शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

२० हजार क्विंटल तुरीवर व्यापाऱ्यांचा डोळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2017 01:44 IST

नाफेडची तूर खरेदी बंद: हजारावर शेतकरी तूर विक्रीपासून वंचित

अकोला : शासनाने रविवारपासून नाफेडच्या शासकीय खरेदी केंद्रामार्फत तूर खरेदी बंद केल्यामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात २० हजार क्विंटल तूर मोजमापाच्या प्रतीक्षेत होती; परंतु या तुरीवर आता व्यापाऱ्यांचा डोळा आहे. मनमानी भावाने शेतकऱ्यांकडील तूर खरेदी करण्यास व्यापारी उत्सुक असल्याचे येथील चित्र आहे.गत दोन महिन्यांपासून अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीसह जिल्ह्यातील पाच केंद्रांवर शासकीय खरेदी केंद्रांवर हमीभावाने तूर खरेदी करण्यात येत होती; परंतु यातही शेकडो व्यापाऱ्यांनी घुसखोरी करून आपली तूर विकली. खासगी व्यापाऱ्यांच्या तुलनेत नाफेडच्या खरेदी केंद्रांवर तुरीला ५०५० रुपये भाव मिळत असल्याने, शेतकऱ्यांचा अधिक कल नाफेडकडे होता; परंतु नाफेडचे अधिकारी तूर खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांची गर्दी कशी कमी होईल, त्यांची कमी प्रमाणात तूर कशी येईल, यासाठी शेतकऱ्यांना त्रास देत होते. सुरुवातीला काही रात्री उशिरापर्यंत तुरीचे माप व्हायचे; परंतु पुढे नाफेडने ५ वाजेपर्यंतच तुरीचे माप करण्याची भूमिका स्वीकारली. कृषी उत्पन्न बाजार समितीकडून शेतकऱ्यांना टोकन दिले जात होते; परंतु नाफेडकडून दररोज २० ते २५ शेतकऱ्यांचीच तूर खरेदी केली जात होती. शेतकऱ्यांना वेठीस धरण्यासाठी नाफेडचे अधिकारी सातत्याने प्रयत्न करीत होते. एवढेच नाही, तर अधिकाऱ्यांकडून नाफेडच्या केंद्रावर शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी आणूच नये, असेही प्रयत्न केल्या जात होते. रविवारपासून नाफेडने तूर खरेदी बंद केल्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठी चिंता निर्माण झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बाजार समिती आवारात ट्रॅक्टरात पडून असलेली तूर आता कोठे विकावी, खासगी व्यापाऱ्याला तूर विकायचे म्हटले तर व्यापारी मातीमोल भावाने तुरीची खरेदी करेल. नाफेडची तूर खरेदी बंद झाल्याने आता व्यापारी शेतकऱ्यांच्या तुरीवर डोळा ठेवून आहेत. दरम्यान याबाबत नाफेडच्या अधिकाऱ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.शेतकऱ्यांची हाती धुपाटणे...शेकडो शेतकऱ्यांची तूर ट्रॅक्टर, मालवाहू वाहनामध्ये बाजार समितीच्या आवारात पडून आहेत. आज ना उद्या तुरीचे माप होईल, अशी शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती. त्यामुळे शेतकरी पाचशे रुपये रोजाप्रमाणे भाड्याने ट्रॅक्टर व मालवाहू वाहनामध्ये तूर विक्रीसाठी घेऊन आले; परंतु आता अचानक नाफेडने तूर खरेदी बंद केल्याने, शेतकऱ्यांना वाहनांच्या भाड्याचा भुर्दंड सहन करावा ला गेल आणि व्यापारी मागेल त्या भावाने तूर विकावी लागेल.