शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
4
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
5
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
6
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
7
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
8
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
9
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
10
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
11
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
12
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
13
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
14
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
15
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
16
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
17
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
18
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
19
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
20
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन

मूर्तिजापूर तालुक्यातील २३ गावे अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2021 19:10 IST

23 villages in Murtijapur taluka in darkness : यासाठी १ कोटी ७ लाख ३७ हजार ४७० पथदिवे देयके बाकी आहे तर पाणी पुरवठ्याचे २३ लाख ५८ हजार ७३८ अशी थकबाकी आहे. 

-संजय उमक मूर्तिजापूर : महावितरण कडून ग्रामपंचायतीनां पथदिवे व स्थानिक पाणीपुरवठ्या वीज पुरवठा करण्यात येतो, याची देयके अद्याप पर्यंत अदा न केल्याने महावितरणने ग्रामपंचायतचा वीज तोडणी कार्यक्रम हातात घेतला आहे. या मोहिमेंतर्गत सद्यस्थितीत तालुक्यात २३ गावे अनेक दिवसांपासून अंधारात आहेत.  तर १७ गावांचा पाणी पुरवठा खंडित झाला असल्याने नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.           एप्रिल महिन्यापासून महावितरणने वसूली अभियान जोरात सुरु केले, ग्रामपंचायती मार्फत गाव पातळीवर राबविण्यात येणाऱ्या नागरीकांच्या मुलभूत सोईची जबाबदारी ग्रामपंचायतवर असताना या मुलभूत गरजांकडे दुर्लक्ष होत असल्याची बाब समोर आली आहे. अशातच ग्रामपंचायतीनी पथदिवे व पाणी पुरवठा करणाऱ्या मोटपंपाचे वीज बिल भरणा न केल्याने तालुक्यातील २३ गावांवर अंधाराचे साम्राज्य ओढवल्या गेले आहे तर १७ गावांना कृत्रिम जल संकटाचा सामना करावा लागत आहे. यासाठी १ कोटी ७ लाख ३७ हजार ४७० पथदिवे देयके बाकी आहे तर पाणी पुरवठ्याचे २३ लाख ५८ हजार ७३८ अशी थकबाकी आहे.          सध्या राज्यात कोरोना परिस्थिती पाहता ग्रामीण भागात आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. आरोग्य यंत्रणा बीजेअभावी उपकरणांचा वापर करू शकत नाही. ग्रामीण भागात पथ दिव्यांची आणि पाणी पुरवठा प्रकल्प योजनेची विद्युत देयके अदा न केल्याने विकट परिस्थिती निर्माण झाली आहे. सद्य परिस्थिती पहाता पंधराव्या वित्त आयोगाच्या अबंधित अनुदानानुन पथ पिण्याची देयके आणि बंधित अनुदानातुन पाणी पुरवठा योजनांची विद्युत देयके अदा करण्यास २३ जून रोजी ग्राम विकास विभागाकडून तसे परीपत्रक काढून मान्यता दिली आहे. सर्व प्रथम पथ दिव्यांची विद्युत देयके आणि पाणी पुरवठा योजनांची विद्युत देयके अदा करून १५ व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या बंधित आणि अबंधित निधीतून इतर खर्च नंतरकरावा, ग्रामपंचायतीने लवकरात लवकर सौर उर्जेवर भर देऊन त्याचा वापर करण्यास प्राधान्य दयावे, व्यवस्थित लेखांकन होण्याच्या दृष्टीने व घटनात्मक दुरुस्तीच्या अनुषंगाने त्या त्याग्रामपंचायतीने १५ व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या अबंधित अनुदानातून (अनटाइड) पथदिव्यांची वीज देयके आणि बंधित अनुदानातून (टाइड) पाणी पुरवठा योजनांची वीजदेयके ग्रामपंचायत स्तरावरब अदा केली जाईल असेही परीपत्रकात म्हटले आहे.          फेब्रुवारी २०२१ पर्यंत ही वीज देयके शासना मार्फत अदा केली जाता असे परंतु आता ती देयके ग्रामपंचायतीच्या खांद्यावर देण्यात आली आहे. शासन हा भार उचलण्यास आता तयार नसल्याने त्या बिलाची रक्कम ग्रामपंचायतीने १५ व्या वित्त आयोगातून अदा करायची आहे.

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरmahavitaranमहावितरण