शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
2
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
3
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
4
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
5
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
6
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
7
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
8
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
9
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
10
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
11
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
12
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
13
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
14
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
15
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
16
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
17
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
18
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
19
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
20
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका

२१ कोटी परत जाण्याचा २७१९ लाभार्थींना फटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 00:49 IST

जिल्हा शेतकरी आत्महत्यांनी बेजार असताना,  त्या शेतकर्‍यांना सिंचन विहीर योजनेच्या माध्यमातून सबळ  करण्याची संधीही जिल्ह्याने गमावली आहे. जिल्ह्यातील  २७१५ शेतकर्‍यांच्या विहिरीचे २१ कोटी २५ लाख रुपये  शासनाकडे परत गेले. या प्रकाराची जिल्हा परिषदेचे  सत्ताधारी तर सोडाच प्रशासनानेही कोणतीच दखल घेतली  नाही. हा निधी परत जाण्यास कोण जबाबदार, त्याची कारणे  शोधण्याचाही साधा प्रयत्न झालेला नाही. त्यामुळे  विकासाच्या नावाने नुसती बोंबाबोंब सुरू असल्याचेच चित्र  दिसून येत आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषद प्रशासनाला ना खंत, ना दखल!रूपांतरानंतरच्या विहिरी अपूर्णनियोजनांचा बोजवारा

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हा शेतकरी आत्महत्यांनी बेजार असताना,  त्या शेतकर्‍यांना सिंचन विहीर योजनेच्या माध्यमातून सबळ  करण्याची संधीही जिल्ह्याने गमावली आहे. जिल्ह्यातील  २७१५ शेतकर्‍यांच्या विहिरीचे २१ कोटी २५ लाख रुपये  शासनाकडे परत गेले. या प्रकाराची जिल्हा परिषदेचे  सत्ताधारी तर सोडाच प्रशासनानेही कोणतीच दखल घेतली  नाही. हा निधी परत जाण्यास कोण जबाबदार, त्याची कारणे  शोधण्याचाही साधा प्रयत्न झालेला नाही. त्यामुळे  विकासाच्या नावाने नुसती बोंबाबोंब सुरू असल्याचेच चित्र  दिसून येत आहे. राज्य शासनाने जिल्हा परिषद, महापालिका, नगर  परिषदांमध्ये ३0 जून २0१७ रोजी शिल्लक असलेला  विकास कामांचा निधी परत घेतला आहे. अकोला जिल्हा  परिषदेतून विविध योजनांचे जवळपास ६९ कोटी रुपये परत  जात आहेत. त्यामध्ये सर्वाधिक निधी धडक सिंचन  विहिरींचा आहे. ती रक्कम २१ कोटी २५ लाख ६१२४१  एवढी आहे. त्यातून जिल्ह्यातील २७१५ लाभार्थींंच्या शेतात  विहिरींची निर्मिती झाली असती. कायम सिंचनाची सोय उ पलब्ध झाल्याने शेतकर्‍याला मोठा आधार मिळण्याची  आशा होती. मात्र, त्याचवेळी यंत्रणांची उदासीनता आणि शासनाच्या  धोरणाचा फटका जिल्ह्यातील लाभार्थी शेतकर्‍यांना बसला  आहे. विशेष म्हणजे, त्यातही अकोला, तेल्हारा तालुक्या तील २२३ विहिरींच्या लाभार्थीना कायमस्वरूपी वंचित  ठेवण्याचा प्रकारही घडला आहे. 

रूपांतरानंतरच्या विहिरी अपूर्णजिल्ह्यात एकूण मंजूर ७४७३ विहिरींपैकी ३२६९ विहिरी २३  जानेवारी २0१४ रोजी पूर्ण झाल्या. त्यानंतर उर्वरित विहिरींचा  लाभ नरेगा आणि सिंचन विहीर योजनेतून देण्यात आला.  धडकमध्ये ३१५ पैकी २७६ पूर्ण, तर नरेगामध्ये ११८८ पैकी  ८१७ पूर्ण झाल्या. सोबतच त्यानंतर पुनर्जीवित केलेल्या  ६६२ पैकी १६२ पूर्ण झाल्या. ही आकडेवारी पाहता मंजूर  विहिरींपैकी ४७५४ विहिरी पूर्ण झाल्याची माहिती आहे. त्या पैकी किती विहिरींतून सिंचन सुरू झाले, ही बाब वेगळी. 

निधी परत जाण्यामध्ये रद्द विहिरींचा समावेशशासनाकडे निधी परत जाण्यामध्ये रद्द झालेल्या विहिरींच्या  खर्चाची रक्कम आहे. त्यामध्ये १३९८ लाभार्थींनी अग्रिम घे तला नाही, कामही सुरू केले नाही, तर १३२१ लाभार्थींंनी  अग्रिम रक्कम घेतली मात्र, काम सुरू केले नाही. त्यांचा २१  कोटी २५ लाख रुपये निधी शासनजमा केला जात आहे. हा  निधी परत जाण्याबाबत जिल्हा परिषद प्रशासन,  सत्ताधार्‍यांनी अवाक्षरही काढले नाही, हे विशेष.