शहरं
Join us  
Trending Stories
1
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
2
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर पुणे पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
3
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
4
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
5
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
6
प्रेक्षकांचा सूरज चव्हाणला 'गोलीगत धोका', 'झापुक झुपूक'ने पहिल्या आठवड्यात केली फक्त इतकी कमाई
7
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
8
हवाई दलाचं जबरदस्त शक्तिप्रदर्शन, हायवेवर उतरवली मिराज, राफेलसह ही लढाऊ विमानं
9
सिद्धार्थ-मितालीच्या घरी आला छोटा पाहुणा, फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
10
WhatsApp वेबवर व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर लाँच; आता तुम्ही थेट करू शकता कॉल
11
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
12
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाला 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
13
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
14
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
15
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
16
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
17
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
18
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश
19
"मॅडम येत आहेत, त्यांना..."; पोलीस असल्याचं सांगून दुकानात घुसले अन् २ लाखांचे दागिने चोरले
20
ISI कडून मिळाले आदेश, बेताब खोऱ्यात लपवली शस्त्रे; NIA च्या अहवालात धक्कादायक खुलासा

लॉकडाऊन काळात लालपरीला ३१ कोटींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:16 IST

आताही स्थिती अर्ध्यावरच, एसटीची चाके फसलेलीच सचिन राऊत, अकोला : कोरोनाच्या संसर्गजन्य विषाणूमुळे मार्च महिन्यापासून ते ऑगस्ट महिन्यापर्यंत देशभरात ...

आताही स्थिती अर्ध्यावरच, एसटीची चाके फसलेलीच

सचिन राऊत, अकोला : कोरोनाच्या संसर्गजन्य विषाणूमुळे मार्च महिन्यापासून ते ऑगस्ट महिन्यापर्यंत देशभरात कडक लॉकडाऊन लावण्यात आले होते. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस जागेवरच उभ्या असल्याने अकोला जिल्ह्यातील पाच आगारांना सुमारे ३१ कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

राज्य परिवहन महामंडळाच्या अकोला विभागीय कार्यालयांतर्गत अकोला जिल्ह्यातील अकोला १, अकोला २, अकोट, तेल्हारा व मूर्तिजापूर हे पाच आगार आहेत. या पाच आगारांतून जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर लांब पल्ल्याच्या बसफेऱ्या रोज सुरू असतात. त्यामुळे एका आगाराला दिवसाला सुमारे पाच लाख रुपयांचे उत्पन्न आहे; मात्र कोरोनाच्या संकटकाळात शासनाने कडक निर्बंध लावल्यामुळे एसटीतून होणारा संसर्ग रोखण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस बंद ठेवण्यात आल्या होत्या. याच सहा महिन्यांच्या कालावधीत एसटीला मोठा आर्थिक फटका बसला आहे. अकोला जिल्ह्यातील पाच आगारांना सुमारे ३१ कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून आता ही परिस्थिती या स्वरूपात असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. राज्य परिवहन महामंडळ या आर्थिक नुकसानीतून बाहेर निघण्याचा प्रयत्न करीत आहे; मात्र ज्या ठिकाणी दिवसाला पाच लाख रुपयांचे उत्पन्न होते त्या ठिकाणी आताच्या काळात दिवसाला केवळ दोन ते अडीच लाख रुपयांचे उत्पन्न मिळत असल्याची माहिती आहे. त्यामुळे एसटी आताही आर्थिक घडी बसविण्यासाठी प्रयत्न करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मालवाहतुकीचा हातभार

कोरोनाच्या संकटकाळात एसटीची प्रवासी वाहतूक बंद असल्याने त्यांनी थोडाफार आर्थिक हातभार लागावा म्हणून तातडीने मालवाहतूक सेवा सुरू केली. एसटीला या संकटकाळात मालवाहतुकीचा मोठा हातभार लागला. मालवाहतुकीमुळे एसटीला अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी खारीचा हातभार उचलण्यास मदत केली. मालवाहतूकीतून आताही एसटीला बऱ्याच प्रमाणात उत्पन्न मिळत असल्याची माहिती आहे.

१८० दिवस एसटी होती बंद

कोरोनाच्या भयावह संकटामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेस २२ मार्च ते २० ऑगस्ट २०२० या कालावधीत तब्बल १८० दिवस बंद होत्या. त्यामुळे अकोला जिल्ह्यातील अकोला एक, अकोला २, अकोट, तेल्हारा व मूर्तीजापूर या पाच आगारांना सुमारे ३० कोटी रुपयांचा फटका बसला आहे. त्यामुळे एसटीवर मोठे आर्थिक संकट आले आहे.

सहा महिन्यांत केवळ तीस फेऱ्या

कोरोनाच्या संकटामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेस बंद असताना अकोला आगारातून केवळ ३० फेऱ्या मारण्यात आले आहेत. परराज्यातील मजुरांना त्यांच्या राज्यात सोडण्यासाठी तीस फेऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या अकोला आगारातील बसने पूर्ण केल्या. मात्र, त्याची ही देयक अद्यापही थकलेली असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.