍यांना सवलतीच्या दरात गहू व तांदळाचे  वितरण करण्यात येत असले, तरी ४0 हजार ८८0  केशरी शिधापत्रिकाधारक शेतकर्‍यांना सवलतीच्या दरातील धान्याचा लाभ अद्याप मिळाला नाही. त्यामुळे सवलतीच्या दरातील धान्याच्या लाभापासून वंचित असलेल्या जिल्ह्यातील केशरी शिधापत्रिकाधारक शेतकर्‍यांना अन्न सुरक्षा योजनेचे ‘कवच’ केव्हा मिळणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत प्राधान्य गटात समाविष्ट दारिद्रय़ रेषेखालील (बीपीएल) आणि अत्योदय योजनेतील लाभार्थी शिधापत्रिकांना दरमहा रास्तभाव दुकानांमधून धान्याचा लाभ देण्यात येतो. दरम्यान, राष्ट्रीय  अन्न सुरक्षा योजनेच्या प्राधान्य गटात समाविष्ट नसलेल्या केशरी शिधापत्रिकाधारक (एपीएल )शेतकर्‍यांना प्रती किलो तीन रुपये दराने गहू आणि प्रती किलो दोन रुपये दराने तांदूळ वितरीत करण्याचा निर्णय शासनामार्फत गत २४ जुलै रोजी २0१५ रोजी घेण्यात आला. त्यानुसार जिल्हा पुरवठा विभागामार्फत जिल्ह्यातील केशरी शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात दरमहा गहू व तांदळाचा लाभ देण्यात येत आहे. जिल्हय़ात २ लाख ७५ हजार ५४४ केशरी शिधापत्रिकाधारक लाभार्थी शेतकरी असून, त्यापैकी २ लाख ३४ हजार ६६४ केशरी शिधापत्रिकाधारक लाभार्थींना सवलतीच्या दरात गहू, तांदूळ वितरीत करण्यात येत आहे. जिल्ह्यातील उर्वरित ४0 हजार ८८0 केशरी शिधापत्रिकाधारक शेतकर्‍यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत सवलतीच्या दरातील धान्याचा लाभ मिळणे बाकी आहे. त्यामुळे धान्याच्या लाभापासून वंचित असलेल्या जिल्ह्यातील केशरी शिधापत्रिकाधारक शेतकर्‍यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचे ‘कवच’ केव्हा मिळणार आणि प्रत्यक्षात सवलतीच्या दरातील गहू व तांदळाचा लाभ केव्हा मिळणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

१ लाख ३७ हजार क्विंटल धान्य नियतनाची मागणीराष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत जिल्ह्यातील केशरी शिधापत्रिकाधारक २ लाख ७५ हजार ५४४ लाभार्थी शेतकर्‍यांना धान्य वितरित करण्यासाठी ऑगस्ट महिन्याकरिता १ लाख ३७ हजार ७७0 क्विंटल धान्याचे नियतन मंजूर करण्याची मागणी जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे करण्यात आली आहे. त्यामध्ये ८ हजार २६६ क्विंटल गहू आणि ५ हजार ५१0 क्विंटल तांदूळ नियतनाचा समावेश आहे.