शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

२१ कोटी परत जाण्याचा २७१९ लाभार्थींना फटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 00:49 IST

जिल्हा शेतकरी आत्महत्यांनी बेजार असताना,  त्या शेतकर्‍यांना सिंचन विहीर योजनेच्या माध्यमातून सबळ  करण्याची संधीही जिल्ह्याने गमावली आहे. जिल्ह्यातील  २७१५ शेतकर्‍यांच्या विहिरीचे २१ कोटी २५ लाख रुपये  शासनाकडे परत गेले. या प्रकाराची जिल्हा परिषदेचे  सत्ताधारी तर सोडाच प्रशासनानेही कोणतीच दखल घेतली  नाही. हा निधी परत जाण्यास कोण जबाबदार, त्याची कारणे  शोधण्याचाही साधा प्रयत्न झालेला नाही. त्यामुळे  विकासाच्या नावाने नुसती बोंबाबोंब सुरू असल्याचेच चित्र  दिसून येत आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषद प्रशासनाला ना खंत, ना दखल!रूपांतरानंतरच्या विहिरी अपूर्णनियोजनांचा बोजवारा

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हा शेतकरी आत्महत्यांनी बेजार असताना,  त्या शेतकर्‍यांना सिंचन विहीर योजनेच्या माध्यमातून सबळ  करण्याची संधीही जिल्ह्याने गमावली आहे. जिल्ह्यातील  २७१५ शेतकर्‍यांच्या विहिरीचे २१ कोटी २५ लाख रुपये  शासनाकडे परत गेले. या प्रकाराची जिल्हा परिषदेचे  सत्ताधारी तर सोडाच प्रशासनानेही कोणतीच दखल घेतली  नाही. हा निधी परत जाण्यास कोण जबाबदार, त्याची कारणे  शोधण्याचाही साधा प्रयत्न झालेला नाही. त्यामुळे  विकासाच्या नावाने नुसती बोंबाबोंब सुरू असल्याचेच चित्र  दिसून येत आहे. राज्य शासनाने जिल्हा परिषद, महापालिका, नगर  परिषदांमध्ये ३0 जून २0१७ रोजी शिल्लक असलेला  विकास कामांचा निधी परत घेतला आहे. अकोला जिल्हा  परिषदेतून विविध योजनांचे जवळपास ६९ कोटी रुपये परत  जात आहेत. त्यामध्ये सर्वाधिक निधी धडक सिंचन  विहिरींचा आहे. ती रक्कम २१ कोटी २५ लाख ६१२४१  एवढी आहे. त्यातून जिल्ह्यातील २७१५ लाभार्थींंच्या शेतात  विहिरींची निर्मिती झाली असती. कायम सिंचनाची सोय उ पलब्ध झाल्याने शेतकर्‍याला मोठा आधार मिळण्याची  आशा होती. मात्र, त्याचवेळी यंत्रणांची उदासीनता आणि शासनाच्या  धोरणाचा फटका जिल्ह्यातील लाभार्थी शेतकर्‍यांना बसला  आहे. विशेष म्हणजे, त्यातही अकोला, तेल्हारा तालुक्या तील २२३ विहिरींच्या लाभार्थीना कायमस्वरूपी वंचित  ठेवण्याचा प्रकारही घडला आहे. 

रूपांतरानंतरच्या विहिरी अपूर्णजिल्ह्यात एकूण मंजूर ७४७३ विहिरींपैकी ३२६९ विहिरी २३  जानेवारी २0१४ रोजी पूर्ण झाल्या. त्यानंतर उर्वरित विहिरींचा  लाभ नरेगा आणि सिंचन विहीर योजनेतून देण्यात आला.  धडकमध्ये ३१५ पैकी २७६ पूर्ण, तर नरेगामध्ये ११८८ पैकी  ८१७ पूर्ण झाल्या. सोबतच त्यानंतर पुनर्जीवित केलेल्या  ६६२ पैकी १६२ पूर्ण झाल्या. ही आकडेवारी पाहता मंजूर  विहिरींपैकी ४७५४ विहिरी पूर्ण झाल्याची माहिती आहे. त्या पैकी किती विहिरींतून सिंचन सुरू झाले, ही बाब वेगळी. 

निधी परत जाण्यामध्ये रद्द विहिरींचा समावेशशासनाकडे निधी परत जाण्यामध्ये रद्द झालेल्या विहिरींच्या  खर्चाची रक्कम आहे. त्यामध्ये १३९८ लाभार्थींनी अग्रिम घे तला नाही, कामही सुरू केले नाही, तर १३२१ लाभार्थींंनी  अग्रिम रक्कम घेतली मात्र, काम सुरू केले नाही. त्यांचा २१  कोटी २५ लाख रुपये निधी शासनजमा केला जात आहे. हा  निधी परत जाण्याबाबत जिल्हा परिषद प्रशासन,  सत्ताधार्‍यांनी अवाक्षरही काढले नाही, हे विशेष.