शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

अन्नधान्याचे ३५ टक्के उत्पादन घटणार!

By admin | Updated: July 15, 2017 02:05 IST

विदर्भातील पेरण्या खोळंबल्या; उलटल्याचा परिणाम

राजरत्न सिरसाट। लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: यावर्षी पावसाने पाठ फिरविल्याने खरीप पिकांची पेरणी खोळंबली असून, पेरलेली पिके उधळल्याने आजमितीस एकट्या विदर्भातील ३० ते ३५ टक्के उत्पादन घटणार आहे. राज्यातील परिस्थितीदेखील चिंताजनक असून, कृषी अर्थव्यवस्थेला हा मोठा फटका मानला जात आहे.राज्यातील खरीप हंगामातील पेरणी क्षेत्र १४९.४२ लाख हेक्टर आहे. यातील ८४.३४ लाख हेक्टरवर (५६ टक्के) पेरणी झाली आहे. याचाच अर्थ ४४ लाख हेक्टर क्षेत्र नापेर आहे. दरवर्षी सरासरी ४१.५८ लाख हेक्टरवर तृणधान्याची पेरणी केली जाते. यावर्षी ती १३.५० लाख हेक्टरवरच झाली आहे. कडधान्याच्या २१.०९ लाख हेक्टरपैकी १३.२८ लाख हेक्टर पेरणी झाली आहे. तेलबिया पिकांच्या ३५.३८ लाख हेक्टरपैकी २६.०४ लाख हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. राज्यात कापसाचे सरासरी क्षेत्र ४१.२९ हेक्टर आहे. त्यापैकी ३१.३६ लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. उसाच्या ९.७८ लाखपैकी ०.१६ लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. विभागनिहाय आकडेवारी बघितल्यास कोकणात १६ टक्केच पेरणी झाली आहे. नाशिक विभागात ५५ टक्के, पुणे ५१ टक्के, कोल्हापूर ५१ टक्के, औरंगाबाद ८६ टक्के, लातूर ७० टक्के, अमरावती ६८ तर नागपूर विभागात ३३ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.अद्याप दमदार व सार्वत्रिक पाऊस नसल्याने विदर्भ, खान्देश तसेच मराठवाड्यातील कापसाचे पीक अखेरच्या घटका मोजत आहे. सोयाबीनची परिस्थितीही तशीच आहे. विदर्भातील खरिपाचे क्षेत्र ५९ लाख हेक्टर आहे. यात पूर्व विदर्भात धानाचे क्षेत्र ७.५ लाख हेक्टर आहे. अद्याप धान पिकाची रोवणी झाली नाही. त्याचा फटका या पिकाला बसला आहे. या पिकाचे उत्पादन हेक्टरी १२ लाख क्विंटल आहे. आजच ३० टक्के उत्पादन घटले आहे.पेरणी अहवालावर निर्बंध?खरीप हंगामातील पेरणीचा अहवाल कृषी विभागातर्फे दरवर्षी जाहीर करण्यात येत होता. तथापि, यावर्षी कृषी विभागाने हा अहवाल देण्यास असमर्थता दर्शविली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतरच अहवाल देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे ७ जुलैपर्यंतचाच अहवाल कृषी विभागाने प्रसिद्ध केला आहे.पेरण्या खोळंबल्या असून, दुबार, तिबार पेरण्या केल्यावरही पाऊस नाही. परिणामी विदर्भ नव्हे तर राज्यातील ३० टक्क्याच्यावर अन्नधान्याचे उत्पादन आजच घटले आहे.- डॉ. शरद निंबाळकर,माजी कुलगुरू ,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.