शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
6
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
7
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
8
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
9
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
10
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
11
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
12
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
13
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
14
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
15
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
16
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
17
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
18
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
19
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
20
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?

२७ कोटींच्या रस्त्याचे काम तीन वर्षांपासून पूर्ण होईना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:19 IST

मुर्तिजापूर : शहरात सर्वात महत्त्वाचा वाहतुकीचा एकमेव मार्ग म्हणजे शिवाजी चौक ते जुन्या वस्तीकडे जाणारा महाराजा चौक आहे. मूर्तिजापूर ...

मुर्तिजापूर : शहरात सर्वात महत्त्वाचा वाहतुकीचा एकमेव मार्ग म्हणजे शिवाजी चौक ते जुन्या वस्तीकडे जाणारा महाराजा चौक आहे. मूर्तिजापूर शहराला जोडणारा हा मार्ग आहे. भाजप-शिवसेना युतीच्या काळात या मुख्य रस्ता निर्मितीस मंजुरी मिळाली. या मार्गाचे अंदाजपत्रक तयार करून २०१८ मध्ये या मुख्य मार्गाचे स्थानिक आमदारांच्या हस्ते भूमिपूजन व उद्घाटन करण्यात आले. परंतु तीन वर्षांमध्ये रस्त्याचे काम पूर्ण होऊ शकले नाही. रस्त्या निर्मितीचा कालावधीही संपला असून, नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

गत तीन वर्षांपासून रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. बांधकामाला कालमर्यादा आहे की नाही हे समजायला मार्ग नाही. भूमिपूजन झाल्यानंतर या बांधकामाचे अंदाजपत्रक, कालावधी किती आहे आणि किती वर्षे देखभाल दुरुस्ती करणार व कोणत्या कंपनीकडे कंत्राट आहे, याचा फलक लावलेला नाही. बांधकाम सुरू झाले. रस्त्याची एक बाजू खोदून गिट्टीने भरण्यात आली. खोदलेल्या रस्त्याच्या कामात गिट्टी, मुरूम टाकण्यात आला. पहिला थर, दुसरा थर आणि तिसरा थर टाकण्यात आले. काँक्रीटच्या पहिल्या थरापासूनच निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आले. पाण्याचा वापर नाही. बांधकामाचा कालावधी एक किंवा दोन वर्षाचा होत नाही, तोच रस्ता उखडायला लागला आहे. रस्त्यातील सिमेंटमधून गिट्टी उखडून बाहेर येत आहे. रस्त्यावर लोखंडी बॅरिकेडस लावून त्यावर बॅनर लावलेले आहेत. २७ कोटी रुपयांच्या रस्त्याचे बांधकाम कधी पूर्ण होणार, असा प्रश्न आता नागरिक उपस्थित करीत आहेत.

फोटो: मेल फोटोत

नगरपरिषदेने रस्ता मोकळा करून दिला नाही!

सार्वजनिक बांधकाम विभागाचा शाखा अभियंता म्हणतो, नगरपरिषदेने आम्हाला रस्ता मोकळा करून दिला नाही व नगरपालिका म्हणते हे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाचे आहे. त्यांनीच बांधकामात घाई केली. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. रस्त्याचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी अजून किती कालावधी लागतो, हे कोणी सांगायला तयार नाही. या रस्त्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. तसेच स्थानिक आमदार सुद्धा शहर विकासाबाबत गंभीर दिसत नाहीत. त्यामुळे कुठेतरी पाणी मुरत असल्याची चर्चा आहे. मात्र याची दखल घेण्यास कोणी तयार नाही. खूप मोठा मलिदा या बांधकामातून सर्वांनाच खायला मिळाला असल्याची चर्चा सुरू आहे मात्र वरिष्ठ स्तरावरून या रस्त्याच्या बांधकामाची चौकशी करून त्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याला न्याय द्यावा व भष्टाचारमुक्त रस्ता असे नाव त्याला द्यावे, अशी मूर्तिजापूर तालूक्यातील जनमानसात चर्चा सुरू आहे.