शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
2
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
3
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
4
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
5
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
6
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
7
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन
8
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
9
कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'
10
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
11
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
12
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
13
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
14
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
15
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
16
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
17
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
18
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
19
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
20
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी

अकोला जिल्हय़ात ४0 टक्केच शाळा प्रगत!

By admin | Updated: March 11, 2017 02:18 IST

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रम कासवगतीने; अकोला जिल्ह्यातील ३४४ शाळा झाल्या प्रगत.

अकोला, दि. १0- प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत ग्रामीण व शहरी भागातील प्राथमिक शाळा डिजिटल आणि ई-लर्निंग करण्यावर भर देण्यात येत आहे. या माध्यमातून शाळा आणि विद्यार्थ्यांची प्रगती उंचावण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. राज्यात अनेक जिल्हय़ामध्ये प्राथमिक शाळांच्या गुणवत्तेचा स्तर उंचावत असताना, अकोला जिल्हय़ात मात्र शाळांच्या प्रगतीची गती थांबली असल्याचे प्राप्त आकडेवरून दिसून येत आहे. जिल्हय़ात आतापर्यंत केवळ ४0 टक्केच शाळा शंभर टक्के प्रगत झाल्या आहेत. शासनाने २२ जून २0१५ पासून प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रम सुरू केला. या उपक्रमांतर्गत प्राथमिक शाळेत जाणार्‍या प्रत्येक विद्यार्थ्याने वयोगटानुसार अपेक्षित क्षमता प्राप्त करणे, त्याच्या शैक्षणिक प्रगतीची चाचण्यांच्या माध्यमातून मूल्यमापन करणे, भाषा व गणित विषयातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविणे, ज्ञानरचनावाद शिक्षण पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षण देऊन त्यांच्या शैक्षणिक विकासासाठी प्रयत्न केल्या जातात, तसेच शाळा डिजिटल करून प्रत्येक चार विद्यार्थ्यांमागे एक टॅब्लेट देऊन त्यांना स्मार्ट करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. राज्यातील इतर जिल्हय़ांमधील ७0 ते ८0 टक्के शाळा प्रगत झाल्या आहेत. या जिल्हय़ांच्या तुलनेत अकोला जिल्हय़ात धीम्या गतीने शाळांची प्रगती होत आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमास शहरातील शाळांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, ग्रामीण भागात त्याउलट परिस्थिती दिसून येत आहे. ग्रामीण भागामध्ये शाळा प्रगत करण्याकडे शिक्षकांचे दुर्लक्ष होत असल्याचे प्राप्त आकडेवरून स्पष्ट होत आहे. जिल्हय़ात एकूण ९१२ प्राथमिक शाळा आहेत. त्यापैकी अध्र्याही शाळा प्रगत झाल्या नसल्याची वस्तुस्थिती आहे. जिल्हय़ात आतापर्यंत ३४४ शाळाच प्रगत झाल्या आहेत. शिक्षण विभागाने जिल्हय़ातील अधिकाधिक शाळा प्रगत करण्यासाठी प्रयत्न केले आहेत; परंतु शिक्षकांकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे जिल्हय़ातील प्राथमिक शाळांच्या प्रगतीचा टक्का घसरला आहे. त्यामागे अनेक कारणे आहेत. या कारणांचा शोध घेऊन शिक्षण विभागाने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रम राबविण्यात येणार्‍या अडचणी आणि शिक्षकांना येणार्‍या समस्या, सोयी-सुविधा याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे शिक्षण तज्ज्ञांचे मत आहे. तालुकानिहाय प्रगत शाळाअकोला-           १३८अकोट-              ११बाळापूर-            ४0बाश्रीटाकळी-      ३४पातूर-                २४मूर्तिजापूर-         ५६तेल्हारा-              ४१............एकूण -             ३४४जिल्हय़ात धिम्या गतीने शाळांची प्रगती होत आहे, असे म्हणता येणार नाही. ज्ञानरचनावाद शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांंची प्रगती होत आहे. त्यामुळेच आतापर्यंत ४0 टक्के शाळा प्रगत झाल्या आहेत. शाळा प्रगत कशा होतील, त्याची टक्केवारी कशी वाढेल, यासाठी प्रयत्न करण्यात येतील. प्रशांत दिग्रसकर, शिक्षणाधिकारीप्राथमिक विभाग जिल्हा परिषद