शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
5
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
6
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
7
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
8
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
9
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
10
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
11
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
12
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
13
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
14
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
15
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
16
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
17
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
18
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
19
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
20
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला

महान धरणात २१ टक्के जलसाठा

By admin | Updated: July 20, 2014 01:59 IST

जलशुद्धीकरण केंद्रातून अकोला शहराला प्रतितास साडेचोवीस लाख लीटर्स पाणीपुरवठा.

महान: पावसाने मारलेली दडी, बाष्पीभवनाचा वेग व सातत्याने होत असलेला उपसा या कारणांमुळे महान येथील काटेपूर्णा प्रकल्पातील जलसाठा झपाट्याने घटत असून, आजरोजी या धरणात केवळ २१ टक्के उपयुक्त साठा शिल्लक आहे. दरम्यान, येथील दोन जलशुद्धीकरण केंद्रांमधून केवळ अकोला शहरासाठी प्रतितास साडेचोवीस लाख लीटर्स पाणीपुरवठा केला जात आहे. महान येथील जुन्या जलशुद्धीकरण केंद्रातील २५ एम. एल.डी. च्या ३ पंपांपैकी १, तर नव्या केंद्रातील ६५ एम. एल. डी. च्या ५ पंपांपैकी २ अशा एकूण तीन पंपांमधून अकोल्यासाठी प्रतितास साडेचोवीस लाख लीटर्स पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या धरणाची पातळी खालावल्याने गढूळ पाणी येत आहे. त्यामुळे जलशुद्धीकरण केंद्रात निर्जंतुकीकरण करण्यासाठी या पाण्यात क्लोरीन वायूची १५ ते २0 पी.पी.एम. घुसळण केली जात आहे. दमदार पावसाअभावी या वर्षी धरणाची पातळी वाढली नाही तर महानगर पालिकेला ११ वर्षांपूर्वीचा प्रयोग राबवावा लागणार आहे. अकरा वर्षांपूर्वी या धरणातील चार व्हॉल्व उघडे पडल्याने धरणातील खालून दुसर्‍या क्रमांकाचा व्हॉल्व उघडून दहा अश्‍वशक्तीच्या पाच पंपांनी उपसा करून शहराला पाणीपुरवठा केला होता. पावसाळा सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी उलटल्यानंतरही दमदार पाऊस न झाल्याने धरणाच्या पातळीत किंचीतही वाढ झालेली नाही. त्यामुळे अकोलेकरांना पाण्याचा वापर काटकसरीने करावा लागणार आहे. गतवर्षी २0 जुलै रोजी महान धरणाची पातळी ८0.८३ टक्क्यांच्या वर गेल्याने जलाशयाचे दोन वक्रद्वार १५ से.मी.ने उघडण्यात आले होते. गतवर्षीच्या तुलनेत आजरोजी या धरणातील पाणी पातळी तब्बल ६0 टक्के कमी आहे.