शहरं
Join us  
Trending Stories
1
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
2
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
3
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
4
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
5
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
6
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
7
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
8
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
9
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
10
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
11
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
12
Mallikarjun Kharge : "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
13
'कुणबी प्रमाणपत्र,व्हॅलिडिटीचा प्रश्न सोडवा'; धाराशिवमध्ये सरनाईकांना मराठा तरुणांचा घेराव!
14
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
15
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...
16
“दिवस निवड, वेळ अन् जागा तुझी, कुठे येऊ ते फक्त सांग”; मनसे नेत्यांचे निशिकांत दुबेंना आव्हान
17
२ सख्ख्या भावांनी एकाच मुलीसोबत केले लग्न, कारण...; अजब लग्नाची ही गजब गोष्ट काय आहे?
18
बजाजची साथ सोडून अंबांनींसोबत आली ही दिग्गज जर्मन विमा कंपनी, लाखो कोटींच्या व्यवसायावर नजर
19
“विधानभवनातील मारामारीला CM फडणवीसच जबाबदार, हनीट्रॅपचे धागेदारे...”: हर्षवर्धन सपकाळ
20
IND vs ENG: आमची बरोबरी करायची असेल तर तुमची खरी ताकद दाखवा; इंग्लंडच्या दिग्गजाचा टीम इंडियाला सल्ला

२७ कोटींच्या रस्त्याचे काम तीन वर्षांपासून पूर्ण होईना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:19 IST

मुर्तिजापूर : शहरात सर्वात महत्त्वाचा वाहतुकीचा एकमेव मार्ग म्हणजे शिवाजी चौक ते जुन्या वस्तीकडे जाणारा महाराजा चौक आहे. मूर्तिजापूर ...

मुर्तिजापूर : शहरात सर्वात महत्त्वाचा वाहतुकीचा एकमेव मार्ग म्हणजे शिवाजी चौक ते जुन्या वस्तीकडे जाणारा महाराजा चौक आहे. मूर्तिजापूर शहराला जोडणारा हा मार्ग आहे. भाजप-शिवसेना युतीच्या काळात या मुख्य रस्ता निर्मितीस मंजुरी मिळाली. या मार्गाचे अंदाजपत्रक तयार करून २०१८ मध्ये या मुख्य मार्गाचे स्थानिक आमदारांच्या हस्ते भूमिपूजन व उद्घाटन करण्यात आले. परंतु तीन वर्षांमध्ये रस्त्याचे काम पूर्ण होऊ शकले नाही. रस्त्या निर्मितीचा कालावधीही संपला असून, नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

गत तीन वर्षांपासून रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. बांधकामाला कालमर्यादा आहे की नाही हे समजायला मार्ग नाही. भूमिपूजन झाल्यानंतर या बांधकामाचे अंदाजपत्रक, कालावधी किती आहे आणि किती वर्षे देखभाल दुरुस्ती करणार व कोणत्या कंपनीकडे कंत्राट आहे, याचा फलक लावलेला नाही. बांधकाम सुरू झाले. रस्त्याची एक बाजू खोदून गिट्टीने भरण्यात आली. खोदलेल्या रस्त्याच्या कामात गिट्टी, मुरूम टाकण्यात आला. पहिला थर, दुसरा थर आणि तिसरा थर टाकण्यात आले. काँक्रीटच्या पहिल्या थरापासूनच निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आले. पाण्याचा वापर नाही. बांधकामाचा कालावधी एक किंवा दोन वर्षाचा होत नाही, तोच रस्ता उखडायला लागला आहे. रस्त्यातील सिमेंटमधून गिट्टी उखडून बाहेर येत आहे. रस्त्यावर लोखंडी बॅरिकेडस लावून त्यावर बॅनर लावलेले आहेत. २७ कोटी रुपयांच्या रस्त्याचे बांधकाम कधी पूर्ण होणार, असा प्रश्न आता नागरिक उपस्थित करीत आहेत.

फोटो: मेल फोटोत

नगरपरिषदेने रस्ता मोकळा करून दिला नाही!

सार्वजनिक बांधकाम विभागाचा शाखा अभियंता म्हणतो, नगरपरिषदेने आम्हाला रस्ता मोकळा करून दिला नाही व नगरपालिका म्हणते हे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाचे आहे. त्यांनीच बांधकामात घाई केली. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. रस्त्याचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी अजून किती कालावधी लागतो, हे कोणी सांगायला तयार नाही. या रस्त्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. तसेच स्थानिक आमदार सुद्धा शहर विकासाबाबत गंभीर दिसत नाहीत. त्यामुळे कुठेतरी पाणी मुरत असल्याची चर्चा आहे. मात्र याची दखल घेण्यास कोणी तयार नाही. खूप मोठा मलिदा या बांधकामातून सर्वांनाच खायला मिळाला असल्याची चर्चा सुरू आहे मात्र वरिष्ठ स्तरावरून या रस्त्याच्या बांधकामाची चौकशी करून त्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याला न्याय द्यावा व भष्टाचारमुक्त रस्ता असे नाव त्याला द्यावे, अशी मूर्तिजापूर तालूक्यातील जनमानसात चर्चा सुरू आहे.