शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

बारमाही रस्त्यांची ३७ गावे ‘अवघड’

By admin | Updated: May 26, 2017 03:06 IST

मुख्यालयाचे अंतरही वादग्रस्त : बसफेरी नाही म्हणून ठरविले ‘अवघड’

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यातील काही अपवाद वगळले, तर सर्वच गावे बारमाही रस्त्यांनी जोडलेली आहेत. विविध कारणांमुळे महामंडळाच्या बसफेऱ्या नसल्याचा आधार घेत जिल्ह्यातील ९३ पैकी ३७ गावे शिक्षकांना सेवा देण्यासाठी अवघड असल्याचे शिक्षण विभागाने ठरविले आहे. त्यातच मुख्यालयापासून ३० ते ४५ कि.मी. अंतरावर असलेल्या गावांचाही समावेश केल्याने शासन निर्णयातील अवघड क्षेत्र ठरविण्याच्या निकषावरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.शासनाने जिल्ह्यांतर्गत बदल्यांसंदर्भात १५ मे २०१४ रोजी दिलेल्या आदेशातून शिक्षकांना वगळले. त्यांच्यासाठी २७ फेब्रुवारी २०१७ रोजीच्या निर्णयानुसार नव्याने धोरण निश्चित केले. त्यामध्ये शिक्षकांच्या बदल्या करण्यासाठी अवघड आणि सर्वसाधारण क्षेत्र ठरविण्याची जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांच्यावर सोपविण्यात आली. त्यानुसार अकोला जिल्ह्यात ९३ गावे अवघड असल्याचे जाहीर करण्यात आले; मात्र त्यामध्ये घेतलेल्या निकषाचा आधार पाहता शासन निर्णयातील निकषच कसे तकलादू आहेत, हेच निष्पन्न होत आहे. खासगी वाहनांची रीघ, तरीही दळणवळणास अवघड गावेजिल्हा परिषदेने अवघड ठरविलेल्या ९१ गावांतील शाळांचा समावेश आहे. त्यापैकी ३७ गावांना बारमाही पक्के रस्ते आहेत. तेथे केवळ महामंडळाची बस जात नाही, या निकषावरून ती अवघड ठरली आहेत. वास्तविकपणे त्या गावांमध्ये खासगी वाहनांची रीघ असते, तर काही गावे आंतरजिल्हा मार्गावर असतानाही केवळ मुख्यालयापासून अधिक अंतर असल्याने अवघड यादीत टाकण्यात आली. त्यामुळे बदली धोरणातील निकषच कसे तकलादू ठरत आहेत, याचा उत्तम नमुना त्यातून पुढे आला आहे. महामंडळाची बसफेरी नसलेली गावेपातूर तालुक्यातील गावे मुख्यालयापासूनचे अंतर आणि महामंडळाची बसफेरी नसल्याच्या कारणावरून अवघड ठरली आहेत. त्यापैकी काही गावे अकोला-मेहकर या आंतरजिल्हा मार्गावर वाहनांची सातत्याने वर्दळ असलेली आहेत. त्यामध्ये अडगाव, राहेर, पिंपरडोळी, चोंढी घाटमाळ, निर्गुणा प्रकल्प, गोळेगाव, पाचरण, वनदेव, वसाली, सावरगाव, झरंडी, पांगरताटी, वहाळा, पळसखेड, बेलतळा, दोधाणी, कोसगाव, सोनुना, पांढुर्णा, चारमोळी, सांगोळा, रामनगर, खापरखेडा, अंधारसांगवी, शेकापूर या गावांचा समावेश आहे. अवघड क्षेत्र ठरविण्याचे निकषअवघड क्षेत्रातील गाव ठरविण्यासाठी सर्वसाधारणपणे जे गाव तालुक्याच्या मुख्यालयापासून दूर आहे. दळणवळाच्या दृष्टीने त्या शाळेत अथवा गावात पोहोचण्यासाठी सोयी-सुविधा नाहीत. दुर्गम, डोंगराळ भागातील गावे, काम करण्यास प्रतिकूल परिस्थिती असलेली गावे, असे निकष आहेत.मुख्यालयाच्या निकषातून अवघड ठरलेली सोपी गावे- मुख्यालयापासून अंतराचा निकष लावून अवघड असलेली गावे प्रत्यक्षात किती सोपी आहेत, याची उदाहरणेही आहेत. त्यामध्ये अकोला तालुक्यातील सागवी बु., वाकी, वाळकी, लाखोंडा बु., बाळापूर तालुक्यातील मांजरी, मालवाडा ही गावे अकोला शहरातून जवळ, तर तालुक्याच्या ठिकाणाहून लांब आहेत. - धाडी-बल्हाडी गावाला बारमाही रस्ता आहे. काही गावे केवळ केंद्रप्रमुख आणि मुख्याध्यापकांच्या आग्रहाने ठरली आहेत.