शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

२१ कोटी परत जाण्याचा २७१९ लाभार्थींना फटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 00:49 IST

जिल्हा शेतकरी आत्महत्यांनी बेजार असताना,  त्या शेतकर्‍यांना सिंचन विहीर योजनेच्या माध्यमातून सबळ  करण्याची संधीही जिल्ह्याने गमावली आहे. जिल्ह्यातील  २७१५ शेतकर्‍यांच्या विहिरीचे २१ कोटी २५ लाख रुपये  शासनाकडे परत गेले. या प्रकाराची जिल्हा परिषदेचे  सत्ताधारी तर सोडाच प्रशासनानेही कोणतीच दखल घेतली  नाही. हा निधी परत जाण्यास कोण जबाबदार, त्याची कारणे  शोधण्याचाही साधा प्रयत्न झालेला नाही. त्यामुळे  विकासाच्या नावाने नुसती बोंबाबोंब सुरू असल्याचेच चित्र  दिसून येत आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषद प्रशासनाला ना खंत, ना दखल!रूपांतरानंतरच्या विहिरी अपूर्णनियोजनांचा बोजवारा

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हा शेतकरी आत्महत्यांनी बेजार असताना,  त्या शेतकर्‍यांना सिंचन विहीर योजनेच्या माध्यमातून सबळ  करण्याची संधीही जिल्ह्याने गमावली आहे. जिल्ह्यातील  २७१५ शेतकर्‍यांच्या विहिरीचे २१ कोटी २५ लाख रुपये  शासनाकडे परत गेले. या प्रकाराची जिल्हा परिषदेचे  सत्ताधारी तर सोडाच प्रशासनानेही कोणतीच दखल घेतली  नाही. हा निधी परत जाण्यास कोण जबाबदार, त्याची कारणे  शोधण्याचाही साधा प्रयत्न झालेला नाही. त्यामुळे  विकासाच्या नावाने नुसती बोंबाबोंब सुरू असल्याचेच चित्र  दिसून येत आहे. राज्य शासनाने जिल्हा परिषद, महापालिका, नगर  परिषदांमध्ये ३0 जून २0१७ रोजी शिल्लक असलेला  विकास कामांचा निधी परत घेतला आहे. अकोला जिल्हा  परिषदेतून विविध योजनांचे जवळपास ६९ कोटी रुपये परत  जात आहेत. त्यामध्ये सर्वाधिक निधी धडक सिंचन  विहिरींचा आहे. ती रक्कम २१ कोटी २५ लाख ६१२४१  एवढी आहे. त्यातून जिल्ह्यातील २७१५ लाभार्थींंच्या शेतात  विहिरींची निर्मिती झाली असती. कायम सिंचनाची सोय उ पलब्ध झाल्याने शेतकर्‍याला मोठा आधार मिळण्याची  आशा होती. मात्र, त्याचवेळी यंत्रणांची उदासीनता आणि शासनाच्या  धोरणाचा फटका जिल्ह्यातील लाभार्थी शेतकर्‍यांना बसला  आहे. विशेष म्हणजे, त्यातही अकोला, तेल्हारा तालुक्या तील २२३ विहिरींच्या लाभार्थीना कायमस्वरूपी वंचित  ठेवण्याचा प्रकारही घडला आहे. 

रूपांतरानंतरच्या विहिरी अपूर्णजिल्ह्यात एकूण मंजूर ७४७३ विहिरींपैकी ३२६९ विहिरी २३  जानेवारी २0१४ रोजी पूर्ण झाल्या. त्यानंतर उर्वरित विहिरींचा  लाभ नरेगा आणि सिंचन विहीर योजनेतून देण्यात आला.  धडकमध्ये ३१५ पैकी २७६ पूर्ण, तर नरेगामध्ये ११८८ पैकी  ८१७ पूर्ण झाल्या. सोबतच त्यानंतर पुनर्जीवित केलेल्या  ६६२ पैकी १६२ पूर्ण झाल्या. ही आकडेवारी पाहता मंजूर  विहिरींपैकी ४७५४ विहिरी पूर्ण झाल्याची माहिती आहे. त्या पैकी किती विहिरींतून सिंचन सुरू झाले, ही बाब वेगळी. 

निधी परत जाण्यामध्ये रद्द विहिरींचा समावेशशासनाकडे निधी परत जाण्यामध्ये रद्द झालेल्या विहिरींच्या  खर्चाची रक्कम आहे. त्यामध्ये १३९८ लाभार्थींनी अग्रिम घे तला नाही, कामही सुरू केले नाही, तर १३२१ लाभार्थींंनी  अग्रिम रक्कम घेतली मात्र, काम सुरू केले नाही. त्यांचा २१  कोटी २५ लाख रुपये निधी शासनजमा केला जात आहे. हा  निधी परत जाण्याबाबत जिल्हा परिषद प्रशासन,  सत्ताधार्‍यांनी अवाक्षरही काढले नाही, हे विशेष.