शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊन काळात लालपरीला ३१ कोटींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:16 IST

आताही स्थिती अर्ध्यावरच, एसटीची चाके फसलेलीच सचिन राऊत, अकोला : कोरोनाच्या संसर्गजन्य विषाणूमुळे मार्च महिन्यापासून ते ऑगस्ट महिन्यापर्यंत देशभरात ...

आताही स्थिती अर्ध्यावरच, एसटीची चाके फसलेलीच

सचिन राऊत, अकोला : कोरोनाच्या संसर्गजन्य विषाणूमुळे मार्च महिन्यापासून ते ऑगस्ट महिन्यापर्यंत देशभरात कडक लॉकडाऊन लावण्यात आले होते. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस जागेवरच उभ्या असल्याने अकोला जिल्ह्यातील पाच आगारांना सुमारे ३१ कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

राज्य परिवहन महामंडळाच्या अकोला विभागीय कार्यालयांतर्गत अकोला जिल्ह्यातील अकोला १, अकोला २, अकोट, तेल्हारा व मूर्तिजापूर हे पाच आगार आहेत. या पाच आगारांतून जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर लांब पल्ल्याच्या बसफेऱ्या रोज सुरू असतात. त्यामुळे एका आगाराला दिवसाला सुमारे पाच लाख रुपयांचे उत्पन्न आहे; मात्र कोरोनाच्या संकटकाळात शासनाने कडक निर्बंध लावल्यामुळे एसटीतून होणारा संसर्ग रोखण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस बंद ठेवण्यात आल्या होत्या. याच सहा महिन्यांच्या कालावधीत एसटीला मोठा आर्थिक फटका बसला आहे. अकोला जिल्ह्यातील पाच आगारांना सुमारे ३१ कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून आता ही परिस्थिती या स्वरूपात असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. राज्य परिवहन महामंडळ या आर्थिक नुकसानीतून बाहेर निघण्याचा प्रयत्न करीत आहे; मात्र ज्या ठिकाणी दिवसाला पाच लाख रुपयांचे उत्पन्न होते त्या ठिकाणी आताच्या काळात दिवसाला केवळ दोन ते अडीच लाख रुपयांचे उत्पन्न मिळत असल्याची माहिती आहे. त्यामुळे एसटी आताही आर्थिक घडी बसविण्यासाठी प्रयत्न करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मालवाहतुकीचा हातभार

कोरोनाच्या संकटकाळात एसटीची प्रवासी वाहतूक बंद असल्याने त्यांनी थोडाफार आर्थिक हातभार लागावा म्हणून तातडीने मालवाहतूक सेवा सुरू केली. एसटीला या संकटकाळात मालवाहतुकीचा मोठा हातभार लागला. मालवाहतुकीमुळे एसटीला अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी खारीचा हातभार उचलण्यास मदत केली. मालवाहतूकीतून आताही एसटीला बऱ्याच प्रमाणात उत्पन्न मिळत असल्याची माहिती आहे.

१८० दिवस एसटी होती बंद

कोरोनाच्या भयावह संकटामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेस २२ मार्च ते २० ऑगस्ट २०२० या कालावधीत तब्बल १८० दिवस बंद होत्या. त्यामुळे अकोला जिल्ह्यातील अकोला एक, अकोला २, अकोट, तेल्हारा व मूर्तीजापूर या पाच आगारांना सुमारे ३० कोटी रुपयांचा फटका बसला आहे. त्यामुळे एसटीवर मोठे आर्थिक संकट आले आहे.

सहा महिन्यांत केवळ तीस फेऱ्या

कोरोनाच्या संकटामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेस बंद असताना अकोला आगारातून केवळ ३० फेऱ्या मारण्यात आले आहेत. परराज्यातील मजुरांना त्यांच्या राज्यात सोडण्यासाठी तीस फेऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या अकोला आगारातील बसने पूर्ण केल्या. मात्र, त्याची ही देयक अद्यापही थकलेली असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.