शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाकाळात जिल्ह्यात २७२ शेतकरी आढळले तणावग्रस्त !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:40 IST

संतोष येलकर अकोला : कोरोनाकाळात जुलै अखेरपर्यंत प्रेरणा प्रकल्प अंतर्गत जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये करण्यात आलेल्या तपासण्यांमध्ये जिल्ह्यात २७२ ...

संतोष येलकर

अकोला : कोरोनाकाळात जुलै अखेरपर्यंत प्रेरणा प्रकल्प अंतर्गत जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये करण्यात आलेल्या तपासण्यांमध्ये जिल्ह्यात २७२ शेतकरी मानसिक तणावग्रस्त आढळून आले. तणावग्रस्त शेतकऱ्यांवर उपचारासह त्यांचे समुपदेशन करण्यात आले.

जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या प्रेरणा प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांसाठी बाह्यरुग्ण तपासणी, समुपदेशन सत्रे, शेेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांचे समुपदेशन आदी कार्यक्रम राबविण्यात येतात. गत मार्च २०२० ते जुलै २०२१ अखेरपर्यंतच्या कोरोनाकाळात प्रेरणा प्रकल्प अंतर्गत सर्वोपचार रुग्णालयासह जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयांमध्ये करण्यात आलेल्या बाह्यरुग्ण तपासण्यांमध्ये २७२ शेतकरी मानसिकदृष्ट्या तणावग्रस्त असल्याचे आढळून आले. तणावग्रस्त आढळलेल्या शेतकऱ्यांवर जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या प्रेरणा प्रकल्पांतर्गत औषधोपचार आणि मानसोपचार तज्ज्ञांमार्फत संबंधित तणावग्रस्त शेतकऱ्यांचे समुदेशन करण्यात आले.

शेतकऱ्यांमध्ये तणावाची

अशी आढळली कारणे!

कोरोनाकाळात जुलै अखेरपर्यंत जिल्ह्यात २७२ शेतकरी तणावग्रस्त आढळून आले. त्यामध्ये आर्थिक अडचण, नापिकी व कर्जबाजारीपणा, कौटुंबिक समस्या, झालेले नुकसान इत्यादी कारणांमुळे शेतकरी तणावग्रस्त असल्याचे आढळून आले.

तणावांच्या कारणांवर

केले समुपदेशन !

मानसिकदृष्ट्या तणावग्रस्त आढळलेल्या शेतकऱ्यांच्या तणावाची कारणे, समस्या समजून घेतल्यानंतर समस्यांवर उपाय तसेच नकारात्मकतेची भावना कमी करून सकारात्मक विचार करण्यासाठी प्रेरणा प्रकल्पाच्या मानसोपचार तज्ज्ञांमार्फत संबंधित तणावग्रस्त शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून त्यांचे समुपदेशन करण्यात आले.

शेतकरी आत्महत्याग्रस्त

१२१ कुटुंबांचे गृहभेटीद्वारे समुपदेशन!

कोरोनाकाळात जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त १३७ शेतकरी कुटुंबांपैकी १२१ कुटुंबांच्या घरी भेटी देऊन शेतकरी आत्महत्याग्रस्त संबंधित कुटुंबातील व्यक्तींचे समुपदेशन करण्यात आले तसेच आवश्यक ते औषधोपचार देण्यात आले.

कोरोनाकाळात जुलै अखेरपर्यंत जिल्ह्यात २७२ शेतकरी मानसिकदृष्ट्या तणावग्रस्त असल्याचे आढळून आले. तणावग्रस्त आढळलेल्या संबंधित शेतकऱ्यांचे प्रेरणा प्रकल्पांतर्गत मानसोपचार तज्ज्ञांमार्फत समुपदेशन करण्यात आले. तसेच आवश्यक ते औषधोपचार करण्यात आले. यासोबतच शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील व्यक्तींचेही गृहभेटीद्वारे समुदपदेशन करण्यात आले.

डाॅ. हर्षल चांडक

मानसोपचार तज्ज्ञ तथा कार्यक्रम अधिकारी, प्रेरणा प्रकल्प, अकोला.