शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

व-हाडात २0 हजार हेक्टरवर पीकांचे नुकसान !

By admin | Updated: March 5, 2016 02:30 IST

गारपीट,अवकाळी पावसाचा फटका.

अकोला : सलग तीन दिवस झालेल्या गारपीटीसह अवकाळी पावसाने वर्‍हाडातील पाच जिल्हयातील रब्बी पिकासंह भाजीपाला व फळ पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. महसूल व कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार या भागातील २0 हजार ४0४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांना झळ बसली आहे. पावसाच्या अनिश्‍चिततेमुळे गत वर्षी खरीप पिकाचे मोठे नुकसान झाले. त्याचा परिणाम रब्बी पिकांच्या पेरणीवर झाला. जमिनीत ओलावा नसल्याने सोयाबीनच्या खाली क्षेत्रावर शेतकर्‍यांना रब्बी पिके घेता आली नाही. कोरडवाहू शेतकर्‍यांसह संरक्षित सिंचनाची सोय असलेल्या शेतकर्‍यांनीही गहू,हरबरा आदी पिकांची पेरणी केली; पंरतु तीन दिवस वादळी वार्‍यासह आलेल्या अवकाळी पावसाने मुख्यत्वे गहू,हरबरा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणचा आंबा मोहोर झडला आहे. भाजीपाल्याचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. कांदा पिकावर सर्वाधिक परिणाम झाला असून, इतरही सर्वच भाजीपाला पिकाच्या गुणवत्तेवर परिणाम झाला आहे. सध्या अनेक भागात शेतकर्‍यांनी हरबरा काढणीला सुरू वात केली आहे. अनेक शेतात गंजी लावलेल्या दिसत आहे; पंरतु अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांची तारांबळ उडाली असून, गंजी झाकण्यासाठी शेतकर्‍यांची धावपळ सुरू आहे. दरम्यान, प्रशासकीय यंत्रणेने प्रत्येक भागात जावून पिकांची पाहणी केली. या पाहणीत रब्बी पिकांसह फळ, भाजीपाला पिकांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. प्राथमिक अंदाजानुसार यवतमाळ जिल्हयातील ८ हजार १९५ हेक्टरपेक्षा अधिक पिकांचे नुकसान झाले आहे. बुलडाणा जिल्हयात १ हजार ८५0 हेक्टरच्यावर,वाशिम १,१२0 हेक्टरवर, अकोला २११ हेक्टर तर अमरावती जिल्हयातील ९ हजार २८ हेक्टर क्षेत्रावरील रब्बी पिके, फळे,भाजीपाला पिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.