शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

आयटीआयच्या जागा २,७०० अन् अर्ज ८ हजारांवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:23 IST

अकोला : काही दिवसांपूर्वी परीक्षेविना प्रथमच इयत्ता दहावी व बारावीचा निकाल लागला. कोरोनामुळे बोर्डाने सरसकट विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केले. त्यामुळे ...

अकोला : काही दिवसांपूर्वी परीक्षेविना प्रथमच इयत्ता दहावी व बारावीचा निकाल लागला. कोरोनामुळे बोर्डाने सरसकट विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केले. त्यामुळे यंदा निकालही ९८ टक्क्यांवर लागला आहे. उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या भरमसाठ झाली असल्याने, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांकडे (आयटीआय) विद्यार्थ्यांचा कल प्रचंड वाढलेला दिसून येत आहे. अकोला जिल्ह्यात आयटीआयच्या २,७९६ जागा आहेत. परंतु त्यासाठी ८ हजारांवर विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. आता प्रवेशासाठी चांगलीच रस्सीखेच सुरू आहे. एकेकाळी आयटीआयचे महत्व कमी झाले होते. औद्योगिक प्रशिक्षण संस्था ओस पडल्या होत्या. परंतु अलिकडच्या तीन-चार वर्षांमध्ये आयटीआयला पुन्हा सुगीचे दिवस आले आहेत. मुंबई, पुणे, ठाणे, नागपूरसारख्या मेट्रो सिटीमध्ये औद्योगिक क्षेत्रात आयटीआय प्रशिक्षित विद्यार्थ्यांची मागणी वाढली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा आता या औद्योगिक शिक्षणाकडे कल वाढत चालला आहे. आयटीआयची ऑनलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. अकोला जिल्ह्यात आयटीआयच्या शासकीय ८ आणि खासगी २ संस्था आहेत. या १० संस्थांमध्ये एकूण २,७९६ जागा आहेत. या जागांसाठी जिल्हाभरातून ८ हजार २७३ अर्ज केले आहेत. जागा कमी अन् उमेदवार जास्त झाल्यामुळे आयटीआय प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये चांगलीच चढाओढ होत आहे.

विद्यार्थ्यांनी केलेले प्रवेश अर्ज असे

अकोला- २,६२९

अकोट- १,१९७

बाळापूर- ९८५

बार्शीटाकळी- ७१४

मूर्तिजापूर- १,११३

पातूर- ६७४

तेल्हारा- ९६१

एकूण जागा- २,७९६

एकूण अर्ज- ८,२७३

शासकीय संस्था- ८- २६१६

खासगी संस्था-२- १८०

आयटीआयमध्ये असलेले रोजगाराभिमुख अभ्यासक्रम पाहता, विद्यार्थी व विद्यार्थिनींचा आयटीआयकडे कल वाढत आहे. त्यामुळेच यंदा हजारो विद्यार्थ्यांनी आयटीआयटी प्रवेशासाठी अर्ज केले आहेत. गुणवत्तेनुसारच विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केलेला विद्यार्थी व्यवसाय, नोकरीकडे वळू शकतो. त्यामुळेच आयटीआयला पसंती मिळत आहे.

-आर. टी. मुळे, प्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची)