शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

व-हाडात २0 हजार हेक्टरवर पीकांचे नुकसान !

By admin | Updated: March 5, 2016 02:30 IST

गारपीट,अवकाळी पावसाचा फटका.

अकोला : सलग तीन दिवस झालेल्या गारपीटीसह अवकाळी पावसाने वर्‍हाडातील पाच जिल्हयातील रब्बी पिकासंह भाजीपाला व फळ पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. महसूल व कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार या भागातील २0 हजार ४0४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांना झळ बसली आहे. पावसाच्या अनिश्‍चिततेमुळे गत वर्षी खरीप पिकाचे मोठे नुकसान झाले. त्याचा परिणाम रब्बी पिकांच्या पेरणीवर झाला. जमिनीत ओलावा नसल्याने सोयाबीनच्या खाली क्षेत्रावर शेतकर्‍यांना रब्बी पिके घेता आली नाही. कोरडवाहू शेतकर्‍यांसह संरक्षित सिंचनाची सोय असलेल्या शेतकर्‍यांनीही गहू,हरबरा आदी पिकांची पेरणी केली; पंरतु तीन दिवस वादळी वार्‍यासह आलेल्या अवकाळी पावसाने मुख्यत्वे गहू,हरबरा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणचा आंबा मोहोर झडला आहे. भाजीपाल्याचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. कांदा पिकावर सर्वाधिक परिणाम झाला असून, इतरही सर्वच भाजीपाला पिकाच्या गुणवत्तेवर परिणाम झाला आहे. सध्या अनेक भागात शेतकर्‍यांनी हरबरा काढणीला सुरू वात केली आहे. अनेक शेतात गंजी लावलेल्या दिसत आहे; पंरतु अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांची तारांबळ उडाली असून, गंजी झाकण्यासाठी शेतकर्‍यांची धावपळ सुरू आहे. दरम्यान, प्रशासकीय यंत्रणेने प्रत्येक भागात जावून पिकांची पाहणी केली. या पाहणीत रब्बी पिकांसह फळ, भाजीपाला पिकांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. प्राथमिक अंदाजानुसार यवतमाळ जिल्हयातील ८ हजार १९५ हेक्टरपेक्षा अधिक पिकांचे नुकसान झाले आहे. बुलडाणा जिल्हयात १ हजार ८५0 हेक्टरच्यावर,वाशिम १,१२0 हेक्टरवर, अकोला २११ हेक्टर तर अमरावती जिल्हयातील ९ हजार २८ हेक्टर क्षेत्रावरील रब्बी पिके, फळे,भाजीपाला पिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.