शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

नैसर्गिक आपत्तीने घेतले २१ बळी

By admin | Updated: October 3, 2015 02:34 IST

गत चार महिन्यात नैसर्गिक आपत्तीमुळे २१ जणांचा मृत्यू ; अकोला जिल्ह्यातील ९ तर बुलडाणा व वाशिम जिल्ह्यातील प्रत्येकी ६ व्यक्तींचा समावेश.

बुलडाणा : पश्‍चिम वर्‍हाडात १ जून ते २१ सप्टेंबर या चार महिन्यात झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे २१ जणांचा मृत्यू झाला असून, त्यात अकोला जिल्ह्यातील ९ तर बुलडाणा व वाशिम जिल्ह्यातील प्रत्येकी ६ व्यक्तींचा समावेश आहे. तर जनावरांची मृत्युमुखी पडण्याची संख्या जास्त असल्यामुळे शेतकर्‍यांना मोठय़ा प्रमाणात आर्थिक फटका बसला आहे. यावर्षी पावसाच्या अनियमिततेमुळे पश्‍चिम वर्‍हाडातील शेतकरी त्रस्त झाला आहे; मात्र जून महिन्याच्या सुरुवातीला व ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावली. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक नदी, नाले तुडुंब भरले. त्यामुळे अनेक ठिकाणची पाणीटंचाई दूर झाली; मात्र या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक शेतकर्‍यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. काही ठिकाणी शेतकर्‍यांना आपला जीव गमवावा लागला. या नैसर्गिक आपत्तीमुळे अकोला जिल्ह्यामधील ९, बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यातील प्रत्येक ६ व्यक्तींचा मृत्यू झाला. त्यात वीज पडून मरणार्‍यांची संख्या सर्वाधिक अकोला जिल्ह्यात असून, चार महिन्यांच्या कालावधीत ७ जणांचा मृत्यू झाला असून, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यातील २ व्यक्तींचा समावेश आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे पडझड झालेल्या घराची एकूण संख्या १३ असून, त्यात वाशिम ५, अकोला, ४, बुलडाणा ४ असा समावेश आहे. या घटनेत घरांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. तर अंशत: पडझड झालेल्या घरांचा आकडा यापेक्षा मोठा आहे.