शहरं
Join us  
Trending Stories
1
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
2
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
3
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
4
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
5
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
6
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
7
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
8
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
9
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
10
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
11
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
12
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
13
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
14
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
15
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
16
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
17
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
18
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
19
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
20
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम

शिक्षण विभागासाठी २३ कोटींची तरतूद

By admin | Updated: April 27, 2017 01:15 IST

अकोला: महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेकडे कायमच दुर्लक्ष करणाऱ्या शिक्षण विभागासाठी मनपा प्रशासनाच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे.

मनपाच्या शाळात शिक्षणाची बोंबाबोंब; गुणवत्तेकडे दुर्लक्षअकोला: महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेकडे कायमच दुर्लक्ष करणाऱ्या शिक्षण विभागासाठी मनपा प्रशासनाच्या अर्थसंकल्पात २३ कोटी आठ लाखाची तरतूद करण्यात आली आहे. त्यामध्ये कार्यरत २८४ शिक्षक, सेवानिवृत्त शिक्षकांच्या वेतनासह शालेय पोषण आहार व इतर बाबींचा समावेश आहे. महापालिक ा शिक्षण विभागाच्या अनास्थेमुळे सर्वसामान्य व गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेकडे दुर्लक्ष होत आहे. शिक्षण विभागासोबतच गलेलठ्ठ वेतन घेणाऱ्या शिक्षकांचा उदासीनपणादेखील या बाबीला कारणीभूत आहे. त्याचा परिणाम म्हणून की काय, महापालिकेच्या शाळांना उपरती लागल्याचे दिसून येते. २०१४ मध्ये राजकीय पदाधिकाऱ्यांसमोर झुकत मनपाचे तत्कालीन आयुक्त सोमनाथ शेटे यांनी मनपा शाळांचे तर्कहिन समायोजन केले. अनेक शाळांमध्ये २० पेक्षा जास्त विद्यार्थी संख्या असणाऱ्या शाळांचेसुद्धा समायोजन करण्यात आले. ५७ शाळांपैकी चक्क २३ शाळांचे समायोजन केले. अर्थातच, मनपाच्या ३४ शाळांची स्थिती सुधारण्यासह विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढणार असल्याचा दावा करणारा शिक्षण विभाग आज रोजी तोंडघशी पडल्याचे दिसून येते. शाळांची झालेली दयनीय अवस्था, पडक्या आवारभिंती, गळके छप्पर, खेळण्यासाठी खुल्या मैदानाची कमतरता असे विदारक चित्र पहावयास मिळते. चिमुकल्या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यास सपशेल अपयशी ठरलेल्या शिक्षण विभागासाठी प्रशासनाने अर्थसंकल्पात २३ कोटी ८ लाखांची तरतूद केली आहे. ही प्रशासकीय बाब असली तरी ज्या विभागावर दरवर्षी कोट्यवधी रुपयांची तरतूद केली जाते, त्या विभागाकडून विद्यार्थ्यांचे भविष्य घडवले जात आहे का, असा सवाल उपस्थित होतो. शिक्षकांनो, आता तरी जागे व्हा!मनपाचे तत्कालीन आयुक्त सोमनाथ शेटे यांनी ५७ पैकी २३ शाळांचे समायोजन केल्यानंतर साहजिकच अतिरिक्त शिक्षकांची समस्या निर्माण झाली. शिक्षकांचा सेवा कालावधी लक्षात घेऊन अनेक शिक्षण सेवकांवर नगरपालिकांच्या ठिकाणी जाऊन सेवा बजावण्याची वेळ आली. ३४ शाळांमधील विद्यार्थ्यांची घसरलेली पटसंख्या ध्यानात घेता, सुज्ञ शिक्षकांनो, आता तरी जागे व्हा,असे म्हणण्याची वेळ आली आहे.