शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

२४ हजार ७0१ विद्यार्थी देणार बारावीची परीक्षा!

By admin | Updated: February 17, 2016 02:22 IST

कॉपीबहाद्दरांवर ‘वॉच’ ठेवण्यासाठी सहा भरारी पथके.

अकोला: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता बारावीची परीक्षा १८ फेब्रुवारीपासून प्रारंभ होत आहे. बारावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यात २४ हजार ७0१ विद्यार्थी प्रविष्ट होणार आहेत. परीक्षेदरम्यान कॉपीबहाद्दरांवर लक्ष ठेवण्यासाठी शिक्षण विभागाने सहा भरारी पथके नियुक्त केली आहेत. सोबतच चित्रिकरणसुद्धा पथक करणार आहे. इयत्ता बारावीची परीक्षा १८ फेब्रुवारीपासून प्रारंभ होत आहे. परीक्षेचे संपूर्ण नियोजन शिक्षण विभागाने केले आहे. बारावीच्या परीक्षेसाठी ७१ परीक्षा केंद्रे राहणार असून, या परीक्षा केंद्रांवर २४ हजार ७0१ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. १८ फेब्रुवारी ते २८ मार्च दरम्यान होणार्‍या परीक्षेसाठी शिक्षण विभागाने परीक्षा केंद्रे नेमली आहेत तसेच परीक्षा उपकेंद्रेही देण्यात आली आहेत. परीक्षेदरम्यान कॉपीबहाद्दारांवर नियंत्रण ठेवण्याचे आव्हान शिक्षण विभागाने नियुक्त केलेल्या भरारी पथकापुढे राहणार आहे. शिक्षण विभागाने परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिसंवेदनशील, संवेदनशील परीक्षा केंद्रांची यादी तयार केली असून, या केंद्रांवर अधिक लक्ष देण्यात येणार आहेत. कॉपीमुक्त परीक्षा घेण्याचे शिक्षण विभागाचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद, उपशिक्षणाधिकारी, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली सहा भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. १८ फेब्रुवारी रोजी इंग्रजी व २६ फेब्रुवारी रोजी गणित विषयाच्या पेपरवर कडक निगराणी करण्यात येणार आहे. परीक्षेदरम्यान परीक्षा केंद्र परिसरातील झेरॉक्स सेंटर बंद ठेवण्यात येणार आहेत. याशिवाय पालक व इतरांना शाळा परिसरात फिरण्यास बंदी घालण्यात येणार आहे.