शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

२४ हजार ७0१ विद्यार्थी देणार बारावीची परीक्षा!

By admin | Updated: February 17, 2016 02:22 IST

कॉपीबहाद्दरांवर ‘वॉच’ ठेवण्यासाठी सहा भरारी पथके.

अकोला: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता बारावीची परीक्षा १८ फेब्रुवारीपासून प्रारंभ होत आहे. बारावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यात २४ हजार ७0१ विद्यार्थी प्रविष्ट होणार आहेत. परीक्षेदरम्यान कॉपीबहाद्दरांवर लक्ष ठेवण्यासाठी शिक्षण विभागाने सहा भरारी पथके नियुक्त केली आहेत. सोबतच चित्रिकरणसुद्धा पथक करणार आहे. इयत्ता बारावीची परीक्षा १८ फेब्रुवारीपासून प्रारंभ होत आहे. परीक्षेचे संपूर्ण नियोजन शिक्षण विभागाने केले आहे. बारावीच्या परीक्षेसाठी ७१ परीक्षा केंद्रे राहणार असून, या परीक्षा केंद्रांवर २४ हजार ७0१ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. १८ फेब्रुवारी ते २८ मार्च दरम्यान होणार्‍या परीक्षेसाठी शिक्षण विभागाने परीक्षा केंद्रे नेमली आहेत तसेच परीक्षा उपकेंद्रेही देण्यात आली आहेत. परीक्षेदरम्यान कॉपीबहाद्दारांवर नियंत्रण ठेवण्याचे आव्हान शिक्षण विभागाने नियुक्त केलेल्या भरारी पथकापुढे राहणार आहे. शिक्षण विभागाने परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिसंवेदनशील, संवेदनशील परीक्षा केंद्रांची यादी तयार केली असून, या केंद्रांवर अधिक लक्ष देण्यात येणार आहेत. कॉपीमुक्त परीक्षा घेण्याचे शिक्षण विभागाचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद, उपशिक्षणाधिकारी, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली सहा भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. १८ फेब्रुवारी रोजी इंग्रजी व २६ फेब्रुवारी रोजी गणित विषयाच्या पेपरवर कडक निगराणी करण्यात येणार आहे. परीक्षेदरम्यान परीक्षा केंद्र परिसरातील झेरॉक्स सेंटर बंद ठेवण्यात येणार आहेत. याशिवाय पालक व इतरांना शाळा परिसरात फिरण्यास बंदी घालण्यात येणार आहे.