शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

पहिली ते दहावीतील पटसंख्येत ३८३ ने घट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:43 IST

कोरोनामुळे कामगार, मजूर हे आपापल्या गावी परतले. यापैकी काहींच्या पाल्यांनी त्यांच्या स्व-जिल्ह्यातच प्रवेश घेतले, तर जिल्ह्यातील काही पालकांनी आपल्या ...

कोरोनामुळे कामगार, मजूर हे आपापल्या गावी परतले. यापैकी काहींच्या पाल्यांनी त्यांच्या स्व-जिल्ह्यातच प्रवेश घेतले, तर जिल्ह्यातील काही पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश खासगी शाळेत घेतला; परंतु आता हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे. बाहेरगावी, परप्रांतात गेलेले मजूर रोजगारासाठी जिल्ह्यात परत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांमध्ये घटलेली विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग प्रयत्न करीत आहे. जिल्हा परिषद शाळेत पुरेशा प्रमाणात भौतिक सुविधा उपलब्ध करण्याला प्राधान्य देण्यात येत आहे, तसेच नानाविध उपक्रम राबवून शैक्षणिक दर्जा उंचाविण्याचा प्रयत्न केला जात आहे. दुसरीकडे काही शाळांमध्ये भौतिक सुविधा उपलब्ध करण्याला अजून बराच वाव आहे. गतवर्षीसुद्धा ४४० विद्यार्थ्यांची गळती झाली होती. कोरोनामुळे ही गळती वाढण्याची भीती निर्माण झाली होती; परंतु आता जनजीवन पूर्वपदावर येत असल्याने आणि इयत्ता ९ ते १२ वीपर्यंतच्या वर्गांना परवानगी दिल्याने, शैक्षणिक कार्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे गळती झालेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येची तूट भरून काढण्यासाठी प्राथमिक शिक्षण विभाग प्रयत्न करीत आहे.

प्रशासन व पालकांच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांची गळती!

यंदा कोरोनामुळे मजूर व कामगार हे आपापल्या मूळ गावी परतले आहेत. यापैकी अनेकजण अकोला जिल्ह्यात परत आले नाहीत. त्यामुळे या पाल्यांचे प्रवेश रखडले आहेत. तसेच काही पालकांनी खासगी शाळांना पसंती दिल्याने पटसंख्येत घट आल्याचे दिसून आहे. मजूर, कामगार हे जिल्ह्यात परतल्यानंतर इयत्ता पहिली ते दहावीतील पटसंख्या पूर्ववत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

कोरोना संकट असून, आता जनजीवन पूर्वपदावर येत आहे. विद्यार्थी संख्येत यंदा ३८३ ने घट झाली असली तरी, ही घट भरून काढण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडून विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. पटसंख्या वाढविण्यासाठी विद्यार्थी शोधमोहीम राबविण्यात येणार आहे.

डॉ. वैशाली ठग, शिक्षणाधिकारी प्राथमिक