शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

अन्नधान्याचे ३५ टक्के उत्पादन घटणार!

By admin | Updated: July 15, 2017 02:05 IST

विदर्भातील पेरण्या खोळंबल्या; उलटल्याचा परिणाम

राजरत्न सिरसाट। लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: यावर्षी पावसाने पाठ फिरविल्याने खरीप पिकांची पेरणी खोळंबली असून, पेरलेली पिके उधळल्याने आजमितीस एकट्या विदर्भातील ३० ते ३५ टक्के उत्पादन घटणार आहे. राज्यातील परिस्थितीदेखील चिंताजनक असून, कृषी अर्थव्यवस्थेला हा मोठा फटका मानला जात आहे.राज्यातील खरीप हंगामातील पेरणी क्षेत्र १४९.४२ लाख हेक्टर आहे. यातील ८४.३४ लाख हेक्टरवर (५६ टक्के) पेरणी झाली आहे. याचाच अर्थ ४४ लाख हेक्टर क्षेत्र नापेर आहे. दरवर्षी सरासरी ४१.५८ लाख हेक्टरवर तृणधान्याची पेरणी केली जाते. यावर्षी ती १३.५० लाख हेक्टरवरच झाली आहे. कडधान्याच्या २१.०९ लाख हेक्टरपैकी १३.२८ लाख हेक्टर पेरणी झाली आहे. तेलबिया पिकांच्या ३५.३८ लाख हेक्टरपैकी २६.०४ लाख हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. राज्यात कापसाचे सरासरी क्षेत्र ४१.२९ हेक्टर आहे. त्यापैकी ३१.३६ लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. उसाच्या ९.७८ लाखपैकी ०.१६ लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. विभागनिहाय आकडेवारी बघितल्यास कोकणात १६ टक्केच पेरणी झाली आहे. नाशिक विभागात ५५ टक्के, पुणे ५१ टक्के, कोल्हापूर ५१ टक्के, औरंगाबाद ८६ टक्के, लातूर ७० टक्के, अमरावती ६८ तर नागपूर विभागात ३३ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.अद्याप दमदार व सार्वत्रिक पाऊस नसल्याने विदर्भ, खान्देश तसेच मराठवाड्यातील कापसाचे पीक अखेरच्या घटका मोजत आहे. सोयाबीनची परिस्थितीही तशीच आहे. विदर्भातील खरिपाचे क्षेत्र ५९ लाख हेक्टर आहे. यात पूर्व विदर्भात धानाचे क्षेत्र ७.५ लाख हेक्टर आहे. अद्याप धान पिकाची रोवणी झाली नाही. त्याचा फटका या पिकाला बसला आहे. या पिकाचे उत्पादन हेक्टरी १२ लाख क्विंटल आहे. आजच ३० टक्के उत्पादन घटले आहे.पेरणी अहवालावर निर्बंध?खरीप हंगामातील पेरणीचा अहवाल कृषी विभागातर्फे दरवर्षी जाहीर करण्यात येत होता. तथापि, यावर्षी कृषी विभागाने हा अहवाल देण्यास असमर्थता दर्शविली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतरच अहवाल देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे ७ जुलैपर्यंतचाच अहवाल कृषी विभागाने प्रसिद्ध केला आहे.पेरण्या खोळंबल्या असून, दुबार, तिबार पेरण्या केल्यावरही पाऊस नाही. परिणामी विदर्भ नव्हे तर राज्यातील ३० टक्क्याच्यावर अन्नधान्याचे उत्पादन आजच घटले आहे.- डॉ. शरद निंबाळकर,माजी कुलगुरू ,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.