शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

४0 हजारांवर शेतकर्‍यांना मिळेना अन्न सुरक्षा ‘कवच’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 02:28 IST

अकोला : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत जिल्ह्यात २ लाख ३४ हजार ६६४ केशरी शिधापत्रिकाधारक (एपीएल) शेतकर्‍यांना सवलतीच्या दरात गहू व तांदळाचे  वितरण करण्यात येत असले, तरी ४0 हजार ८८0  केशरी शिधापत्रिकाधारक शेतकर्‍यांना सवलतीच्या दरातील धान्याचा लाभ अद्याप मिळाला नाही. त्यामुळे सवलतीच्या दरातील धान्याच्या लाभापासून वंचित असलेल्या जिल्ह्यातील केशरी शिधापत्रिकाधारक शेतकर्‍यांना अन्न सुरक्षा योजनेचे ‘कवच’ केव्हा मिळणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देकेशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी  गहू, तांदळाचा लाभ केव्हा मिळणार?

संतोष येलकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत जिल्ह्यात २ लाख ३४ हजार ६६४ केशरी शिधापत्रिकाधारक (एपीएल) शेतकर्‍यांना सवलतीच्या दरात गहू व तांदळाचे  वितरण करण्यात येत असले, तरी ४0 हजार ८८0  केशरी शिधापत्रिकाधारक शेतकर्‍यांना सवलतीच्या दरातील धान्याचा लाभ अद्याप मिळाला नाही. त्यामुळे सवलतीच्या दरातील धान्याच्या लाभापासून वंचित असलेल्या जिल्ह्यातील केशरी शिधापत्रिकाधारक शेतकर्‍यांना अन्न सुरक्षा योजनेचे ‘कवच’ केव्हा मिळणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत प्राधान्य गटात समाविष्ट दारिद्रय़ रेषेखालील (बीपीएल) आणि अत्योदय योजनेतील लाभार्थी शिधापत्रिकांना दरमहा रास्तभाव दुकानांमधून धान्याचा लाभ देण्यात येतो. दरम्यान, राष्ट्रीय  अन्न सुरक्षा योजनेच्या प्राधान्य गटात समाविष्ट नसलेल्या केशरी शिधापत्रिकाधारक (एपीएल )शेतकर्‍यांना प्रती किलो तीन रुपये दराने गहू आणि प्रती किलो दोन रुपये दराने तांदूळ वितरीत करण्याचा निर्णय शासनामार्फत गत २४ जुलै रोजी २0१५ रोजी घेण्यात आला. त्यानुसार जिल्हा पुरवठा विभागामार्फत जिल्ह्यातील केशरी शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात दरमहा गहू व तांदळाचा लाभ देण्यात येत आहे. जिल्हय़ात २ लाख ७५ हजार ५४४ केशरी शिधापत्रिकाधारक लाभार्थी शेतकरी असून, त्यापैकी २ लाख ३४ हजार ६६४ केशरी शिधापत्रिकाधारक लाभार्थींना सवलतीच्या दरात गहू, तांदूळ वितरीत करण्यात येत आहे. जिल्ह्यातील उर्वरित ४0 हजार ८८0 केशरी शिधापत्रिकाधारक शेतकर्‍यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत सवलतीच्या दरातील धान्याचा लाभ मिळणे बाकी आहे. त्यामुळे धान्याच्या लाभापासून वंचित असलेल्या जिल्ह्यातील केशरी शिधापत्रिकाधारक शेतकर्‍यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचे ‘कवच’ केव्हा मिळणार आणि प्रत्यक्षात सवलतीच्या दरातील गहू व तांदळाचा लाभ केव्हा मिळणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

१ लाख ३७ हजार क्विंटल धान्य नियतनाची मागणीराष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत जिल्ह्यातील केशरी शिधापत्रिकाधारक २ लाख ७५ हजार ५४४ लाभार्थी शेतकर्‍यांना धान्य वितरित करण्यासाठी ऑगस्ट महिन्याकरिता १ लाख ३७ हजार ७७0 क्विंटल धान्याचे नियतन मंजूर करण्याची मागणी जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे करण्यात आली आहे. त्यामध्ये ८ हजार २६६ क्विंटल गहू आणि ५ हजार ५१0 क्विंटल तांदूळ नियतनाचा समावेश आहे.