शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

बारमाही रस्त्यांची ३७ गावे ‘अवघड’

By admin | Updated: May 26, 2017 03:06 IST

मुख्यालयाचे अंतरही वादग्रस्त : बसफेरी नाही म्हणून ठरविले ‘अवघड’

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यातील काही अपवाद वगळले, तर सर्वच गावे बारमाही रस्त्यांनी जोडलेली आहेत. विविध कारणांमुळे महामंडळाच्या बसफेऱ्या नसल्याचा आधार घेत जिल्ह्यातील ९३ पैकी ३७ गावे शिक्षकांना सेवा देण्यासाठी अवघड असल्याचे शिक्षण विभागाने ठरविले आहे. त्यातच मुख्यालयापासून ३० ते ४५ कि.मी. अंतरावर असलेल्या गावांचाही समावेश केल्याने शासन निर्णयातील अवघड क्षेत्र ठरविण्याच्या निकषावरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.शासनाने जिल्ह्यांतर्गत बदल्यांसंदर्भात १५ मे २०१४ रोजी दिलेल्या आदेशातून शिक्षकांना वगळले. त्यांच्यासाठी २७ फेब्रुवारी २०१७ रोजीच्या निर्णयानुसार नव्याने धोरण निश्चित केले. त्यामध्ये शिक्षकांच्या बदल्या करण्यासाठी अवघड आणि सर्वसाधारण क्षेत्र ठरविण्याची जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांच्यावर सोपविण्यात आली. त्यानुसार अकोला जिल्ह्यात ९३ गावे अवघड असल्याचे जाहीर करण्यात आले; मात्र त्यामध्ये घेतलेल्या निकषाचा आधार पाहता शासन निर्णयातील निकषच कसे तकलादू आहेत, हेच निष्पन्न होत आहे. खासगी वाहनांची रीघ, तरीही दळणवळणास अवघड गावेजिल्हा परिषदेने अवघड ठरविलेल्या ९१ गावांतील शाळांचा समावेश आहे. त्यापैकी ३७ गावांना बारमाही पक्के रस्ते आहेत. तेथे केवळ महामंडळाची बस जात नाही, या निकषावरून ती अवघड ठरली आहेत. वास्तविकपणे त्या गावांमध्ये खासगी वाहनांची रीघ असते, तर काही गावे आंतरजिल्हा मार्गावर असतानाही केवळ मुख्यालयापासून अधिक अंतर असल्याने अवघड यादीत टाकण्यात आली. त्यामुळे बदली धोरणातील निकषच कसे तकलादू ठरत आहेत, याचा उत्तम नमुना त्यातून पुढे आला आहे. महामंडळाची बसफेरी नसलेली गावेपातूर तालुक्यातील गावे मुख्यालयापासूनचे अंतर आणि महामंडळाची बसफेरी नसल्याच्या कारणावरून अवघड ठरली आहेत. त्यापैकी काही गावे अकोला-मेहकर या आंतरजिल्हा मार्गावर वाहनांची सातत्याने वर्दळ असलेली आहेत. त्यामध्ये अडगाव, राहेर, पिंपरडोळी, चोंढी घाटमाळ, निर्गुणा प्रकल्प, गोळेगाव, पाचरण, वनदेव, वसाली, सावरगाव, झरंडी, पांगरताटी, वहाळा, पळसखेड, बेलतळा, दोधाणी, कोसगाव, सोनुना, पांढुर्णा, चारमोळी, सांगोळा, रामनगर, खापरखेडा, अंधारसांगवी, शेकापूर या गावांचा समावेश आहे. अवघड क्षेत्र ठरविण्याचे निकषअवघड क्षेत्रातील गाव ठरविण्यासाठी सर्वसाधारणपणे जे गाव तालुक्याच्या मुख्यालयापासून दूर आहे. दळणवळाच्या दृष्टीने त्या शाळेत अथवा गावात पोहोचण्यासाठी सोयी-सुविधा नाहीत. दुर्गम, डोंगराळ भागातील गावे, काम करण्यास प्रतिकूल परिस्थिती असलेली गावे, असे निकष आहेत.मुख्यालयाच्या निकषातून अवघड ठरलेली सोपी गावे- मुख्यालयापासून अंतराचा निकष लावून अवघड असलेली गावे प्रत्यक्षात किती सोपी आहेत, याची उदाहरणेही आहेत. त्यामध्ये अकोला तालुक्यातील सागवी बु., वाकी, वाळकी, लाखोंडा बु., बाळापूर तालुक्यातील मांजरी, मालवाडा ही गावे अकोला शहरातून जवळ, तर तालुक्याच्या ठिकाणाहून लांब आहेत. - धाडी-बल्हाडी गावाला बारमाही रस्ता आहे. काही गावे केवळ केंद्रप्रमुख आणि मुख्याध्यापकांच्या आग्रहाने ठरली आहेत.