शहरं
Join us  
Trending Stories
1
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
2
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
3
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
4
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
5
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
6
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
7
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
8
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
9
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
10
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
11
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
12
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
13
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
14
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
15
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
16
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
17
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
18
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
19
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
20
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी

पहिली ते दहावीतील पटसंख्येत ३८३ ने घट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:43 IST

कोरोनामुळे कामगार, मजूर हे आपापल्या गावी परतले. यापैकी काहींच्या पाल्यांनी त्यांच्या स्व-जिल्ह्यातच प्रवेश घेतले, तर जिल्ह्यातील काही पालकांनी आपल्या ...

कोरोनामुळे कामगार, मजूर हे आपापल्या गावी परतले. यापैकी काहींच्या पाल्यांनी त्यांच्या स्व-जिल्ह्यातच प्रवेश घेतले, तर जिल्ह्यातील काही पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश खासगी शाळेत घेतला; परंतु आता हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे. बाहेरगावी, परप्रांतात गेलेले मजूर रोजगारासाठी जिल्ह्यात परत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांमध्ये घटलेली विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग प्रयत्न करीत आहे. जिल्हा परिषद शाळेत पुरेशा प्रमाणात भौतिक सुविधा उपलब्ध करण्याला प्राधान्य देण्यात येत आहे, तसेच नानाविध उपक्रम राबवून शैक्षणिक दर्जा उंचाविण्याचा प्रयत्न केला जात आहे. दुसरीकडे काही शाळांमध्ये भौतिक सुविधा उपलब्ध करण्याला अजून बराच वाव आहे. गतवर्षीसुद्धा ४४० विद्यार्थ्यांची गळती झाली होती. कोरोनामुळे ही गळती वाढण्याची भीती निर्माण झाली होती; परंतु आता जनजीवन पूर्वपदावर येत असल्याने आणि इयत्ता ९ ते १२ वीपर्यंतच्या वर्गांना परवानगी दिल्याने, शैक्षणिक कार्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे गळती झालेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येची तूट भरून काढण्यासाठी प्राथमिक शिक्षण विभाग प्रयत्न करीत आहे.

प्रशासन व पालकांच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांची गळती!

यंदा कोरोनामुळे मजूर व कामगार हे आपापल्या मूळ गावी परतले आहेत. यापैकी अनेकजण अकोला जिल्ह्यात परत आले नाहीत. त्यामुळे या पाल्यांचे प्रवेश रखडले आहेत. तसेच काही पालकांनी खासगी शाळांना पसंती दिल्याने पटसंख्येत घट आल्याचे दिसून आहे. मजूर, कामगार हे जिल्ह्यात परतल्यानंतर इयत्ता पहिली ते दहावीतील पटसंख्या पूर्ववत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

कोरोना संकट असून, आता जनजीवन पूर्वपदावर येत आहे. विद्यार्थी संख्येत यंदा ३८३ ने घट झाली असली तरी, ही घट भरून काढण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडून विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. पटसंख्या वाढविण्यासाठी विद्यार्थी शोधमोहीम राबविण्यात येणार आहे.

डॉ. वैशाली ठग, शिक्षणाधिकारी प्राथमिक