शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

अकोला जिल्हय़ात ४0 टक्केच शाळा प्रगत!

By admin | Updated: March 11, 2017 02:18 IST

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रम कासवगतीने; अकोला जिल्ह्यातील ३४४ शाळा झाल्या प्रगत.

अकोला, दि. १0- प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत ग्रामीण व शहरी भागातील प्राथमिक शाळा डिजिटल आणि ई-लर्निंग करण्यावर भर देण्यात येत आहे. या माध्यमातून शाळा आणि विद्यार्थ्यांची प्रगती उंचावण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. राज्यात अनेक जिल्हय़ामध्ये प्राथमिक शाळांच्या गुणवत्तेचा स्तर उंचावत असताना, अकोला जिल्हय़ात मात्र शाळांच्या प्रगतीची गती थांबली असल्याचे प्राप्त आकडेवरून दिसून येत आहे. जिल्हय़ात आतापर्यंत केवळ ४0 टक्केच शाळा शंभर टक्के प्रगत झाल्या आहेत. शासनाने २२ जून २0१५ पासून प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रम सुरू केला. या उपक्रमांतर्गत प्राथमिक शाळेत जाणार्‍या प्रत्येक विद्यार्थ्याने वयोगटानुसार अपेक्षित क्षमता प्राप्त करणे, त्याच्या शैक्षणिक प्रगतीची चाचण्यांच्या माध्यमातून मूल्यमापन करणे, भाषा व गणित विषयातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविणे, ज्ञानरचनावाद शिक्षण पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षण देऊन त्यांच्या शैक्षणिक विकासासाठी प्रयत्न केल्या जातात, तसेच शाळा डिजिटल करून प्रत्येक चार विद्यार्थ्यांमागे एक टॅब्लेट देऊन त्यांना स्मार्ट करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. राज्यातील इतर जिल्हय़ांमधील ७0 ते ८0 टक्के शाळा प्रगत झाल्या आहेत. या जिल्हय़ांच्या तुलनेत अकोला जिल्हय़ात धीम्या गतीने शाळांची प्रगती होत आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमास शहरातील शाळांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, ग्रामीण भागात त्याउलट परिस्थिती दिसून येत आहे. ग्रामीण भागामध्ये शाळा प्रगत करण्याकडे शिक्षकांचे दुर्लक्ष होत असल्याचे प्राप्त आकडेवरून स्पष्ट होत आहे. जिल्हय़ात एकूण ९१२ प्राथमिक शाळा आहेत. त्यापैकी अध्र्याही शाळा प्रगत झाल्या नसल्याची वस्तुस्थिती आहे. जिल्हय़ात आतापर्यंत ३४४ शाळाच प्रगत झाल्या आहेत. शिक्षण विभागाने जिल्हय़ातील अधिकाधिक शाळा प्रगत करण्यासाठी प्रयत्न केले आहेत; परंतु शिक्षकांकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे जिल्हय़ातील प्राथमिक शाळांच्या प्रगतीचा टक्का घसरला आहे. त्यामागे अनेक कारणे आहेत. या कारणांचा शोध घेऊन शिक्षण विभागाने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रम राबविण्यात येणार्‍या अडचणी आणि शिक्षकांना येणार्‍या समस्या, सोयी-सुविधा याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे शिक्षण तज्ज्ञांचे मत आहे. तालुकानिहाय प्रगत शाळाअकोला-           १३८अकोट-              ११बाळापूर-            ४0बाश्रीटाकळी-      ३४पातूर-                २४मूर्तिजापूर-         ५६तेल्हारा-              ४१............एकूण -             ३४४जिल्हय़ात धिम्या गतीने शाळांची प्रगती होत आहे, असे म्हणता येणार नाही. ज्ञानरचनावाद शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांंची प्रगती होत आहे. त्यामुळेच आतापर्यंत ४0 टक्के शाळा प्रगत झाल्या आहेत. शाळा प्रगत कशा होतील, त्याची टक्केवारी कशी वाढेल, यासाठी प्रयत्न करण्यात येतील. प्रशांत दिग्रसकर, शिक्षणाधिकारीप्राथमिक विभाग जिल्हा परिषद