शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
2
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
3
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
4
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
5
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
6
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
7
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
8
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
9
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
10
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
11
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
12
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
13
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
14
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
15
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
16
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
17
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
18
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
19
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
20
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
Daily Top 2Weekly Top 5

२१ कोटी परत जाण्याचा २७१९ लाभार्थींना फटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 00:49 IST

जिल्हा शेतकरी आत्महत्यांनी बेजार असताना,  त्या शेतकर्‍यांना सिंचन विहीर योजनेच्या माध्यमातून सबळ  करण्याची संधीही जिल्ह्याने गमावली आहे. जिल्ह्यातील  २७१५ शेतकर्‍यांच्या विहिरीचे २१ कोटी २५ लाख रुपये  शासनाकडे परत गेले. या प्रकाराची जिल्हा परिषदेचे  सत्ताधारी तर सोडाच प्रशासनानेही कोणतीच दखल घेतली  नाही. हा निधी परत जाण्यास कोण जबाबदार, त्याची कारणे  शोधण्याचाही साधा प्रयत्न झालेला नाही. त्यामुळे  विकासाच्या नावाने नुसती बोंबाबोंब सुरू असल्याचेच चित्र  दिसून येत आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषद प्रशासनाला ना खंत, ना दखल!रूपांतरानंतरच्या विहिरी अपूर्णनियोजनांचा बोजवारा

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हा शेतकरी आत्महत्यांनी बेजार असताना,  त्या शेतकर्‍यांना सिंचन विहीर योजनेच्या माध्यमातून सबळ  करण्याची संधीही जिल्ह्याने गमावली आहे. जिल्ह्यातील  २७१५ शेतकर्‍यांच्या विहिरीचे २१ कोटी २५ लाख रुपये  शासनाकडे परत गेले. या प्रकाराची जिल्हा परिषदेचे  सत्ताधारी तर सोडाच प्रशासनानेही कोणतीच दखल घेतली  नाही. हा निधी परत जाण्यास कोण जबाबदार, त्याची कारणे  शोधण्याचाही साधा प्रयत्न झालेला नाही. त्यामुळे  विकासाच्या नावाने नुसती बोंबाबोंब सुरू असल्याचेच चित्र  दिसून येत आहे. राज्य शासनाने जिल्हा परिषद, महापालिका, नगर  परिषदांमध्ये ३0 जून २0१७ रोजी शिल्लक असलेला  विकास कामांचा निधी परत घेतला आहे. अकोला जिल्हा  परिषदेतून विविध योजनांचे जवळपास ६९ कोटी रुपये परत  जात आहेत. त्यामध्ये सर्वाधिक निधी धडक सिंचन  विहिरींचा आहे. ती रक्कम २१ कोटी २५ लाख ६१२४१  एवढी आहे. त्यातून जिल्ह्यातील २७१५ लाभार्थींंच्या शेतात  विहिरींची निर्मिती झाली असती. कायम सिंचनाची सोय उ पलब्ध झाल्याने शेतकर्‍याला मोठा आधार मिळण्याची  आशा होती. मात्र, त्याचवेळी यंत्रणांची उदासीनता आणि शासनाच्या  धोरणाचा फटका जिल्ह्यातील लाभार्थी शेतकर्‍यांना बसला  आहे. विशेष म्हणजे, त्यातही अकोला, तेल्हारा तालुक्या तील २२३ विहिरींच्या लाभार्थीना कायमस्वरूपी वंचित  ठेवण्याचा प्रकारही घडला आहे. 

रूपांतरानंतरच्या विहिरी अपूर्णजिल्ह्यात एकूण मंजूर ७४७३ विहिरींपैकी ३२६९ विहिरी २३  जानेवारी २0१४ रोजी पूर्ण झाल्या. त्यानंतर उर्वरित विहिरींचा  लाभ नरेगा आणि सिंचन विहीर योजनेतून देण्यात आला.  धडकमध्ये ३१५ पैकी २७६ पूर्ण, तर नरेगामध्ये ११८८ पैकी  ८१७ पूर्ण झाल्या. सोबतच त्यानंतर पुनर्जीवित केलेल्या  ६६२ पैकी १६२ पूर्ण झाल्या. ही आकडेवारी पाहता मंजूर  विहिरींपैकी ४७५४ विहिरी पूर्ण झाल्याची माहिती आहे. त्या पैकी किती विहिरींतून सिंचन सुरू झाले, ही बाब वेगळी. 

निधी परत जाण्यामध्ये रद्द विहिरींचा समावेशशासनाकडे निधी परत जाण्यामध्ये रद्द झालेल्या विहिरींच्या  खर्चाची रक्कम आहे. त्यामध्ये १३९८ लाभार्थींनी अग्रिम घे तला नाही, कामही सुरू केले नाही, तर १३२१ लाभार्थींंनी  अग्रिम रक्कम घेतली मात्र, काम सुरू केले नाही. त्यांचा २१  कोटी २५ लाख रुपये निधी शासनजमा केला जात आहे. हा  निधी परत जाण्याबाबत जिल्हा परिषद प्रशासन,  सत्ताधार्‍यांनी अवाक्षरही काढले नाही, हे विशेष.