शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

बारमाही रस्त्यांची ३७ गावे ‘अवघड’

By admin | Updated: May 26, 2017 03:06 IST

मुख्यालयाचे अंतरही वादग्रस्त : बसफेरी नाही म्हणून ठरविले ‘अवघड’

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यातील काही अपवाद वगळले, तर सर्वच गावे बारमाही रस्त्यांनी जोडलेली आहेत. विविध कारणांमुळे महामंडळाच्या बसफेऱ्या नसल्याचा आधार घेत जिल्ह्यातील ९३ पैकी ३७ गावे शिक्षकांना सेवा देण्यासाठी अवघड असल्याचे शिक्षण विभागाने ठरविले आहे. त्यातच मुख्यालयापासून ३० ते ४५ कि.मी. अंतरावर असलेल्या गावांचाही समावेश केल्याने शासन निर्णयातील अवघड क्षेत्र ठरविण्याच्या निकषावरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.शासनाने जिल्ह्यांतर्गत बदल्यांसंदर्भात १५ मे २०१४ रोजी दिलेल्या आदेशातून शिक्षकांना वगळले. त्यांच्यासाठी २७ फेब्रुवारी २०१७ रोजीच्या निर्णयानुसार नव्याने धोरण निश्चित केले. त्यामध्ये शिक्षकांच्या बदल्या करण्यासाठी अवघड आणि सर्वसाधारण क्षेत्र ठरविण्याची जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांच्यावर सोपविण्यात आली. त्यानुसार अकोला जिल्ह्यात ९३ गावे अवघड असल्याचे जाहीर करण्यात आले; मात्र त्यामध्ये घेतलेल्या निकषाचा आधार पाहता शासन निर्णयातील निकषच कसे तकलादू आहेत, हेच निष्पन्न होत आहे. खासगी वाहनांची रीघ, तरीही दळणवळणास अवघड गावेजिल्हा परिषदेने अवघड ठरविलेल्या ९१ गावांतील शाळांचा समावेश आहे. त्यापैकी ३७ गावांना बारमाही पक्के रस्ते आहेत. तेथे केवळ महामंडळाची बस जात नाही, या निकषावरून ती अवघड ठरली आहेत. वास्तविकपणे त्या गावांमध्ये खासगी वाहनांची रीघ असते, तर काही गावे आंतरजिल्हा मार्गावर असतानाही केवळ मुख्यालयापासून अधिक अंतर असल्याने अवघड यादीत टाकण्यात आली. त्यामुळे बदली धोरणातील निकषच कसे तकलादू ठरत आहेत, याचा उत्तम नमुना त्यातून पुढे आला आहे. महामंडळाची बसफेरी नसलेली गावेपातूर तालुक्यातील गावे मुख्यालयापासूनचे अंतर आणि महामंडळाची बसफेरी नसल्याच्या कारणावरून अवघड ठरली आहेत. त्यापैकी काही गावे अकोला-मेहकर या आंतरजिल्हा मार्गावर वाहनांची सातत्याने वर्दळ असलेली आहेत. त्यामध्ये अडगाव, राहेर, पिंपरडोळी, चोंढी घाटमाळ, निर्गुणा प्रकल्प, गोळेगाव, पाचरण, वनदेव, वसाली, सावरगाव, झरंडी, पांगरताटी, वहाळा, पळसखेड, बेलतळा, दोधाणी, कोसगाव, सोनुना, पांढुर्णा, चारमोळी, सांगोळा, रामनगर, खापरखेडा, अंधारसांगवी, शेकापूर या गावांचा समावेश आहे. अवघड क्षेत्र ठरविण्याचे निकषअवघड क्षेत्रातील गाव ठरविण्यासाठी सर्वसाधारणपणे जे गाव तालुक्याच्या मुख्यालयापासून दूर आहे. दळणवळाच्या दृष्टीने त्या शाळेत अथवा गावात पोहोचण्यासाठी सोयी-सुविधा नाहीत. दुर्गम, डोंगराळ भागातील गावे, काम करण्यास प्रतिकूल परिस्थिती असलेली गावे, असे निकष आहेत.मुख्यालयाच्या निकषातून अवघड ठरलेली सोपी गावे- मुख्यालयापासून अंतराचा निकष लावून अवघड असलेली गावे प्रत्यक्षात किती सोपी आहेत, याची उदाहरणेही आहेत. त्यामध्ये अकोला तालुक्यातील सागवी बु., वाकी, वाळकी, लाखोंडा बु., बाळापूर तालुक्यातील मांजरी, मालवाडा ही गावे अकोला शहरातून जवळ, तर तालुक्याच्या ठिकाणाहून लांब आहेत. - धाडी-बल्हाडी गावाला बारमाही रस्ता आहे. काही गावे केवळ केंद्रप्रमुख आणि मुख्याध्यापकांच्या आग्रहाने ठरली आहेत.