शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मूर्तिजापूर तालुक्यातील २३ गावे अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2021 19:10 IST

23 villages in Murtijapur taluka in darkness : यासाठी १ कोटी ७ लाख ३७ हजार ४७० पथदिवे देयके बाकी आहे तर पाणी पुरवठ्याचे २३ लाख ५८ हजार ७३८ अशी थकबाकी आहे. 

-संजय उमक मूर्तिजापूर : महावितरण कडून ग्रामपंचायतीनां पथदिवे व स्थानिक पाणीपुरवठ्या वीज पुरवठा करण्यात येतो, याची देयके अद्याप पर्यंत अदा न केल्याने महावितरणने ग्रामपंचायतचा वीज तोडणी कार्यक्रम हातात घेतला आहे. या मोहिमेंतर्गत सद्यस्थितीत तालुक्यात २३ गावे अनेक दिवसांपासून अंधारात आहेत.  तर १७ गावांचा पाणी पुरवठा खंडित झाला असल्याने नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.           एप्रिल महिन्यापासून महावितरणने वसूली अभियान जोरात सुरु केले, ग्रामपंचायती मार्फत गाव पातळीवर राबविण्यात येणाऱ्या नागरीकांच्या मुलभूत सोईची जबाबदारी ग्रामपंचायतवर असताना या मुलभूत गरजांकडे दुर्लक्ष होत असल्याची बाब समोर आली आहे. अशातच ग्रामपंचायतीनी पथदिवे व पाणी पुरवठा करणाऱ्या मोटपंपाचे वीज बिल भरणा न केल्याने तालुक्यातील २३ गावांवर अंधाराचे साम्राज्य ओढवल्या गेले आहे तर १७ गावांना कृत्रिम जल संकटाचा सामना करावा लागत आहे. यासाठी १ कोटी ७ लाख ३७ हजार ४७० पथदिवे देयके बाकी आहे तर पाणी पुरवठ्याचे २३ लाख ५८ हजार ७३८ अशी थकबाकी आहे.          सध्या राज्यात कोरोना परिस्थिती पाहता ग्रामीण भागात आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. आरोग्य यंत्रणा बीजेअभावी उपकरणांचा वापर करू शकत नाही. ग्रामीण भागात पथ दिव्यांची आणि पाणी पुरवठा प्रकल्प योजनेची विद्युत देयके अदा न केल्याने विकट परिस्थिती निर्माण झाली आहे. सद्य परिस्थिती पहाता पंधराव्या वित्त आयोगाच्या अबंधित अनुदानानुन पथ पिण्याची देयके आणि बंधित अनुदानातुन पाणी पुरवठा योजनांची विद्युत देयके अदा करण्यास २३ जून रोजी ग्राम विकास विभागाकडून तसे परीपत्रक काढून मान्यता दिली आहे. सर्व प्रथम पथ दिव्यांची विद्युत देयके आणि पाणी पुरवठा योजनांची विद्युत देयके अदा करून १५ व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या बंधित आणि अबंधित निधीतून इतर खर्च नंतरकरावा, ग्रामपंचायतीने लवकरात लवकर सौर उर्जेवर भर देऊन त्याचा वापर करण्यास प्राधान्य दयावे, व्यवस्थित लेखांकन होण्याच्या दृष्टीने व घटनात्मक दुरुस्तीच्या अनुषंगाने त्या त्याग्रामपंचायतीने १५ व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या अबंधित अनुदानातून (अनटाइड) पथदिव्यांची वीज देयके आणि बंधित अनुदानातून (टाइड) पाणी पुरवठा योजनांची वीजदेयके ग्रामपंचायत स्तरावरब अदा केली जाईल असेही परीपत्रकात म्हटले आहे.          फेब्रुवारी २०२१ पर्यंत ही वीज देयके शासना मार्फत अदा केली जाता असे परंतु आता ती देयके ग्रामपंचायतीच्या खांद्यावर देण्यात आली आहे. शासन हा भार उचलण्यास आता तयार नसल्याने त्या बिलाची रक्कम ग्रामपंचायतीने १५ व्या वित्त आयोगातून अदा करायची आहे.

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरmahavitaranमहावितरण