शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
4
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
5
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
6
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
7
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
8
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
9
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
10
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
11
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
12
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
13
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
14
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
15
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
16
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
17
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
18
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
19
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
20
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!

पहिली ते दहावीतील पटसंख्येत ३८३ ने घट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:43 IST

कोरोनामुळे कामगार, मजूर हे आपापल्या गावी परतले. यापैकी काहींच्या पाल्यांनी त्यांच्या स्व-जिल्ह्यातच प्रवेश घेतले, तर जिल्ह्यातील काही पालकांनी आपल्या ...

कोरोनामुळे कामगार, मजूर हे आपापल्या गावी परतले. यापैकी काहींच्या पाल्यांनी त्यांच्या स्व-जिल्ह्यातच प्रवेश घेतले, तर जिल्ह्यातील काही पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश खासगी शाळेत घेतला; परंतु आता हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे. बाहेरगावी, परप्रांतात गेलेले मजूर रोजगारासाठी जिल्ह्यात परत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांमध्ये घटलेली विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग प्रयत्न करीत आहे. जिल्हा परिषद शाळेत पुरेशा प्रमाणात भौतिक सुविधा उपलब्ध करण्याला प्राधान्य देण्यात येत आहे, तसेच नानाविध उपक्रम राबवून शैक्षणिक दर्जा उंचाविण्याचा प्रयत्न केला जात आहे. दुसरीकडे काही शाळांमध्ये भौतिक सुविधा उपलब्ध करण्याला अजून बराच वाव आहे. गतवर्षीसुद्धा ४४० विद्यार्थ्यांची गळती झाली होती. कोरोनामुळे ही गळती वाढण्याची भीती निर्माण झाली होती; परंतु आता जनजीवन पूर्वपदावर येत असल्याने आणि इयत्ता ९ ते १२ वीपर्यंतच्या वर्गांना परवानगी दिल्याने, शैक्षणिक कार्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे गळती झालेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येची तूट भरून काढण्यासाठी प्राथमिक शिक्षण विभाग प्रयत्न करीत आहे.

प्रशासन व पालकांच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांची गळती!

यंदा कोरोनामुळे मजूर व कामगार हे आपापल्या मूळ गावी परतले आहेत. यापैकी अनेकजण अकोला जिल्ह्यात परत आले नाहीत. त्यामुळे या पाल्यांचे प्रवेश रखडले आहेत. तसेच काही पालकांनी खासगी शाळांना पसंती दिल्याने पटसंख्येत घट आल्याचे दिसून आहे. मजूर, कामगार हे जिल्ह्यात परतल्यानंतर इयत्ता पहिली ते दहावीतील पटसंख्या पूर्ववत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

कोरोना संकट असून, आता जनजीवन पूर्वपदावर येत आहे. विद्यार्थी संख्येत यंदा ३८३ ने घट झाली असली तरी, ही घट भरून काढण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडून विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. पटसंख्या वाढविण्यासाठी विद्यार्थी शोधमोहीम राबविण्यात येणार आहे.

डॉ. वैशाली ठग, शिक्षणाधिकारी प्राथमिक